Thursday, November 14, 2019

फटाका फोडल्याने एकावर गुन्हा

औरंंगाबाद : मानवी जिवीताला धोका पोहचेल अशा रितीने फटाका फोडुन १० वर्षीय मुलाच्या डोळ्यांना गंभीर ईजा पोहचविल्या प्रकरणी जखमी मुलाचे वडील रविंद्रसिंग अमरसिंग राजपुत (रा. बुढ्ढीलेन, ठाकुर वस्ती) यांनी दिलेल्या तक्रावरुन संशयीत निलेसिंग आनंदसिंग रापुत (रा. ठाकुर वस्ती, बुढ्ढीलेन) याच्या विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार ईलग करित आहेत.
-------------------------------------------------------
तरुणावर चाकुने वार; दोघांवर गुन्हा

औरंंगाबाद : तुझ्या भावाने आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का केली म्हणत तरुणाला मारहाण करुन चाकुने वार करण्यात आल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी ५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या रिक्षा पर्किंगमध्ये घडली. प्रकरणात रिक्षा चालक शेख आसिफ शेख चाँद (२२, रा. माणिक नगर, नारेगाव) याने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी शेख आसीफ शेख मुसा (२२) व शाहरुख शेख नफीस (२७, रा. नारेगाव) या दोघांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार बोडले करित आहेत.
-------------------------------------------------------
घराचे कुलूप तोडुन १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास

औरंंगाबाद : घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ४ ते १२ नोव्हेंबर दरम्यान गजाजन रेसिडेन्सी ऑडिटर सोसायटीत घडली. एन-११, मयुर नगर हडको परिसरात राहणारे दिलीप शेणफडु निकम (५०) यांचे सासरे घराला कुलूप देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडुन घरातील ५० हजारांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. प्रकरणात दिलीप निकम यांच्या तक्रारीवरुन हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार निळ करित आहेत.
-------------------------------------------------------
आमिष दाखवून कामगार पुरवठादाराला दोन लाखांचा गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंंगाबाद : इंव्हेटसाठी बांउनसर्स पुरविण्याचा कॉन्ट्रॅक्ट देतो तसेच इंव्हेटमध्ये भरपूर फायदा करुन देतो म्हणत मुंबईसह हिंगोलीच्या भामगट्याने कामगार पुरवठादाराला दोन लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना २० जून १७ ते २ फेबुवारी २०१८ दरम्यान घडली. नदीम अब्दुल वकील कादरी (४२, रा. औंढा नगरनाथ जि. हिंगोली) व सनि गुलशन अरोरा (३७, रा. मुंबई) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार पुरवठादार मोहमंद सिराज मोहमंद सुभान जहागिरदार (२६, रा. रोषणगेट, मकसुद कॉलनी) यांना संशयीत नदीम अब्दुल व सनि अरोरा  या दोघांनी इंव्हेटसाठी बांउनसर्स पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतो तसेच इंव्हेट मध्ये भरपूर फायदा देखील देतो असे आमिष दाखविले. त्यासाठी दोन लाख रुपये लागतील अशी बतावणी संशयीतांनी केली. आमिषाला बळी पडुन मोहंमद सिराज यांनी दोन लाख रुपये संशयीतांच्या खात्यावर जमा केले. मात्र त्यांनी सिराज यांना कॉन्ट्रॅक्ट दिला नाही, त्यामुळे सिराज यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी संशयीतांनी तुला पैसे परत देत नाही, काय करायचे ते कर, आमचे हात वरपर्यंत आहेत. पोलिस देखील आमचे काही वाकडे करु शकत नाही. पुन्हा आम्हाला फोन केला तर तुझे हातपाय तोडुन कोठेही गाडुन टाकु अशी जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात मोहंमद सिराज यांच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार काळे करित आहेत.
-------------------------------------------------------
विक्री केलेली जमीन पुन्हा विक्री; व्यापऱ्याला ११ लाखांचा गंडा

