Tuesday, March 8, 2022
भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा
Saturday, January 15, 2022
हज हाऊस यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्यूट वाचवण्यासाठीचा लढा आणखी तीव्र करण्याची आवश्यकता .
Sunday, October 4, 2020
Sunday, September 13, 2020
शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॕकेज जाहीर करा; अन्यथा सरकारच्या विरोधात आंदोलन - अरुण निटुरे
औरंगाबाद - केंद्र शासनाने उद्योगपतींना आर्थिक पॕकेज जाहीर केले. तसेच आर्थिक पॕकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करावे, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारु, असा इशारा राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी सुभेदारी विक्ष्रामगृह येथे दि. 13 रोजी आयोजित पञकार परिषदेत दिला.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेक्ष्राम, प्रदेश अध्यक्ष अर्जुनराव गालफाडे, प्रदेश सरचिटणीस मारुती गायकवाड, जालना जिल्हाध्यक्ष कैलास सरकटे, कॕप्टन अरविंद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना निटुरे म्हणाले, शासनाने उद्योगपतींना मदत केली. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॕकेज जाहीर करावे. तसेच कोरोना आजाराने डॉक्टर, पोलिस, पञकार यांना 50 लाख केंद्र शासनाने तर 25 लाख राज्य शासनाने आर्थिक मदत म्हणून द्यावे. तसेच कोरोनामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.त्यांनाही शासनाने मदत करावी. तसेच नवीन सरकार सत्तेवर येताच सत्ताधारी विद्युत कंपनी तयार करतात आणि सामान्यांना नागरिक, शेतकऱ्यांची लुट करतात.नवीन मीटर लावतात. यामुळे मोठा भ्रष्टाचार होत आहे. या प्रश्नांवर शासनाने योग्य विचार करावा आणि पिडितांना मदत करावी अन्यथा भविष्यात केंद्र सरकार विरोधात जंतरमंतरवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निटुरे यांनी दिला.
आगामी महानगरपालिका निवडणूक पक्ष सर्व जागा स्वतंत्र लढणार आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आम्ही रस्ते, पाणी, कचरा, नागरी समस्या आदी प्रश्नावर लढणार आहोत. पुढील निवडणुकीत आमच्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे असतील आणि निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव गालफाडे यांनी पञकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्योगपतींना 1 लाख 72 हजार कोटींचे पॕकेज जाहीर केले. माञ शेतकऱ्यांना वेगळा न्याय असा सवालही त्यांनी केला. कोरोनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे, हे थांबले पाहिजे अन्यथा येत्या काळात सरकार विरोधात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सोमनाथ गालफाडे, स्वप्निल गालफाडे, रंगनाथ भालेराव, शिरधूर गंगावणे, विलास सरकटे, माणिकराव गालफाडे, चंद्रकांत तारतोडे, पवन कुमार, दीपक साळवे, संग्राम घाटे आदींची उपस्थिती होती.
Friday, September 11, 2020
सिव्हिल कोर्स करा,आत्मनिर्भर बना......
(औरंगाबाद )-MET इन्स्टिट्यूट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या वतीने शासन मान्य कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले जाते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात नवीन काही करण्याची ज्यांच्यात धमक असते तेच विद्यार्थी इंटिरियर डेकोरेटर कोर्स करण्यासाठी धडपड करत असतात. हा कोर्स एक वर्षाच्या कालावधीचा आहे. कोर्स मध्ये इंटिरियर डेकोरेटर व डिझाईन्स कोर्स सोबत AUTO CAD सॉफ्टवेअर्स हि शिकविले जाते. विद्यार्थ्यांने स्वतः आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी व्हावे त्याकरिता बांधकाम क्षेत्रातील कोर्स इंटिरियर डेकोरेटर अत्यंय हे उपयुक्त होते. सदर कोर्समध्ये रेसिडेन्शिअल डिझाईन ,कमर्शियल डिझाईन ,इंडस्ट्रियल डिझाईन ,फर्निचर डिझाईन, डिझाईन मटेरियल आर्ट आणि आर्किटेक हिस्ट्री, सॉफ्टवेअर डिझाईन, प्रॅक्टिकल फर्निचर डिझाईन, स्टुडिओ डिझाईन सारखे प्रोजेक्ट पूर्ण केले जाते.
इंटिरिअर डेकोरेटर कोर्स अर्ध-वेळ म्हणजे पार्ट-टाईम करू शकता. कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. महिलांसाठी विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा.8668620106,8793666376.
2. कोर्स-कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक)- बांधकाम क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी कमी वयात अल्प वेळात शिक्षण म्हणजे दहावी उत्तीर्ण करून आपण बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करू शकता.सदर कोर्स एक वर्षाच्या कालावधीचा आहे. संपूर्ण भारत देशात कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा एकमेव असा कोर्स आहे जो दहावीनंतर एक वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये सरळ सेवा भरती साठी वर्ग-3 पदावर "#स्थापत्य_अभियांत्रिकी_सहाय्यक" म्हणून नोकरी मिळविता येते. व तसेच महानगरपालिका जिल्हा परिषद सिडको राज्य रस्ते विकास महामंडळ जलसंपदा नगरपरिषद नगरपंचायत पंचायत समिती येथे ही सरळ सेवा भरती साठी उपयुक्त होतो. तसेच पीडब्ल्यूडी विभागाकडून वर्ग 7 मध्ये दहा लक्ष पर्यंत शासकीय गुत्तेदाररिचे करता येते. (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर)
![]() |
| Add caption |
एवढेच नव्हे तर बांधकाम क्षेत्रात स्वतःचा खाजगी व्यवसाय करता येतो व रियल इस्टेट कन्सल्टंट म्हणूनही काम करता येते वरील कोर्स करण्यासाठी पात्रता कमीत कमी 10 वी पास पाहिजे व व बारावी आणि पदवीधर विद्यार्थी ही करू शकता. सदर कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. सदर कोर्स हे शासनमान्य असून शासनमान्य प्रमाणपत्र दिला जातो.महिलांसाठी विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा-8668620106,8793666376.
Sunday, July 19, 2020
कर्तव्य, इमानदारी यांना महत्त्व देणे तसेच जनसेवा, जनसुरक्षा करणे हेच कर्तव्यदक्ष पोलिसांचे सद् गुण आहेत. पोलीस खात्यात कर्तव्य दक्ष अधिकारी, कर्मचारी यांची कमी नाही. कर्तव्याची मोजदाद केली तर मोठी यादी तयार होईल. या पोलीस बांधवांच्या अंगी कर्तव्यनिष्ठा खच्चून भरलेली आहे. त्या पोलिसांपैकी एक आहेत आपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद ! अष्ठपैलू व्यक्तिमत्त्वामुळे कैसर खालिद हे हजारो नागरिकांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत. हे अद् भूत व्यक्तिमत्व असलेल्या आयपीए कैसर खालिद यांचा आज जन्मदिन! त्या निमित्ताने विशेष लेखाद्वारे आयपीएस कैसर खालिद यांना "युवा सामना मिडिया" परिवाराकडून शुभेच्छा देण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न!
पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांचा जन्म बिहार राज्यातील अररिया येथे झाला. त्यांनी अररियामधील शाळांमधून शिक्षण पूर्ण केले, नंतर सायन्स कॉलेज पटना आणि पाटणा कॉलेज येथे प्रवेश घेतला. अगदी सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी, त्याला शिक्षण पूर्ण होईपर्यंत इयत्ता चौथीपासूनच बरीच शिष्यवृत्ती मिळाली. सन 1997 साली त्यांची प्रतिष्ठित भारतीय पोलीस सेवा परीक्षेसाठी निवड झाली अन् महाराष्ट्र पोलीस दलाला कैसर खालिद यांच्या रूपात अष्ठपैलू व्यक्तिमत्व लाभले.
"पोलीस" हे नाव कानी पडताच नागरिकांच्या मनी पोलिसांप्रति असलेली बरीवाईट भावना व्यक्त होते. याला एकादी क्षुल्लक घटनादेखील निमित्त ठरते. त्यातूनच सोशल मीडियावर पोलिसांना कधी शुभेच्छा तर कधी लोखोळ्यांना वाहिल्या जातात. आजच्या घडीला पोलीस खात्यातील "पोलिसींग"मुळेच आपण सर्व सुरक्षित आहोत. चोर पकडणे, गुन्ह्यांची उकल करण्याबरोबर कर्तव्यापलीकडे जाऊन उद्याच्या भारताचे भविष्य पोलीस घडवत आहेत. देशाच्या हितासाठी उद्याचे नागरिक सुजान, जबाबदार बनणले पाहिजेत. हे केवळ शिक्षणामुळे शक्य होऊ शकते. शिक्षणाचे बाळकडू प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही, हे वेळीच लक्षात आल्याने बिहार राज्यातून कैसर खालिद यांच्या रूपात एक कर्तव्य दक्ष आयपीएस अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलाला लाभला. अडथळ्याशिवाय जगण सोपे नाही. खरं पाहता अडथळ्यांमुळेच जीवन जगण्याचे खरे मोल समजते. मात्र संकटाच्या वेळी उद् भवलेल्या परिस्थिवर कशी मात करायची हे बहुदा उमजत नसते. अशा वेळी संयमाने कृती करणे, भोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच पाऊल पुढे टाकले पाहिजे, हे जीवनाचे सहस्य कळल्यामुळे बिहार राज्यातील गावाखेड्यातल्या परंपरेच्या बेड्या तोडून कैसर खालिद यांनी पटणा विद्यापीठातून पदवी संपादन केली.
काम कोणतेही असो, परिश्रम करण्याची, जीद्द पाहिजे. त्यासाठी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. पण स्वप्नात रंगून स्वप्नभंग होणार नाहीत, हा विचारही तितकाच मोलाचा आहे. हे केवळ अनुभवानेच मनुष्य शिकतो. ज्ञान वाढल्याने कमी होत नाहीतर त्यात आणखी भर पडते. सुजलाम, सुफलाम भारतासाठी प्रत्येक नागरिकांनी शिक्षण घेतलेच पाहिजे. त्यासाठी प्रबोध गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊनच कैसर खालिद हे ठिकठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाकीतले प्रबोधनकार कैसर खालिद यांच्या मार्गगर्शन मोलाचे ठरले आहे.
विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याबरोबर कैसर खालिद यांच्या अंगी आणखी एक कलाकार दडलेला आहे. कैसर खालिद हे उत्तम कवी, शायर आहेत. आपल्या अवतीभोवती असलेले वातावरण, व्यक्ती, त्यांचे जगणे, वागणे, बोलणे यातूनच कैलास खालिद यांनी अनेक कविता, गजलंची निर्मिती केली. अनेक कार्यक्रमांमध्ये कैसर खालिद प्रमुख पाहुण्यापदी उपस्थित राहून नागरिकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या खास शैलीत कविता, गझल, शायरीच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये कमालीचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेकांचा दृष्टीकोन बदलला आणि आज तेच प्रगतीच्या वाटेवर आहेत.
कैसर खालिद हे सद्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या संरक्षण आणि नागरी शाखेत पोलीस महानिरीक्षक पदावर कर्तव्य बजावत आहेत.
या सन्मानिय पदावर विराजमान झाल्यावर कैसर खालिद यांची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे वेळेसोबत धावा ! वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ गेली तर संधी हातून निसटते. वेळेबाबत उदाहरण देताना खालिद म्हणतात, वेळ ही एका वेगवान घोड्यासमान आहे. त्याच्या डोक्यावर भरगच्च केसांचा झुपका आहे अन् घोड्याचे इतर शरीर विनाकेसाचे आहे. घोड्याचे कसे मुठीत वेळीस धरले तर आपण त्याच वेगाने धावू शकतो. घोड्याच्या डोक्यावरचे केस हातून निसटले (अर्थात वेळ निघून गेली) तर घोड्याचा कितीही पाठलाग करा, तो हाती लागणार नाही. वेळेचे हे उत्तम उदाहरण अनेक तरुणांना भविष्यासाठी सुवर्ण सल्ला ठरले आहे.
जश्न-ए-अदब या ना नफा आणि साहित्यिक स्वयंसेवी संस्था, मुंबई यांच्या बॅनरखाली कैसर खालिद हे लोकजागृती करत आहेत. उर्दू आणि हिंदी साहित्य आणि कलेच्या माध्यमातून भारताच्या संयुक्त संस्कृतीची मूल्ये जनमाणसात पोहोचवण्याच्या कामात कैसर खालिद यांचा खारीचा वाटा आहे. इतकेच नव्हे तर कैसर कालिद यांची शौर-ए-असर, दश्त-ए-जा.एन ही पुस्तके तर संपादित केलेले दीवाने-शाद अजीमाबादी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
न्याय, सहानुभूती आणि जातीय सलोखा, एकत्रित संस्कृतीला चालना, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून पहिल्यांदाच हिंदी व ऊर्दू भाषिक साहित्यांकांना एका मंचवर एकत्रित आणून मराठी साहित्यांचा उदो उदो करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांसाठी महिला कमांडो बटालियन उभारणे, मुंबई शहरात रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मोहीम राबविली. निसर्गावर प्रेम करणाऱ्या खालिद यांनी पर्यावरण संवर्धनासाठी उत्तम कार्य केले.मोठ्या प्रमाणात वनीकरण मोहीम सुरू केली. समाजातील विविध घटकांचे एकीकरण यावर विश्वास असलेल्या कैसर खालिद यांची अंगी असलेल्या अष्ठपैलू व्यक्तिमत्वाचा आदर करत महाराष्ट्र शासनाने त्यांना सन 2009 साली वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित केले. याजोडीला महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार, प्रेमचंद सन्मान, इंडियन बिझिनेस अँड प्रोफेशनल्स कौन्सिल दुबई एक्सलन्स इन लीडरशिप अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्काराने कैसर खालिद यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सध्या जगावर कोरोनाचे (कोविड-19) सकंट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या लाकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या मजुरांना, कामगारांना बसला आहे. सदर बाब लक्षात घेऊन पासबान-ए-अदब या सेवाभावी संस्थेकडून दररोज २० हजारांहून अधिक नागरिकांना अन्नाचे वाटप केले जात आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पासबान - ए - अदब संस्थेचे अध्यक्ष (आयपीएस) विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने ‘खाकीतला अन्नदाता’ नागरिकांसमोर आला आहे.
