रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलन बंद
एमआयएम नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी
एमआयएमच्या स्विकृत नगरसेवकाने कचरा संकलक रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.१४) शहरातील कचरा संकलनाचे व वाहतूकीचे काम बंद करुन कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, कचरा संकलनासाठी वाहनांना पालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली.
शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. बुधवारी आमखास मैदानाजवळ छोटया वाहनातून मोठया वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयएमचे स्विकृत नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी परिसरात कचरा पडत असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यानंतर क्षेत्रीय अधिकारी इरफान व युनूस हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हाश्मी यांनी या अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी व्यवसायिक कचरा संकलन बंद केले. रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारीही कचरा संकलनाचे काम बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. सकाळपासूनच सर्व प्रभागातील कचरा संकलन वाहतूकीचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे शहरात कचऱ्यांचे ढीग साचले होते. कर्मचारी एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा यासाठी बेगमपूरा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनतर मनपा मुख्यालयात येवून कर्मचाऱ्यांनी वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात नाही, तोपर्यंत कचरा संकलन केले जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, महापालिका प्रशासन कचरा संकलन व वाहतूकीचे काम सुरु करण्यासाठी रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्कात होते. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात विचारणा केली असता गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
एमआयएम नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी
एमआयएमच्या स्विकृत नगरसेवकाने कचरा संकलक रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.१४) शहरातील कचरा संकलनाचे व वाहतूकीचे काम बंद करुन कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, कचरा संकलनासाठी वाहनांना पालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली.
शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. बुधवारी आमखास मैदानाजवळ छोटया वाहनातून मोठया वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयएमचे स्विकृत नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी परिसरात कचरा पडत असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. यानंतर क्षेत्रीय अधिकारी इरफान व युनूस हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हाश्मी यांनी या अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी व्यवसायिक कचरा संकलन बंद केले. रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारीही कचरा संकलनाचे काम बंद ठेवून कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. सकाळपासूनच सर्व प्रभागातील कचरा संकलन वाहतूकीचे काम बंद करण्यात आले होते. यामुळे शहरात कचऱ्यांचे ढीग साचले होते. कर्मचारी एमआयएमच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा यासाठी बेगमपूरा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनतर मनपा मुख्यालयात येवून कर्मचाऱ्यांनी वाहने उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात नाही, तोपर्यंत कचरा संकलन केले जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, महापालिका प्रशासन कचरा संकलन व वाहतूकीचे काम सुरु करण्यासाठी रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्कात होते. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात विचारणा केली असता गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.