औरंंगाबाद : विक्री केलेली जमीन आपली असल्याची भासवत ती पुन्हा एका व्यापाऱ्याला विक्री करुन व्यापाऱ्याची ११ लाखांना फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. मोहम्मद अब्दुलसमीर अब्दुल साजीद व एजाज अली जैदी (रा. चेलीपुरा) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशीत आरोपी मोहम्मद अब्दुलसमीर याने त्याच्या मालकीची मौजे मिटमिटा येथील गट नं. २४ मधील जमीन २०१० मध्ये रिधिसिद्धी कोटेक्स प्रा.लि. यांना विक्री केली होती. असे असतांना देखील आरोपींनी सदरील १ हेक्टर १२ आर. जमीन स्वत: च्या मालकीची असल्याचे भासवत १८ ऑक्टोबर २०१८ रोजी व्यपारी प्रफुल्ल ब्रमवा दोघांनी नुतन कॉलनीत राहणारे व्यापारी प्रफुल्ल मुलचंद ब्रमवा यांना विक्री केली. या जमीनीपोटी ब्रमवा यांनी आरोपींना अंजठा अर्बन को. ऑ. बँकेचा ११ लाखांचा धनादेश दिला.  मात्र सदरील जमीन आरोपींनी पूर्वीच कोणाला तरी विक्री केल्याचे ब्रमवा यांच्या निदर्शनास आले, त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षता येताच ब्रमवा यांनी आरोपी अब्दुल समीर यास दिलेले पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी ब्रमवा यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात ब्रमवा यांनी छावणी पोलिस ठाणे गाठुन दिलेल्यातक्रारीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ठोकळ करित आहेत.
-------------------------------------------------------
मद्यपी पोलिसांच्या जाळ्यात

औरंंगाबाद : दारुच्या नशेत तर्रर्र होऊन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा शेख यासिन शेख करिम (रा. ता. पैठण) याला पोलिसांनी गजाआड केले. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानक चौकात घडली. प्रकरणात वाहतुक शाखेचे जमादार अनिल वानखेडे यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भदरगे करित आहेत.
-------------------------------------------------------
क्षुल्लक कारणावरुन युवकाला बेदम मारहाण

औरंंगाबाद : पोलिसांना माझ्या मुलाची टिप का दिली म्हणत तरुणाला दोघांनी लोखंडी सळई व दगडाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उस्मानपूरा परिसरात घडली. प्रकरणात जखमी आकाश शिवाजी हिवराळे (वय २३, रा. गल्ली नं.१, नागसेन नगर, उस्मानपूरा) याने दिलेल्या तक्रारीवरुन शेजारी राहणारा संशयीत आरोपी प्रदिप शेषराव धनेधर (वय ३५) व एका महिलेविरुद्ध  उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीत तपास जमादार बोडले करित आहेत.
-------------------------------------------------------
क्षुल्लक कारणावरुन महिलेला मारहाण

औरंंगाबाद : अंगण झाडण्याच्या व अंगणातील कचरा उलण्याच्या कारणावरुन चौघांनी एका महिलेला शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उस्मानपूरा परिसरात घडली. प्रकरणात ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी शिवा हिवराळे, तानाजी शिवा हिवराळे, देवा शिवा हिवराळे व एका महिलेविरुद्ध उस्मानपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------
घरा समोरुन दुचाकी लांबवली

औरंंगाबाद : घरासमोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेल्या दोन दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना सातारा परिसरात घडली. प्रकरणाणात आकाश देविदास झळके (वय २५, रा. वळदगाव ता.जि. औरंगाबाद) व सुहास सुधाकरराव मुळे (वय ४२, रा. शाकुंतल नगर, सातारा) यांदोघांनी अनुक्रमे आप-आपली दुचाकी (क्रं. एमएच-२०-एफएफ-१७८९), (क्रं. एमएच-२०-सीएम-५२८८) घरासमोर हॅन्डल लॉक करुन घरा समोर उभी केली असता चोरट्याने ती लंपास केली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------------------------
सिडको परिसरात महिलेचा मारहाण करुन विनयभंग