कर्तव्यासोबत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आयपीएस कैसर खालीद यांनी पासबान - ए - अदब संस्थेची स्थापना केली. कायम समाजसेवेसाठी अग्रेसर असलेली ही संस्था लॉकडाऊन काळात मदतीसाठी पुढे सरसावली. हाताला काम नसल्यामुळे अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ एपीएमसी मार्केटमधून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, भाजीपाला विकत घेऊन गोवंडी परिसरात लॉकडाऊनचे नियम पाळत गरजूंसाठी अन्नपदार्थ तयार करण्यात येत आहे. या अन्नपदार्थांचे पॅकेट तयार करून सदर पॅकेट काळजीपूर्वक मुंबई उपनगरात वाटण्यासाठी नेले जाते.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून (लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत) नित्याने मुंबई उपनगरातील गोवंडी, शिवाजी नगर, बैगनवाडी, मानखुर्द, चिता कॅम्प, चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, विक्रोली, नागपाडा, मदनपुरा आदी परिसरात २० हजारांहून अधिक नागरिकांना दररोज अन्नपदार्थाच्या पॅकेटचे वाटप केले जात आहे. तसेच या संस्थेचे सदस्य सजासेवक आरशद खान हे आपल्या इतर सहकार्यांसोबत गरजू व्यक्तींच्या घराेघरी जाऊन
5 किलो तांदूळ, 5 किलो पीठ, तूरडाळ, मसूर डाळ, साखर, कांदे, बटाटे आदी प्रत्येकी 1 किलो तर 1 लिटर तेल व 250 ग्रॅम चहापती आदी जीवनाश्यक वस्तू देत आहेत. मुंबई प्रमाणे राज्यात ठिकठिकाणी अशा प्रकारे स्थिती आहे. मात्र मुंबईबाहेर अन्न वाटप करणे शक्य होत नसल्याने त्या ठिकाणी आर्थिक मदत पोहोचवली जाते. आर्थिक मदत मिळताच गरजू नागरिक अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य विकत घेऊन कुटुंबाचा व स्वत:चा उदरनिर्वाह करत आहेत. या सामाजिक कार्यामुळे पासबान - ए - अदब ही संस्था कायम चर्चेत राहिली आहे.
अशा या अष्ठपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आयपीएस कैसर खालिद यांना वाढदिवसाच्या "युवा सामना मिडिया" परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा!
Monday, July 13, 2020
औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता यांना औरंगाबाद दुध डेअरी जवळ सुसज्ज २०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयाची तात्काळ निविदा प्रक्रिया पुर्ण करुन बांधकाम सुरु करण्याचे पत्राव्दारे कळविले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात पुढे नमुद केले की शहरात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुने थैमान घातले असुन त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. कोविड-१९ विषाणु बाधित रुग्णांना उपचारासाठी शहरात शासकीय अथवा खाजगी रुग्णालयामध्ये बेडच उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णावर योग्य तो वैद्यकीय उपचार सुरु होण्यासाठी विलंब लागत असल्याने अनेक रुग्ण गंभीर आजारी होवुन दगावलेले आहे.
औरंगाबाद दुध डेअरी जवळ महिला व शिशुसाठी सुसज्ज २०० खाटांचे रुग्णालय तात्काळ पुर्ण करण्याचे आदेशच मा.उच्च न्यायालयाने दिल्याने औरंगाबाद जिल्ह्याव्यतिरिक्त संपुर्ण मराठवाडाच्या जनतेला त्याचा फायदा होणार आहे. रुग्णालयासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी स्वत: शासनाच्या विविध स्तरावर पाठपुरावा करुन रुग्णालय तात्काळ बांधण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. इम्तियाज जलील विरुध्द महाराष्ट्र शासन याचिकेच्या सुनावणीत मा.उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमुद केले आहे की, रुग्णालयाचे संपुर्ण नविन बांधकाम हे सर्व सोयीसुविधासह मा.उच्च न्यायालयाच्या निगराणीत होणार आहे.
सदरील रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या फेब्रुवारी २०२० च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी सुध्दा मंजुर करण्यात आलेला आहे. महिला व शिशुसाठी २०० खाटांचे रुग्णालयाचे काम त्वरीत सुरु केल्यास भविष्यात कोविड-१९ सारख्या संसर्गजन्य तसेच महिला व शिशुचे विविध आजारावर मात करण्यासाठी वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध राहील.
*बाळासाहेबांच्या नावाने रुग्णालय उभारावे – खासदार इम्तियाज जलील*
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहरात महानगरपालिका आढावा बैठकीत अधिकाऱ्याना सुचना दिल्या की, शहरात लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकाचे काम पुर्ण करावे. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली की, बाळासाहेब यांचा स्मारक उभारण्या ऐवजी त्यांच्या नावाने सिडकोच्या त्याच जागेवर मोठे रुग्णालय बांधले तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल. शहराला स्मारक ऐवजी रुग्णालयाची अत्यावश्यक गरज आहे, जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होणार आहे. महाआघाडी सरकारला जनतेची काळजी नाही का ? महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता आहे मग त्यांना हे कळत नाही का सर्वात जास्त महत्व कोणत्या कामाला देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=311688116875361&id=103772211000287
Tuesday, April 28, 2020
औरंगाबाद, 20 एप्रिल, देश आणि राज्य कोरोनाशी लढत असताना मजूर व कष्टकरी लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडल्याने कुटुबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने विविध पक्ष संघटना व स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आले आहे. नेहमी गरजूंना मदत करण्यासाठी ओबेरॉय कुटुंब शहरात अशा संकटकाळी पुढे येताना शहराने बघितले आहे. माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते स्व.मनमोहनसिंग करमसिंग ओबेरॉय सढळ हाताने भूकेल्यांची भूक मिटवण्यासाठी नेहमी तत्पर असायचे त्याच पध्दतीने त्यांचे सुपूत्र राष्ट्रवादी पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा काळी-पिवळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नवीन मनमोहनसिंह ओबेरॉय यांनी २ हजार कुटुंबांना अन्नदान केले आहे. ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला पाच कीलो आटा, दोन किलो तांदूळचे वाटप सोशल डिस्टन्सचे पालन करत करण्यात आले. उस्मानपुरा येथील निवासस्थानी गरजूंना मदतीचे वाटप करण्यात आले असे नवीन ओबेरॉय यांनी सांगितले.
Friday, February 14, 2020
युवा सामना मिडिया विशेष लेख(बेग एम.एन.)
