आैरंगाबादेत डेंग्यूसाठी हायअलर्ट
अकरा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग
आैरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात आतापर्यंत अकरा जणांचे बळी घेऊन थैमान घातलेल्या डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी अबेटिंग व फुर फवरणीची मोहीम प्रभावीवणे राबविण्याचे आदेश आरोग्य विभागाला महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी दिले आहेत. अतिजोखमीच्या भागात आराेग्याबाबतची आणीबाणीही (हायअलर्ट) लागू करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.
आैरंगाबाद शहरात मागील दाेन ते अडीच महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून डेंग्यूमुळे आतापर्यंत ११ जणांचे बळी गेले आहेत. त्याचे पडसाद गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. नगरसेवकांनी डेंग्यूबाबत महापालिका काय उपाययाेजना करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभेनंतर महापाैरांच्या दालनात मलेरिया विभागाच्या अतिरिक्त अधिकारी डाॅ. अर्चना राणे यांनी डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. शहरात आतापर्यंत १३६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बुधवारी एका दिवसात वाढ झालेल्या २५ रुग्णांचाही समावेश आहे. त्यातील ४६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिकेकडे डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे डाॅ. राणे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी आराेग्य प्रमुख अधिकारी डाॅ. भटकर यांच्याशी फाेनवरून संपर्क साधत कर्मचारी वाढवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या. तर डाॅ. भटकर यांनी ३६ कर्मचारी देण्यात येतील, असे महापाैरांनी सांगितले.
डाॅ. अर्चना राणे यांनी महापाैरांपुढे उपलब्ध कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. त्यात सध्या १५० कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र आकृतीबंधानुसार आराेग्य विभागाकडे २०४ कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मनपाचे ८४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात मलेरिया शास्त्रज्ञ हे पद रिक्त आहे. प्रत्येक वाॅर्डसाठी प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. धूरफवारणीसह गप्पी मासे साेडण्यासाठी २ कर्मचारी असल्याची माहिती डाॅ. राणे यांनी महापाैरांना दिली. आतापर्यंत अबेटिंग गाेळ्यांचे वाटप शहरातील ४ लाख घरांपर्यंत झालेले असून आणखी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचण्याची व्यवस्था करण्याची सूचना महापाैरांनी केली. डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी प्रसंगी शहरात आराेग्य आणीबाणीही जाहीर करण्याची तयारी मनपाने केली असल्याचे महापाैर घाेडेले यांनी सांगितले.
आयुक्त सुट्टीवर ; महापौर घोडेलेंची एकतर्फी लढाई
शहरात डेंग्यूने हाहाकार माजलेला आहे. आतापर्यंत ११ बळी गेलेत. या परिस्थितीला महापौर नंदकुमार घोडेले आणि आरोग्य विभाग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, प्रशासनाचे प्रमुख मनपा आयुक्त निपुण विनायक यांना याचे काहीएक देणेघेणे नसल्याचे अधोरेखित होत आहे. दिवाळीपासून रजेवर गेलेले आयुक्त अद्यापही शहरात परत आलेले नाहीत. विशेष म्हणजे पूर्णवेळ आयुक्त द्या असे पत्रच महापौरांनी राज्यपालांना दिले आहे. महापौर नंदकुमार घोडेले आरोग्य विभागाच्या आढावा बैठका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. मात्र, प्रशासनाचा प्रमुख शहराला वाऱ्यावर सोडून सुट्टीवर गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अकरा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग
आैरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात आतापर्यंत अकरा जणांचे बळी घेऊन थैमान घातलेल्या डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी अबेटिंग व फुर फवरणीची मोहीम प्रभावीवणे राबविण्याचे आदेश आरोग्य विभागाला महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी दिले आहेत. अतिजोखमीच्या भागात आराेग्याबाबतची आणीबाणीही (हायअलर्ट) लागू करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.
आैरंगाबाद शहरात मागील दाेन ते अडीच महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असून डेंग्यूमुळे आतापर्यंत ११ जणांचे बळी गेले आहेत. त्याचे पडसाद गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. नगरसेवकांनी डेंग्यूबाबत महापालिका काय उपाययाेजना करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभेनंतर महापाैरांच्या दालनात मलेरिया विभागाच्या अतिरिक्त अधिकारी डाॅ. अर्चना राणे यांनी डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी सादर केली. शहरात आतापर्यंत १३६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बुधवारी एका दिवसात वाढ झालेल्या २५ रुग्णांचाही समावेश आहे. त्यातील ४६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिकेकडे डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे डाॅ. राणे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. महापाैर नंदकुमार घाेडेले यांनी आराेग्य प्रमुख अधिकारी डाॅ. भटकर यांच्याशी फाेनवरून संपर्क साधत कर्मचारी वाढवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना केल्या. तर डाॅ. भटकर यांनी ३६ कर्मचारी देण्यात येतील, असे महापाैरांनी सांगितले.
डाॅ. अर्चना राणे यांनी महापाैरांपुढे उपलब्ध कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. त्यात सध्या १५० कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र आकृतीबंधानुसार आराेग्य विभागाकडे २०४ कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मनपाचे ८४ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात मलेरिया शास्त्रज्ञ हे पद रिक्त आहे. प्रत्येक वाॅर्डसाठी प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. धूरफवारणीसह गप्पी मासे साेडण्यासाठी २ कर्मचारी असल्याची माहिती डाॅ. राणे यांनी महापाैरांना दिली. आतापर्यंत अबेटिंग गाेळ्यांचे वाटप शहरातील ४ लाख घरांपर्यंत झालेले असून आणखी २ लाख घरांपर्यंत पाेहाेचण्याची व्यवस्था करण्याची सूचना महापाैरांनी केली. डेंग्यूचा फैलाव राेखण्यासाठी प्रसंगी शहरात आराेग्य आणीबाणीही जाहीर करण्याची तयारी मनपाने केली असल्याचे महापाैर घाेडेले यांनी सांगितले.
आयुक्त सुट्टीवर ; महापौर घोडेलेंची एकतर्फी लढाई
शहरात डेंग्यूने हाहाकार माजलेला आहे. आतापर्यंत ११ बळी गेलेत. या परिस्थितीला महापौर नंदकुमार घोडेले आणि आरोग्य विभाग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, प्रशासनाचे प्रमुख मनपा आयुक्त निपुण विनायक यांना याचे काहीएक देणेघेणे नसल्याचे अधोरेखित होत आहे. दिवाळीपासून रजेवर गेलेले आयुक्त अद्यापही शहरात परत आलेले नाहीत. विशेष म्हणजे पूर्णवेळ आयुक्त द्या असे पत्रच महापौरांनी राज्यपालांना दिले आहे. महापौर नंदकुमार घोडेले आरोग्य विभागाच्या आढावा बैठका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. मात्र, प्रशासनाचा प्रमुख शहराला वाऱ्यावर सोडून सुट्टीवर गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.