औरंंगाबाद : उसने परत घेण्यासाठी गेलेल्या महिलेला चौघांनी शिवीगाळ करुन तीचे कपडे फाडल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सिडको परिसरात घडली.
प्रकरणात २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली. तक्रारीनुसार पिडितेने संशयीत आरोपी अंकुश भोसले, बाळु गडवे व दोन महिलांना हात उसणे म्हणुन एक लाख रुपये दिले होते. मुदत उलटूनही पैसे परत न दिल्याने पिडिता आरोपींकडे पैशांची मागणी करत होती. मात्र आरोपी टाळाटाळ करित होते. त्यामुळे पिडिता ही आरोपींकडे उसणे दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेली असता आरोपींनी तिला कशाचे पैसे, आमच्याकडे तुझे पैसे नाहीत असे बोलून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपी अंकुश भोसले याने पिडतेचे कपडे फाडुन तीचा विनयभंग केला. प्रकरणात पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार जरारे करित आहेत.
-------------------------------------------------------
अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळविले

औरंंगाबाद : सिडको परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली.या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक जी.एम. बागवडे करित आहेत. तर दुसया घटनेत ४९ वर्षीय महिला ही कामानिमीत्त बाहेर गेली असता घरात असलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवुन नेले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक लाड करित आहेत.
-------------------------------------------------------
अज्ञात कार चालकावर गुन्हा

औरंंगाबाद : भरधाव आलेल्या कारने सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वार गंभीर जमखी होऊन त्यांचा मृत्यु झाला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील बीएम पावर कंपनी समारे घडली. प्रकरणात मयत सिताराम सुर्यवंशी यांचा मुलगा गणेश सुर्यवंशी (वय २०, रा. हनुमान मंदीर, मुकुंदवाडी) याने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात कार चालकाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अन्नलदास करित आहेत.
-------------------------------------------------------
हद्दपार आरोपी जेरबंद

औरंंगाबाद : शहरातुन हद्दपार केलेले असतांना देखील हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशरीरित्या शहरात फिरणारा आरोपी साबेर शेख गुलाम नबी (वय २२, ओहर ता.जि. औरंगाबाद) याला पोलिसांनी पकडले असुन त्याच्याविरुद्ध हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख जहीर करित आहेत.
-------------------------------------------------------
दुचाकीस्वारांनी मोबाईल पळविला

औरंंगाबाद : मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावुन घेत पळ काढल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वसंतराव नाईक चौकातील दिपाली हॉटेल जवळल घडली. प्रकरणात मुकुंदवाडी परिसरातील एसटी कॉलनीत राहणारा सिराज रहेमत शहा (वय २०) हा घरुन चहा पिण्यासाठी मोबाईलवर बोलत टपरीवर जात होता.वसंतराव नाईक चौकातील दिपाली हॉटेल समोर पाठीमागुन एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी सिराज याचा मोबाईल हिसकावुन घेत धुम ठोकली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शिरसाठ करित आहेत.
-------------------------------------------------------
वाहतुकीस अडथळा; दोन वाहनचालकांवर गुन्हा

औरंंगाबाद : दौलताबाद येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रिक्षाचा (क्रं. एमएच-२०-डीसी-२९१३) चालक तोहित खान सफीराज खान (वय २४, रा. कोहीनुर कॉलनी) व छोटा हत्तीचा (क्रं. एमएच-१९-एस-८००५) चालक गणेश शामराव आढाव (वय २४) यादोघांवर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पवार करित आहेत.
-------------------------------------------------------
वृद्ध महिलेला मारहाण; पाच महिलांवर गुन्हा दाखल

औरंंगाबाद : गल्लीतील रस्त्यात उभी कार बाजुला घ्या म्हणुन सांगण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेला पाच महिलांनी घेरुन शिवीगाळ व माराहण केल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जवाहरनगर परिसरात घडली. ६५ वर्षीय महिलेने तीच्या मालकीची एक खोली किरायाने दिली होती. मात्र किरायदाराने ११ नोव्हेंबर रोजी ती खोली खाली केली. खोलीतील सामान त्याने छोटा हत्ती या वाहनात भरले होते. मात्र गल्लीतील रस्त्यात असलेल्या कारमुळे छोटा हत्ती बाहेर जात नव्हता. त्यामुळे ६५ वर्षीय महिलेने कार मालक अनिल साळवी यांना कार बाजुला घ्या सांगण्यासठी गेली असता, संशयीत आरोपींनी तु कोण आमची गाडी बाजुला लाव सांगणारी असे म्हणत शिवीगाळ करुन हाताचापटांनी मारहाण करुन जखमी केले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------
बालदिन विशेष बातमी

दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एजीपी पब्लिक स्कुल अग्रेसर

औरंगाबाद/प्रतिनिधी

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आपला पाल्य उच्चदर्जाचे शिक्षण घेऊन या स्पर्धेच्या युगात यशस्वीपणे मार्गक्रमण करावा असे प्रत्येक पालकाला वाटते. मराठवाड्याच्या भूमीत मेट्रो सिटीच्या तोडीसतोड शिक्षणव्यवस्था औरंगाबाद शहरात देण्याचे कार्य बीडबायपास रोडवर असलेली एजीपी पब्लिक स्कुल सुमारे 10 वर्षांपासून करीत आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री. गोवर्धन पवार यांनी शाळेची मुहूर्तमेढ रोवली. शाळेचे संपूर्ण कारभार सौ. अनिता गोवर्धन पवार या पाहतात. विद्यार्थांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे देता येईल याकडे पवार दाम्पत्यांचे बारकाईने लक्ष असते. यासोबतच कालानुरूप शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलाला स्वीकारून त्यानुसार मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा देण्यासाठी कायम प्रयत्नाहिल असतात.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालागुणासह अद्यावत तंत्रज्ञानाचेही बाळकडू शाळेपासूनच देण्यात येते. आजघडीला सुमारे 300 विदयार्थी एजीपी पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेत आहेत. यासाठी संस्थेत विविध विषयांचे 40 तज्ञ शिक्षक कार्यरत आहेत. प्ले ग्रुप ते इयत्ता दहावी पर्यंतचे वर्ग शाळेत भरतात. विस्तीर्ण परिसरात शाळेची भव्य इमारत उभी आहे. यामध्ये प्रशस्त क्लासरूम, इ-लर्निंग, संगणक लॅब, सायन्स लॅब, मॅथस लॅब यासह भव्य ग्रंथालय आहे. ज्यामध्ये सुमारे 3 हजार पुस्तके आहेत. यात जनरल नॉलेज, गिनीज बुक रेकॉर्ड्स,  मॅगेझीन, विविध भाषेतील वर्तमानपत्रे विद्यार्थांसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे स्वतंत्र ग्रंथपाल शाळेने नियुक्त केला असून ते मुलांना वर्गात जाऊन त्यांच्या आवडीनुसार पुस्तके देतात. यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ज्ञानात भर पडते. त्याचप्रमाणे आज संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थांना प्राथमिक वर्गापासूनच संगणक विषय शिकवण्यात येतो. एजीपी पब्लिक स्कुलमध्ये मुलांना खेळण्यासाठी भव्य मैदान उपलब्ध असून याचा पुरेपूर वापर केला जातो. क्रिकेट, फूटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, बॅडमिंटन, थ्रो बॉल, कबड्डी, खो-खो, कराटे, या मैदानी खेळासोबतच चेस, कॅरम, टेबल टेनिस यासारख्या क्रीडाप्रकारातून मुले स्थानिक पातळीपासून देशपातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन शाळेचे नाव उज्वल करीत आहेत. विद्यार्थांच्या शिक्षणासह त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम, स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक उपक्रमात मुलांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांची चांगली तयारी करून घेण्यात येते. शाळेचा निकाल गतवर्षी 100 टक्के लागला असून 96 टक्के गुण घेऊन विद्यार्थी प्रथम आली आहे. दर्जेदार शिक्षण देण्याकडे शाळेचा कल अधिक राहिला आहे. त्यामुळे एजीपी पब्लिक स्कुल म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत विश्वसनीय नाव बनले आहे.

विविध स्पर्धेत विदयार्थी चमकले

एजीपी पब्लिक स्कुलमध्ये शिक्षणसोबतच मुलांच्या कलागुणांकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांची आवड कशात आहे त्यानुसार त्यांना त्यात्या विषयात सक्षम बनवण्यासाठी शाळेतच विविध उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात आवर्जून उल्लेख करावा अशी स्पर्धा परीक्षा शाळेत घेतली जाते. होमीभाभा, एमपीएससी, हिंदी, ऑलिम्पियाड यासारख्या संस्थेशी संलग्न राहून पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थांची स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. यात अनेक विद्यार्थांनी झोनल रँक, गोल्ड मेडल पटकाविले आहेत. चित्रकला, क्रीडा यासह बौद्धिक परीक्षांमध्ये चिमुकले हिरीरीने सहभागी होतात.

विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार

यामध्ये दिवाळी, गणेशोत्सव, होळी असे उत्सव विद्यार्थांना इकोफ्रेंडली पद्धतीने साजरे करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. जेणेकरून पर्यावरणाचे महत्व त्यांना पटेल. विशेषतः मुले स्वतः माती पासून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करतात. शाळेत सर्व सण-समारंभाला विद्यार्थी रंगबिरंगी कपडे घालून येतात. 26 जानेवारी दरम्यान शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो. यात दरवर्षी वेगवेगळे भारतीय संस्कृतीशी संबंधित विषय हाताळून त्यानुसार मुले कार्यक्रम सादर करतात. नामवंत मान्यवरांना निमंत्रित करून विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात येते. विशेष म्हणजे विदयार्थी-पालकासाठी जाहिरात स्पर्धा शाळेने आयोजित केली होती. यात दोघांनी मिळून जाहिरात तयार करून सादर करायची असते. तर विद्यार्थ्यांच्या आजी- आजोबाना शाळेत निमंत्रित करून त्यांच्यावर विद्यार्थांनी कविता, गाणे तयार करून सादर केले. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.
या सोबतच राज्यासह परराज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते.

शाळेच्या भिंती मुलांच्या कालाविष्काराने सजल्या

एजीपी पब्लिक स्कुलच्या भव्य इमारतीत प्रवेश करताच भिंतींनावर मुलांनी काढलेले चित्र, पोस्टर, लक्ष वेधून घेतात. विविध सामाजिक संदेश देणारे पोस्टर, चिमुकल्या हातांनी रेखाटलेले चित्रं मन प्रफुल्लित करतात. जिकडे पाहावे तिकडे मुलांच्या कलाविष्कारांची उधळण झालेली पाहायला मिळते.

आरोग्यसह स्वयंरक्षणाचे धडे

शाळेतील विद्यार्थांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सर्व सोयीसुविधा शाळेने उपलब्ध केलेल्या आहेत. तर वर्षातून दोन वेळा आरोग्य शिबिर आयोजित करून सर्व विद्यार्थांची तपासणी केली जाते. यासोबतच मुलींना स्वयंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी कराटे प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

1.
शाळेत आम्हाला खूप छान शिकवले जाते. मला सायन्सचा अभ्यास करायला आवडतो आणि खेळायला, डान्स करायला आणि चित्र काढायला आवडतात. मी मोठी होऊन डॉक्टर बनणार आहे.

-शांभवी प्रसाद नागपुरे, इयत्ता दुसरी

2.
मला डान्स, सिंगिंग आवडते, ड्रॉईंग काढायला आवडतात. मॅथ विषय मला खूप आवडतो. मला आयपीएस होऊन पोलीस ऑफिस बनायचे आहे आणि चोरांना पकडायचे आहे.
-आक्षिता अखिलेश सिंग, इयत्ता पहिली

3.
मला सायन्स विषय खूप आवडतो. ऑलिम्पियाड मध्ये मला झोनल रँकचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मला डान्स, ड्रॉईंग, स्पोर्ट आवडतात. मला सायंटिस्ट बनायचे आहे.
-खुशी प्रवीण अग्रवाल, इयत्ता दुसरी

4.
मला फुटबॉल खेळायला आवडतो. मी मोठा होऊन इंजिनियर बनणार आहे.
-वेदांत गणेश साखरे, इयत्ता दुसरी

5.
मला स्पोर्ट्स आणि ड्रॉईंग काढायला आवडतात. सायन्स आणि इंग्लिश विषय मला आवडतो. मला क्रिकेटर बनायचे आहे.
विठ्ठल विश्वनाथ इक्कर, इयत्ता दुसरी
शहरात डेंग्यूचे थैमान, आतापर्यंत ११ जणांचा घेतला बळी

४६ पॉझिटिव्ह तर १११ संशयीत रुग्ण

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात डेंग्यूच्या साथीने चांगलेच हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. मंगळवारी दोघांचा मृत्यु झाल्यामुळे डेंग्यूच्या बळींची संख्या ११ वर गेली आहे. डेंग्यूची साथ वाढत असताना मनपाकडून मात्र प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.१३) तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