राज्याचा कारभार जिथून चालतो, नियंत्रीत केला जातो ते मंत्रालय नक्की कुणाचे आहे ? सामान्य जनतेचे की वशिल्याच्या तट्टूंचे ? हा प्रश्न मंत्रालयात गेल्यावर अनेकवेऴा पडल्याशिवाय रहात नाही. मंत्रालयाच्या दारावर गेल्या गेल्या पहिलीच पाटी वाचायला मिऴते ती म्हणजे सामान्य जनतेसाठी दुपारी दोन नंतर प्रवेश. मंत्रालय सकाऴी सुरू होते दहाला आणि सामान्य जनतेला प्रवेश दुपारी दोनला. सकाऴी आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि या सर्वांच्या वशिल्याच्या तट्टूंनाच प्रवेश दिला जातो. म्हणजे जे व्हीआयपी आहेत त्यांनाच प्रवेश दिला जातो. राज्याच्या काना-कोपर्यातून आलेला सामान्य माणूस दुपारी दोन वाजेपर्यंत मंत्रालयाच्या भव्य इमारतीकडे आशाऴभूत नजरेने पाहत राहतो. त्याच्यासमोर अनेक व्हीआयपी, वशिल्याचे तट्टू आत जातात, बाहेर येतात पण गेटवरचे पोलिस त्याला गेटजवऴही थांबू देत नाहीत. तो गेटवर आला की तिथून त्याला हुसकावून लावले जाते. त्याने तिथं उभं राहून मंत्रालयाकडे पहायचेही नाही. त्याची तेवढीही लायकी नाही. तो तिथे आला की खाकीतले बाबू अंगावर येतात. कुत्रे हाकलतात तसे त्याला हाकलतात. लोकांनी कामासाठी गावाकडून आदल्या दिवशी यायचे. ना जेवायची सोय ना रहायची सोय. फुटपाथवर किंवा रेल्वे स्टेशनवर वेऴ काढायचा. रेल्वे स्टेशनवरील शौचालयात अंघोऴ करायची. रस्त्यावरच वडा-पाव किंवा कायतरी खायचे आणि सका-सकाऴी मंत्रालय गाठायचे. तिथे गेल्यावर पास काढायला रांगेत उभे रहायचे. रांगही अशी की डोक्यावर छत्र नाही. भर उन्हात होरपऴत उभे रहायचे. त्या रांगेत उभं राहून पास काढला अन गेटवर गेले की तिथे थांबवले जाते. तुम्हाला आत्ताच नाही दुपारी दोन नंतर सोडले जाईल म्हणून गेटवरचा पहारेकरी आदेश देतो. परत झकमारत आणि ताटकऴत तिथेच कुठेतर थांबावे लागते. गेटजवऴ नाही थांबायचे कारण कँमेर्यात आतल्या साहेबांना दिसते आणि मग ते पहारेकर्यांना शिव्या घालतात म्हणे. म्हणून ते कुत्रे हाकलल्यासारखे लोकांना हाकलतात. त्यामुऴे गेटपासून काही अंतरावर आशाऴभूत आणि हतबल मानसिकतेने जनता ताटकऴत बसते. या मंत्रालयाचा मालक असलेली जनता रोज मंत्रालयाच्या दारातच विटंबीत होते, अपमानित होते. याची खंत कुणालाच वाटत नाही हे विशेष.
सामान्य जनतेला सकाऴी मंत्रालय सुरू होतानच प्रवेश दिला गेला पाहिजे. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्याला नमस्कार करून, सलाम ठोकून प्राधान्याने आत घेतला पाहिजे. कारण तोच त्या मंत्रालयाचा खराखुरा मालक आहे. बाकी आमदार, खासदार, मंत्री किंवा अधिकारी हे त्याचे नोकर आहेत. नोकरांनीच मालकाच्या संपत्तीवर कब्जा केला आहे. नोकरच मालक झाले आहेत. सामान्य माणसाला मंत्रालायात दुपारी दोनला प्रवेश देण्यात येतो. पण आत आल्यावर त्याला ज्या टेबलला पोहोचायचे आहे तिथवर जाईपर्यंत पाच वाजतात. या माऴ्यावरून त्या माऴ्यावर आणि या टेबलवरून त्या टेबलवर त्याला कोलले जाते. मुऴात जिथे काम आहे ते कार्यालय आणि तिथले साहेब भेटणे म्हणजे मटक्यातला जँकपॉट लागण्यासारखे आहे. वेऴेत कार्यालय सापडले तर आतले बाबूराव जेवायला सुटलेले असतात. जेवण केल्यावर थोडसं इकडे-तिकडे, मग लघूशंकेला, तोवर चहाची वेऴ होते. चहाची वेऴ झाली की थोड्या वेऴाने सुट्टी होते. साहेब घरी जायच्या तयारीला लागतात. आपलं काम घेवून आलेला माणूस वाट पहात बसलेला असतो. आपलं काम कधी होणार ? या विवंचनेत थांबलेल्या माणसाला उद्या येता का ? म्हणून सांगितले जाते. जिथं एक दिवस थांबायची औकाद नाही तिथे दुसरा दिवस कसा काढायचा आणि कुठे काढायचा ? हा आक्राऴ-विक्राऴ प्रश्न असतो. पण सामान्य माणूस या सगऴ्या कात्रीतून प्रवास करतो. काही अधिकारी चांगले आहेत. माणूसकीला जपणारे आहेत. समोरच्या माणसाला समजून घेतात. स्वत:चे कर्तव्य आणि प्रामाणिकपणा जपणारे असतात. समोरच्याचे दु:ख जाणून घेत, अडचण समजून घेत तत्परतेने काम करतात. पण काही अधिकारी या पठडीत मोडत नाहीत. त्यांना एकतर आमदार-खासदार आणि मंत्र्याची शिफारस लागते किंवा हात ओले करून दिले तरच कागद पुढे सरकतो, अन्यथा नाही. काम टाऴण्यासाठी तारीख पे तारीख सुरू करतात. अनेक कुरापती काढून काम टाऴले जाते. हे आणा, ते आणा असे सांगून समोरच्या माणसाला कोलले जाते. हेलपाटे मारायला लावले जातात. हे मंत्रालयातलं विदारक वास्तव आहे. त्यामुऴे मंत्रालय नक्की कुणाचं ? हा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.
लोकशाहीत लोक मालक असतात. पण ही मालकी आहे ती फक्त संविधानात आणि नागरिक शास्त्राच्या पुस्तकातच. वास्तव यापेक्षा वेगऴे आहे. वास्तवात लोक लाचार, मजबूर आणि हतबल आहेत. त्याला कुणी वाली नाही, त्याला कुणी धनी नाही. नेते मंडऴी निवडणूका होईपर्यंतच लोकांच्यापुढे झुकतात, वाकतात. त्यांना नमस्कार करतात. त्याला राजा म्हणतात. पण निवडणूका झाल्या की या राजाला भिकेला लावतात. हेच इथले वास्तव आहे. सामान्य माणूस जर राजा असता, मालक असता तर तो रोज असा अपमानित झाला नसता. त्याची रोज अशी फजिती झाली नसती. मंत्रालयातच नव्हे तर प्रत्येक सरकारी कार्यालयात साहेबांना भेटण्यासाठी त्याला ताटकऴत ठेवले नसते. त्याची वेऴ दुपारनंतरची ठेवली नसती. लोकशाहीत मालक असलेल्या जनतेची ही क्रुर चेष्टा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांनी ही बाबूशाही मोडीत काढावी. त्यांनी सामान्य जनतेला न्यायाची व सन्मानाची वागणूक द्यावी. बाबूशाही मोडीत काढून लोकशाहीला पुरक काम करावे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी लोकाभिमुख काम केले. त्यांना लोकांनी डोक्यावरही घेतले आहे. तसे लोकाभिमुख काम करण्याची संधी उध्दवजी यांना आहे. त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा लोकाभिमुख करावी. लोकांची गैरसोय होणार नाही याची काऴजी घ्यावी. केवऴ मंत्रालयच नव्हे तर सर्व सरकारी कार्यालयातील अशा पाट्या काढून टाकाव्यात. सामान्य माणसाला कार्यालय सुरू झाल्या-झाल्या प्रवेश द्यावा. कुणी कितीही मोठा साहेब असला तरी तो जनतेपेक्षा मोठा नसतो. तो जनतेचा नोकर असतो. त्याने कार्यालयात येणार्या सामान्यातल्या सामान्य माणसाला अदबीने भेटले पाहिजे. त्यांच्याशी अदबीने बोलले पाहिजे. त्याची सन्मानाने विचारपुस करत त्याचे काम केले पाहिजे. खरेतर त्याला सलामच ठोकला पाहिजे कारण तो मालक असतो. लोकशाहीत जनता मालक आहे. मालकाचा रूबाब असायला हवा पण इथे नोकरांचा रूबाब आहे. इथल्या व्यवस्थेने मालकाला लाचार केले आहे. त्याची अवस्था दऴभद्री करून ठेवली आहे. मंत्रालयातच लोकशाही हूतात्मा होते. तिचा मुडदा पाडला जातो मग ती राज्यात इतर ठिकाणी कशी जीवंत राहणार ? हा महत्वाचा प्रश्न आहे.
हयावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे व जनतेला न्याय देण्याचे काम करावे,असे आव्हान जनतेकडून होत आहे.
Friday, February 7, 2020
दि.7 फरवरी 2020 को औरंगाबाद का सबसे गजबज इलाका(खाऊ गल्ली) बुडडीलैन मे ताज खलिया हाऊस का इफतेताह जामा मस्जिद के ईमाम मौलाना जाकेर साहाब के हाथो अमल मे आया,इस वक्त संचालक अल्ताफ नसिर बेग और सोहेल यार खान और सामाजिक कार्यकर्त्या शेख वाजेद पाशा, शेख अखिल,
जुनैद खान बिल्डर,खिजर फारूकी, मुश्ताक बेग, और दिगर चाहने वाले मौजुद थे.
मौलाना जाकेर साहाब ने कारोबार मे बरकत के लिये दुआ की.
Sunday, January 19, 2020
plz share
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या 240 जागांसाठी 15 मार्च 2020 रोजी पूर्व परीक्षा मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद येथील केंद्रांवर घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठीची अर्हता, अभ्यासक्रम, महत्वाची संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
⏰एकूण पदे – 240
🎓शैक्षणिक पात्रता –
डिप्लोमा/ डिग्री इंजिनिअरिंग
अधिक माहितीसाठी पहा- mpsc.gov.in
💻पूर्व परीक्षा – 15 मार्च 2020
💵फी- मागासवर्गीय 274
ओपन 374
माजी सैनिक 24
★ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रूवारी 2020
*MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा अभ्यासक्रम व महत्वाचे संदर्भ*
MPSC ने सदर पदासाठीचा अभ्यासक्रमात 3 घटक अंतर्भूत केले आहेत.परीक्षेत 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी असून परीक्षेचा कालावधी 1 तासांचा आहे.
*घटक 1: सामान्य अध्ययन(50 प्रश्न)*
यावर 50 प्रश्न विचारले जात असून अभ्यासक्रमात सामाजिक व औद्योगिक सुधारणा,सामान्य विज्ञान,भारताचा सामान्य इतिहास व भूगोल(विशेष संदर्भ महाराष्ट्र), नागरिकशास्त्र(राज्यव्यवस्था) व चालू घडामोडी या विषयांचा समावेश आहे.या घटकांच्या तयारीसाठी पुढील पुस्तके अभ्यासणे महत्वाचे आहे.
1.PSI, STI, ASO पूर्व परीक्षा के'सागर सरांचा ठोकळा(83 वी आवृत्ती)- या पुस्तकात सामान्यज्ञान घटकांची माहिती अतिशय नेमकेपणाने व परिक्षभिमुख पद्धतीने मांडली आहे. तसेच अलीकडील चालू घडामोडी, नागरिकत्व अधिनियम याचीही माहिती यात समाविष्ट आहे.प्रत्येक घटकावर महितीनंतर भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न दिले आहे.
2.समाजसुधारक - के'सागर/प्राचार्य डॉ.गाठाळ/डॉ.अनिल कठारे
3.औद्योगिक सुधारणेसाठी अर्थव्यवस्थेवरील डॉ.किरण देसले/ नागेश गायकवाड/रंजन कोलंबे यांचे पुस्तक अभ्यासावे.
4.इतिहास व भूगोल साठी 6 ते 11 वी पाठ्यपुस्तके तसेच खतीब/ सवदि यांची पुस्तके अभ्यासा.
5.राज्यव्यवस्थेसाठी - विनायक घायाळ/रंजन कोळंबे/लक्ष्मीकांत अभ्यासावे.
6.सामान्य विज्ञान - अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/डॉ.सचिन भस्के
7.चालू घडामोडी साठी इद्रिस पठाण/ राजेश भराटे/ डॉ.सुशील बारी/ बालाजी सुरणे/परिक्रमा मासिक यांची चालू घडामोडी व वार्षिकी पुस्तके वापरावीत.
*घटक 2: यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी व त्यासंबंधित चालू घडामोडी (20 गुण)*
1.MPSC AMVI Mechanical & automobile engineering - Shubhangi Tambvekar, K'Sagar Publications
2.MPSC AMVI मोटार वाहन चालविण्याचे आणि वाहतुकीबाबतचे कायदे व नियम - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स ( या पुस्तकातून सोप्या भाषेत मोटार वाहन तांत्रिक माहिती तसेच मोटार वाहन कायदा 1988 व अलीकडील मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा 2019 ची माहिती मिळेल, ते परीक्षेतील तांत्रिक चालू घडामोडीसाठी उपयुक्त ठरेल.)
3.तसेच Mechanical & automobile engineering घटकांशी सम्बधित डिप्लोमा व पदवीच्या विषयाचा अभ्यास करावा.तसेच सी.चांद प्रकाशनची या घटकांशी सम्बधित वस्तुनिष्ठ पुस्तके अभ्यासावीत.
*घटक 3: बुद्धिमापन चाचणी(30 प्रश्न)*
बुद्धिमापन चाचणीसाठी फिरोज पठाण/के'सागर/अनिल अंकलगी/आर.एस.अग्रवाल यांची पुस्तके अभ्यासावीत.