शहरात ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूची साथ सुरु झाली असलीतरी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यात पाच जणांचा बळी गेला. त्यांनतरही डेंग्यूची साथ अटोक्यात आली नाही. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात देखील चार जणांचा बळी गेला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून आतापर्यंत पॉझिटिव्ह ४६ तर संशयीत १११ रुग्ण आढळून आले आहे. त्यातच मंगळवारी दोंघाचा मृत्यु झाला. घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात नारेगाव येथील सात वर्षीय बालकास दाखल करण्यात आले होते. डेंग्यू झाल्यामुळे त्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी दुपारी त्या बालकाचा मृत्यु झाला. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश कॉलनीतील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यूच्या बळीची संख्या ११ वर पोहचली आहे. डेंग्यूने संपूर्ण शहराला विळखा घातला असून घराघरात साथरोगाचे रुग्ण आढळून येत आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. अडीच महिन्यापासून डेंग्यूची साथ शहरात सूरू आहे. परंतु आरोग्य विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष

डेंग्यूची साथ अटोक्यात येत नसल्याचे दिसून आल्यामुळे महापालिका प्रशासनाने झोन कार्यालयासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या संपर्क अधिकाऱ्यांनी आठ दिवस मोहिम राबवण्यास सहकार्य केले. त्यानंतर संपर्क अधिकारी झोन कार्यालयाकडे फिरकले देखील नाही. आयुक्तांनी आदेश देवूनही संपर्क अधिकाऱ्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याकडे लक्ष दिले नाही.

अ‍ॅबेटिंगची मोहिम कागदावरच

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅबेटिंगची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दररोज राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची आकडेवारी पाहिल्यास आठ तासात एवढया घरांमध्ये ही मोहिम राबवली जाणे शक्य नाही. तरीदेखील घराघरात जावून अ‍ॅबेटिग केल्याचे कागदोपत्रीच दाखवले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यां धरले धारेवर

शहरात डेंग्यूने दोघांचा बळी घेतल्याचे कळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर घोडेले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डेंग्यूची साथ सुरु असतांनाही प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या जात नाही. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे  डेंग्यूची साथीचा प्रकोप वाढतच चालला आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नाही का? असा सवाल महापौरांनी केला. खासगी रुग्णालयातील संशयीत डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळत नसलेतर त्या रुग्णांचा परवाना निलंबित करा, डेंग्यूची साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, त्याचा दररोजचा अहवाल सादर करावा असे आदेश महापौर घोडेले यांनी दिले.

भिमनगर, भावसिंगपूरा, ज्योतीनगर रेड झोनमध्ये

डेंग्यूची साथ नियंत्रणात येत नसल्यामुळे आरोग्य विभागाने झोननिहाय तपासणी सुरु केली आहे. डेंग्यूचा सर्वाधिक धोका असलेल्या भिमनगर, भावसिंगपूरा, हर्सुल-मिसारवाडी, पानदरीबा-ज्योतीनगर हे चार भाग रेड झोनमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. या भागात वारंवार डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. 
जागतिक मधुमेह दीना निम्मित
N8 बोटॅनिकल गार्डन मध्ये
मोफत शुगर checkup
व आरोग्य तपासणी.
N8 बोटॅनिकल भारतीय योगा व हेडगेवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ( 14 नोव्हेंबर) सकाळी 6 ते  8 या वेळेत मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेे. 
 या शिबिरात प्रसिद्ध डॉक्टर विकास रत्नपारखी हे मधुमेहींची तपासणी करून मार्गदर्शन केले,    Kailash जाधव यांचे भारतीय योग संस्थां ,   अमित जाजू यांचे जयहिंद ग्रुप,  सिडको , N- 8 , बॉटनिकल गार्डन , डॉ. अरविंद गुजराथी यांचे योगासन ग्रुप, व परिसरातील सर्व नागरिक उपस्तीत होते.
रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलन बंद

एमआयएम नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
एमआयएमच्या स्विकृत नगरसेवकाने कचरा संकलक रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.१४) शहरातील कचरा संकलनाचे व वाहतूकीचे काम बंद करुन कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, कचरा संकलनासाठी वाहनांना पालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली.