*share other groups and friends*
Thursday, January 2, 2020
तक्रार घेण्यास एम.आय.डि.सी सिडको पोलीस निरीक्षकांचा नकार, पोलीस विभागाचे मनमानी कारभार
औरंगाबाद: २ जानेवारी२०१९ बुधवार
(युवा सामना मिडिया न्युज नेटवर्क)
पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले यामुळे आज देशात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद शहरातील पत्रकार सय्यद नासेर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज औरंगाबाद पत्रकार संघ यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना निवेदन दिले व हल्ला करणारे पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
युवा सामना मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार,
३१ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ९ च्या दरम्यान नविन २०२० वर्षाच्या स्वागतासाठी वार्तांकन करण्यासाठी गेलेले WITNESS Media चे प्रतिनिधी सय्यद नासेर सैफोद्दीन, वय ३४, राहणार पटेल लॉन्स, बीडबायपास, औरंगाबाद गेले असता मोटारसायकल पार्किंग करण्याच्या कारणावरुन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार व दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तोंडावर व पायावर दुखापत होईपर्यंत बंदोबस्तात तैनात असलेल्या या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली आहे. आधार कार्ड, प्रेसचे कार्ड हिसकावून घेतले. जातीवाचक शिविगाळ पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. आज सकाळी अकराच्या दरम्यान पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर पत्रकार सुरक्षा कायदेअंतर्गत कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मळाळेंना निवेदन देण्यात आले. त्यांनी संघटनेला कार्यवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल वैद्य, उपाध्यक्ष शेख मोहसिन, रविंद्र सुरडकर, दूर्गादास अपार, मिलिंद मकासरे, अब्दुल कय्यूम, शेख मुख्तार, सैय्यद सैफ, शेख जाकेर, अहेमद अलहामेद, अनिस रामपूरे, शेख आदील आदींची वरील छायाचित्रात दिसत आहे.
दोषी कर्मचाऱ्यांवर पत्रकार सुरक्षा कायदेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणून आज गुरुवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची शिष्टमंडळाने भेट घेवून कार्यवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही भेट घेवून पत्रकार सेवा संघाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करुन कार्यवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल वैद्य, उपाध्यक्ष शेख मोहसिन, रविंद्र सुरडकर, दूर्गादास अपार, मिलिंद मकासरे, अब्दुल कय्यूम, शेख मुख्तार, सैय्यद सैफ, शेख जाकेर, अहेमद अलहामेद, अनिस रामपूरे, शेख आदील आदींची उपस्थिती होती.
सदरील पोलिसांना निलंबित न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा औरंगाबाद पत्रकार संघ यांनी दिला आहे.
*आज देशात पत्रकारांवर होणारे हल्ले याला पाहता नागरिक किती सुरक्षित आहेत व नागरिकांना पोलिस विभाग किती सहकार्य करत असेल ह्या वरून आपल्याला सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
*पोलीस झाले ओलीस*
'सदरक्षणाय खलनिग्रहण'हे ब्रीद वाक्य आपण ऐकला असेल, हे ब्रीद वाक्य म्हणजे संरक्षण करणारे व कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस यांच्यासाठी वापरण्यात येते.
परंतु आज पोलिसच ओलीस झाल्याचे दिसते. कारण म्हणजे पोलीस आपले कर्तव्य निभवत नाही व आपल्या वर्दीची माज व मस्ती दाखवण्या मध्ये मग्न दिसत आहे.
हे आता कुठं कुठं थांबले पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी लक्ष घातले पाहिजे.
*कायदा व सुव्यवस्थेचा भंग*
जेव्हा पोलिस स्वतः कायदा व सुव्यवस्थेला तेच पोहोचवत असेल व संरक्षण करण्याएवजी नागरिकांना पत्रकारांना चोप देण्यात मज्जाव करण्यात व्यस्त असेल, तेव्हा कुठं कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा बाळगावी हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे.
Tuesday, December 10, 2019
आरेफ कॉलनीत सर्वत्र फिरून आयुक्तांकडून पाहणी
औरंगाबाद/प्रतिनिधी
मनपाचे नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी पदभार घेताच पहिला दणका अधिकाऱ्यांला दिल्याने प्रत्येकाला त्यांच्या कार्यपद्धतीची चुणूक लागली आहे. मंगळवारी (दि.१०) दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी आरेफ कॉलनीत फिरून पाहणी केली. या कॉलनीत जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, अनधिकृत बांधकामे, मालमत्ता कर आकारणी न झाल्याचे पाहून आयुक्त अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. परवानगी न घेणाऱ्या बांधकामावर तात्काळ कारवाई करून कर आकारणी करा तसेच दोन दिवसात परिसरातील कचरा उचलून स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेचे नवीन आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे मंगळवारी सकाळी ८ वाजता थेट वॉर्डातील पाहणी करण्यासाठी मनपाच्या प्रभाग क्रमांक एक मधील आरेफ कॉलनीत धडकले. टॉऊन हॉलपासून त्यांनी पाहणीला सुरुवात केली. आरेफ कॉलनीत जाताच मोठया प्रमाणावर बांधकामे सुरु असल्याचे निदर्शनास आले. या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे का? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना करताच अधिकाऱ्यांनी परवानगी न घेता बांधकामे सुरु असल्याचे सांगितले. रस्त्यावर टाकण्यात आलेले बांधकाम साहित्य, त्यानंतर रस्त्यावरुन जाताना जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहताच या भागात स्वच्छता होत नाही का? प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. कचरा उचलून स्वच्छता करावी, कचरा टाकण्यासाठी डस्टबीन ठेवाव्यात, नागरिकांकडून डस्टबीनमध्ये कचरा टाकला जात नसेलतर त्यांना जागेवर दंड करावा अशी सूचना केली आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांच्यासोबत नगररचनाचे सहायक संचालक आर. एस. महाजन, कर निर्धारक व संकलक अधिकारी करणकुमार चव्हाण, वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आय. बी. ख्वाजा, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नंदकिशोर भोंबे, नगररचना विभागाचे उपअभियंता संजय कोंबडे आदी अधिकारी उपस्थिती होते.
टोलेजंग इमारती मात्र कर आकारणी नाही
आरेफ कॉलनीत टोलेजंग इमारती पाहून आयुक्त पांडेय अवाक झाले. या मालमत्ताना कर आकारण्यात आला आहे का? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला मात्र, अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. इमारतींना कर आकरण्यात आला नसेलतर व्यावसायिक कर आकरणी करुन डिमांड नोट द्या, या भागातील कर वसुल झालाच पाहिजे, अशी तंबी आयुक्त पांडेय अधिकाऱ्यांना दिली.