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. बुधवारी आमखास मैदानाजवळ छोटया वाहनातून मोठया वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयएमचे स्विकृत नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी परिसरात कचरा पडत असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यानंतर क्षेत्रीय अधिकारी इरफान व युनूस हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हाश्मी यांनी या अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी व्यवसायिक कचरा संकलन बंद केले. रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारीही कचरा संकलनाचे काम बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. सकाळपासूनच सर्व प्रभागातील कचरा संकलन वाहतूकीचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे शहरात कचऱ्यांचे ढीग साचले होते. कर्मचारी एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा यासाठी बेगमपूरा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनतर मनपा मुख्यालयात येवून कर्मचाऱ्यांनी वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात नाही, तोपर्यंत कचरा संकलन केले जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, महापालिका प्रशासन कचरा संकलन व वाहतूकीचे काम सुरु करण्यासाठी रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्कात होते. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात विचारणा केली असता गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  
*सदस्य औद्योगिक न्यायालय अभय लाहोटी यांचे मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशन  तर्फे स्वागत*

औरंगाबाद दि.१४ नवंबर-जळगाव येथील औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांचे औरंगाबादत कँम्प औद्योगिक न्यायालय म्हणून रूजू झाल्याबद्दल मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले.

याबाबत असे की औरंगाबाद येथे अतिरिक्त औद्योगिक न्यायालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा लेबर लाॅ प्रक्टीशनर्स असोसिएशनची होती. ती मागणी मजूंर होऊन अतिरिक्त न्यायालयाचा कक्ष गेल्या काही महिन्यांपासून सज्ज होता. पूर्णवेळ न्यायाधीशांची नेमणूक होईपर्यंत जळगाव येथील सदस्य औद्योगिक न्यायालय श्री अभय लाहोटी यांना महिन्याच्या पहिल्या व तिसरा आठवड्यात औरंगाबाद येथे कॅम्प औद्योगिक न्यायालय म्हणून जबाबदारी मिळाली व त्यांनी औरंगाबादेत न्यायादानाचे कार्य सुरूही केले.मराठवाडा लेबर प्रक्टीशनर्स असोसिएशनच्या परंपरे प्रमाणे नविन आलेल्या न्यायाधीश श्री अभय लाहोटी यांचे स्वागत व सत्कार असोसिएशनच्या कार्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.रविंद्र शिरसाठ हे होते. कार्यक्रमाच्या सूरूवातीस कँम्प औद्योगिक न्यायालय श्री अभय लाहोटी यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड रविंद्र सिरसाठ यांनी केले. सदस्य औद्योगिक न्यायालय श्री आर.आर.काकाणी यांचे स्वागत असोसिएशनचे सचिव अॅड सागरदास मोरे यांनी, कामगार न्यायालय श्री डी व्ही जोशी यांचे स्वागत अॅड राजेश खंडेलवाल यांनी ,तर कामगार न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांचे स्वागत अॅड अशोक मोरे यांनी केले. यावेळी वकीलांच्या वतीने अॅड अभय टाकसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कॅम्प न्यायालय श्री अभय लाहोटी यांना जलद गतीने निकाल देण्यासाठी वकीलातर्फे पुर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन देत न्यायाधीशांकडून पक्षकारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. उच्च व सर्वोच्च न्यायालयात चागंला वकील द्यायचा असल्यास किमंत मोजावी लागते ती कामगारांची ऐपत नसल्याने खालच्या न्यायालयात काम मिळालाच पाहिजे ही जबाबदारी वकील आणि न्यायाधीशांची असते असे प्रतिपादनही अॅड अभय टाकसाळ यांनी केले. यावेळी संचलन व प्रास्ताविक अॅड सचिन गंडले यांनी केले तर आभार प्रदर्शन असोसिएशन चे सेक्रेटरी अॅड सागर दास मोरे, यांनी केले. अॅड रविंद्र सिरसाठ यांनी अध्यक्षीय समारोप करताना असोसिएशन ला जागेची कमतरता आहे त्याबद्दल सदस्य औद्योगिक न्यायालय यांनी योग्य तो प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी विनंतीही केली .यावेळी चहापानाचा कार्यक्रम ही झाला बार व बेंच यांचे चांगले संबंध हे न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान करीत असतात ही परंपरा औरंगाबादला अबाधित असल्याचेही सिरसाठ म्हणाले. सर्व वकीलांनी नूतन न्यायाधीशांना स्वताःचा परिचय करून दिला यावेळी अॅड एम पी टाकसाळ, अॅड जे एस भोवते, अॅड सिटी एल मुळावेकर, अॅड भगवान भोजने,अॅड रविंद्र सिरसाठ, अॅड एस के वाघचौरे, अशोक मोरे, अॅड सागरदास मोरे, अॅड आर के ढगे पाटील,अॅड अनिल सुरवसे,अॅड राजेश खंडेलवाल, अॅड बाबासाहेब वावळकर,अॅड आनंद कांबळे, अॅड सपना तांगडे, अॅड. एस एल नामेवार,अॅड इ एम रामटेके अॅड अभय टाकसाळ, अॅड सचिन गंडले यांच्यासह मोठया संख्येने वकील बंधू भगिनीं उपस्थित होते.
आैरंगाबादेत डेंग्यूसाठी हायअलर्ट

अकरा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग

आैरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात आतापर्यंत अकरा जणांचे बळी घेऊन थैमान घातलेल्या डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी अबेटिंग व फुर फवरणीची मोहीम प्रभावीवणे राबविण्याचे आदेश आरोग्य विभागाला महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी दिले आहेत. अतिजोखमीच्या भागात आराेग्याबाबतची आणीबाणीही (हायअलर्ट) लागू करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.

आैरंगाबाद शहरात मागील दाेन ते अडीच महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून डेंग्यूमुळे आतापर्यंत ११ जणांचे बळी गेले आहेत. त्याचे पडसाद गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. नगरसेवकांनी डेंग्यूबाबत महापालिका काय उपाययाेजना करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभेनंतर महापाैरांच्या दालनात मलेरिया विभागाच्या अतिरिक्त अधिकारी डाॅ. अर्चना राणे यांनी डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. शहरात आतापर्यंत १३६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बुधवारी एका दिवसात वाढ झालेल्या २५ रुग्णांचाही समावेश आहे. त्यातील ४६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिकेकडे डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे डाॅ. राणे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी आराेग्य प्रमुख अधिकारी डाॅ. भटकर यांच्याशी फाेनवरून संपर्क साधत कर्मचारी वाढवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या. तर डाॅ. भटकर यांनी ३६ कर्मचारी देण्यात येतील, असे महापाैरांनी सांगितले.

डाॅ. अर्चना राणे यांनी महापाैरांपुढे उपलब्ध कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. त्यात सध्या १५० कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र आकृतीबंधानुसार आराेग्य विभागाकडे २०४ कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मनपाचे ८४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात मलेरिया शास्त्रज्ञ हे पद रिक्त आहे. प्रत्येक वाॅर्डसाठी प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. धूरफवारणीसह गप्पी मासे साेडण्यासाठी २ कर्मचारी असल्याची माहिती डाॅ. राणे यांनी महापाैरांना दिली. आतापर्यंत अबेटिंग गाेळ्यांचे वाटप शहरातील ४ लाख घरांपर्यंत झालेले असून आणखी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचण्याची व्यवस्था करण्याची सूचना महापाैरांनी केली. डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी प्रसंगी शहरात आराेग्य आणीबाणीही जाहीर करण्याची तयारी मनपाने केली असल्याचे महापाैर घाेडेले यांनी सांगितले.

आयुक्त सुट्टीवर ; महापौर घोडेलेंची एकतर्फी लढाई

शहरात डेंग्यूने हाहाकार माजलेला आहे. आतापर्यंत ११ बळी गेलेत. या परिस्थितीला महापौर नंदकुमार घोडेले आणि आरोग्य विभाग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, प्रशासनाचे प्रमुख मनपा आयुक्त निपुण विनायक यांना याचे काहीएक देणेघेणे नसल्याचे अधोरेखित होत आहे. दिवाळीपासून रजेवर गेलेले आयुक्त अद्यापही शहरात परत आलेले नाहीत. विशेष म्हणजे पूर्णवेळ आयुक्त द्या असे पत्रच महापौरांनी राज्यपालांना दिले आहे. महापौर नंदकुमार घोडेले आरोग्य विभागाच्या आढावा बैठका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. मात्र, प्रशासनाचा प्रमुख शहराला वाऱ्यावर सोडून सुट्टीवर गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...