खाम नदी पात्रात अतिक्रमणे
आरेफ कॉलनी नजीक असलेल्या खाम नदी पात्रात अतिक्रमण करुन मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याचे पाहून आयुक्तांचा चांगलाच पारा चढला. नदीपात्रात एवढे अतिक्रमण होत असताना तुम्हाला कारवाई करता आली नाही का? असे अधिकाऱ्यांना विचारतात अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. नदीपात्रातील कचरा उचलून नदी स्वच्छ करा, यासाठी जेसीबी ऐवजी दोन ते तीन कर्मचारी लावा. शहरात कचरा वेचक आणि भंगारवाले कचरा उचलण्यासाठी मदतच करतात. कचरा वेचकांच्या मदतीने कचऱ्याचे वर्गीकरण करता येते. तसेच भंगारवाले देखील मदत करतात. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांचे सहकार्य घ्या अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
...तर निलंबित केले असते
आरेफ कॉलनीची अवस्था पाहून आयुक्त आस्तिककुमार पांडेय चांगलेच संतापले होते. पाहणीचा पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला निलंबीत करत नाही,अशा शब्दात त्यांनी वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशीत अधिकारी वामन कांबळे यांची चांगलीच कानउघाडणी केली. यामुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
आयुक्त दुचाकीवर फिरून करणार पाहणी
आयुक्त अस्तिकुमार पांडेय यांनी पहिल्या दिवशी आरेफ कॉलनीत फिरुन पाहणी केली. त्यानंतर बुधवारपासून (दि.११) सर्व वॉर्डात दुचाकीवरुन फिरून पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वॉर्डात फिरताना वॉर्ड अधिकारी, नगररचना अधिकारी, इमारत निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मालमत्ता अधिकारी, पाणी पुरवठा अभियंता, वॉर्ड अभियंता यांनी सोबत राहावे अशी सूचना केली.
फोटो-युवा सामना मिडिया न्युज नेटवर्क औरंगाबाद.
आयुक्तांसमोर जातांना जरा विचार करून जावे, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दबक्या आवाजात चर्चा
प्लास्टिक पॅकिंगमध्ये पेन आणल्याबद्दल पाचशे रुपयांचा दंड
औरंगाबाद / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी (दि.9) पदभार घेताच प्लास्टीक कॅरिबॅगमध्ये पुष्पगुच्छ आणलेल्या नगररचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. याची चर्चा थांबत नाही तोच दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.10) भाजपच्या नगरसेविकेलाही आयुक्तांनी दणका दिला. गिफ्ट देण्यासाठी प्लास्टीक कव्हरमध्ये पेन आणलेल्या नगरसेविका मनिषा मुंडे यांनाही 500 रूपये दंडाची पावती फाडावी लागली. यामुळे पालिकेत आता चुकीला माफी नाही हे आयुक्तांनी कृतीतून दाखवून दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात प्लास्टीक बंदीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. अस्तिककुमार पाण्डेय यांनी आयुक्तपदाची सूत्रे हातात घेताच प्लास्टीक बंदीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. प्लास्टिक वापरताना कोणी निदर्शनास आले तर स्वतः आयुक्त त्यांना दंड आकारत आहे. सोमवारी आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी पुष्पगुच्छ घेवून आयुक्तांचे स्वागत करण्यास त्यांच्या दालनात जात होते. दरम्यान, नगररचना विभागाचे सहायक संचालक आर. एस. महाजन हे आपल्या सहकार्यांसह आयुक्तांच्या स्वागतासाठी प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून पुष्पगुच्छ घेवून गेले. प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून आणलेले पुष्पगुच्छ समोर येताच आयुक्तांनी त्यांना पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला. त्यानुसार महाजन यांच्याकडुन जागेवर दंडही वसुल केला. याची चर्चा थांबत नाही तोच मंगळवारी सकाळी भाजपच्या नगरसेविकेला प्लास्टीक वापराचा दंड भरावा लागला. भाजपचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा नगरसेविका मनिषा मुंडे यांनी आयुक्तांना पेन गिफट केला. मात्र हा पेन प्लास्टिक गिफ्ट पेपरमध्ये पॅकींग करून आणला होता. त्यावर प्लास्टीकचे कव्हर असल्याचे दिसताच आयुक्तांनी आपल्या स्वीय सहायकांना बोलावून मुंडे यांना 500 रूपये दंडाची पावती दिली. तसेच दंडही वसूल केला. या प्रकारामुळे आता पालिकेत नियम डावलून काम करणाऱ्यांना माफी नाही अशी जोरदार चर्चा प्रशासकीय इमारतीत सुरू होती.
औरंगाबाद /शहर बातमी-
शहरात केलेल्या विकासकामांच्या थकित बिलांच्या मागणीसाठी ठेकेदारांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा सोमवारी (दि.9) 68 वा दिवस होता. नवनियुक्त आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी सोमवारी सकाळीच पदभार घेतला. यावेळी ठेकेदारांनी आयुक्तांना निवेदन देत थकित बिले देण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी तूर्तास आंदोलन करणार्या ठेकेदारांची बिले देण्याचे नियोजन करतो, असे आश्वासन दिल्याने आयुक्त पांडे यांच्याकडून ठेकेदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मनपा तिजोरीत खडखडाट असल्याने ठेकेदारांची सुमारे अडीचशे कोटी रूपयांची बिले थकली आहेत. उसने पैसे घेऊन, कर्ज काढून विकासकामे केली आहेत. मात्र बिले थकल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे 3 ऑक्टोबरपासून छोट्या ठेकेदारांनी पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. आजपर्यंत पालिका पदाधिकारी, प्रशासनाने ठेकेदारांना तोंडी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बँक खात्यावर पैसे पडत नाही तोपर्यंत साखळी उपोषणही सुरू ठेवण्याचा निश्चय ठेकेदारांनी केला आहे. या पार्श्वभूमीवरच सोमवारी नवनियुक्त आयुक्त पांडे रूजू झाले. त्यानंतर पालिका मुख्यालयात पाहणी करत असतानाच त्यांना ठेकेदारांनी निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनी बिले देण्यासंदर्भात अधिकार्यांशी चर्चा करून व्यवस्था करतो, असे आश्वासन दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष बबनराव हिवराळे यांनी सांगितले. याप्रसंगी पीएम कन्स्ट्रक्शनचे परशुराम पाथरूट, शेख मुजाहेद, आतिक पालोदकर, गुलाब रसूल, सुरेश डोईफोडे, प्रकाश वाणी, संतोष बिरारे, सलीम चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आता माघार नाही.. म्हणजे नाहीच.....
तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक व प्रशासनाने ठेकेदारांना आश्वासन दिले होते. मात्र बँक खात्यावर बिलांची रक्कम जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली होती. आजही ही भूमिका कायम ठेवली. नवनियुक्त आयुक्त पांडे यांच्याकडूनही आश्वासन मिळाल्याने ठेकेदारांनी साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे.
Monday, December 9, 2019
Wednesday, December 4, 2019
मुंबई - राज्यातील सत्तानाट्य झाल्यानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेल्याने काही शिवसैनिक नाराज झाल्याचं समोर येत आहे. धारावी येथील ४०० शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. भ्रष्ट आणि विरोधी पक्षासोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने हे कार्यकर्ते नाराज होते.
भाजपात सहभागी झालेले शिवसैनिक रमेश नाडार यांनी सांगितले की, शिवसेना भ्रष्टाचारी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. हिंदू पक्षाविरोधात शिवसेनेने हातमिळवणी केल्याने आम्हाला स्वत:ला फसवणुकीची भावना निर्माण झाली. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेत अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. मागील ७ वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढत आहोत. निवडणुकीच्या काळात आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागितली. पण आता त्यांना कोणतं तोंडाने सामोरे जाणार? आम्ही प्रामाणिकपणे लोकांकडे मतं मागितली होती अशा शब्दात रमेश नाडार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचा तर भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. काही शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामेही दिले होते. मात्र, निकालानंतर वेगळीच गणिते आकारास आली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही. यापूर्वी रमेश सोळंकी नावाच्या शिवसैनिकाने मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
IAS Aastikumar Pandey With Wife IPS Mokshada Patil, SP, Aurangabad.
बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद मनपा आयुक्त पदी नियुक्ती, निपुण विनायक यांचे ठिव ठीकाण नाही.
औरंगाबाद/प्रतिनिधी- युवा सामना मिडिया न्युज-
महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक वारंवार सुट्टीवर जात असल्याने त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. पालिका पदाधिकाऱ्यासोबत खटकल्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रयत्नात होते. दिवाळीपासून ते रजा टाकून निघून गेले ते शहरात परतले नाही. शेवटी बुधवारी (दि.४) शासनाने त्यांच्या जागी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने हे आदेश जारी करण्यात आले असून पाण्डेय यांना तात्काळ पालिकेत रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
आस्तिककुमार पांडे यांची फेब्रुवारी महिन्यात अकोला येथून बीडला बदली झाली होती. त्यांनी केलेल्या वाळू माफियाविरोधातील कारवाया, गौण खनीज वाहतूकीतील पारदर्शकता आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे नेहमीच ते चर्चेत राहिले. त्याबरोबरच चला शहर घडवूया ही मोहीम जनतेत स्वच्छतेची व जबाबदारीची जागरूकता निर्माण करणारी ठरली. त्यांची आता औरंगाबाद येथील महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून यशदा प्रकल्पाच्या संचालिका प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती केली आहे.
तब्बल सव्वा महिन्यापासून रजेवर गेलेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे पुन्हा शहरात येणाच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने शहरातील विकासकामांबरोबरच पालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प झाला होता. शहरात असतानाही आयुक्त डॉ. निपुण हे पालिकेत फिरकत नाहीत. यामुळे आयुक्तांविषयी नागरिकांतून नाराजी तर नगरसेवकांविषयी रोष व्यक्त केला जात होता. यासंदर्भात आमदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पालिकेसाठी पूर्णवेळ आयुक्त म्हणून नवीन अधिकारी देण्याची मागणी केली होती. तसेच आमदार अंबादास दानवे यांचीही याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, बुधवारी (दि.४) सामान्य प्रशासन विभागाने डॉ. निपुण विनायक यांच्या जागी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्याने सव्वा महिन्यांत पालिकेला आयुक्त मिळाला आहे.
विकासकामांना गती मिळेल - महापौर घोडेले
महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाल्याने आता विकासकामे झपाट्याने होतील. अस्तिककुमार पांडे यांचे शहरात स्वागत आहे. पालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन हे समन्वय ठेऊन काम करीत आहेत. मात्र, पूर्णवेळ आयुक्त नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दीर्घ प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच उद्धव ठाकरे यांनी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी पूर्ण केली. याबाबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच यासाठी पाठपुरावा करणारे स्थानिक आमदार यांचेही आभार व्यक्त करतो.
समस्यांना एकटे महापौर घोडेले भिडले
शहरात कचराकोंडी उद्भवल्यानंतर महापालिकेचे पूर्णवेळ आयुक्त म्हणून राज्य शासनाने खास दिल्ली येथून डॉ. निपुण विनायक यांना महापालिकेत पाठविले. कचरा प्रश्न आता सुटला असल्याचे पाहून ते गेल्या काही महिन्यांपासून बदलीच्या प्रयत्नात होते. शहरात असूनही डॉ. विनायक हे पालिका मुख्यलयात कमी आणि संशोधन केंद्रात बसून कारभार चालवायचे. त्यात ते वारंवार सुट्टीवर निघून जात असल्याने कायम वादग्रस्त ठरले. याउलट महापौर नंदकुमार घोडेले यांनी जबाबदारीतून पळ न काढता येणाऱ्या सर्व समस्यांना एकट्याने तोंड दिले. डेंग्यूमुळे शहरात 11 जणांचे बळी गेले. अशा परिस्थतीत डॉ. विनायक हे रजा टाकून निघून गेले. मात्र, महापौरांनी एकट्याने अधिकऱ्यांच्या बैठक घेऊन त्यांना कामाला लावले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. ठेकेदारांची कोट्यवधींची बिलं थकली आहेत. त्यांचे आंदोलने, घेराव, निवेदने याला महापौर घोडेले एकटे सामोरे जात आहेत. मात्र, कर वसुलीसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष न दिल्याने अधिकात्यांचेही याकडे दुर्लक्ष राहिले. आता नवीन आयुक्त म्हणून अस्तिककुमार पांडे आले असल्याने पालिकेच्या तिजोरी भरले आणि शहरातील विकासकामे गतीने होतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Thursday, November 14, 2019
औरंंगाबाद : दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेले साईराम इंडस्ट्रीचे मालक सिध्दार्थ बागूल (रा.श्री.स्वामी समर्थ कॉलनी, सिडको महानगर) यांना गुरूवारी (दि.१४) गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. धनादेश अनादर प्रकरणी बागुल यांच्याविरूध्द मुंबईतील माझगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, जमादार गरड,भालेराव, बिडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
----------------------------------------
यंत्रावर काम करताना अपघातात कामगाराचा मृत्यू
औरंंगाबाद : यंत्रावर काम करीत असतांना अचानकपणे यंत्राचा मार लागून सुभाष लक्ष्मण म्हस्के (वय २२, रा.धोंडखेडा) या कामगाराचा मृत्यू झाला. सुभाष म्हस्के हा गुरूवारी (दि.१४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आयसीएल या कंपनीत काम करीत होता. त्यावेळी अचानकपणे त्याच्या डोक्याला यंत्राचा जोरदार धक्का लागून तो बेशुध्द झाला. सुभाष म्हस्के याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार शेख अफसर करीत आहेत.
----------------------------------------
महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
औरंंगाबाद : गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथे राहणार्या शिला गोरख तिनगोटे (वय २४) या महिलेने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिला तिनगोटे हिने गुरूवारी (दि.१४) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिला तिनगोटेला उपचारासाठी घाटीत दाखल केले. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक
औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.
उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली. संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.
भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा
भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...
-
मराठवाड्यातील लाखो रुग्णांना मृत्यूच्या मुखातून खेचून जीवनदान देणारे एकमेव हॉस्पिटल म्हणजे घाटी! या दवाखान्याने कधी गरिबीला हिनवले नाही; ...
-
सिव्हिल कोर्स करा,आत्मनिर्भर बना...... (औरंगाबाद )-MET इन्स्टिट्यूट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या वतीने शासन मान्य कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण ...
-
भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...





















