Thursday, November 14, 2019

देगाव येथे चोदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार....
गटविकास अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यास टाळाटाळ

नायगाव ता.प्रतिनिधी - तालुक्यातील देगाव येथील सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामे बोगस व कागदोपत्री दाखवून निधी तर हडपलाच पण बोगस लाभार्थ्यांच्या नावावर लाखो रुपये शौचालयाचे अनुदानही लाटल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण ग्रामसेवक हे गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या गुडबुक यादीतील असल्याने सदरच्या अर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
       नायगाव तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतला मागच्या चार वर्षात तब्बल ५० लाखाची रक्कम १४ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झाली आहे. पण सरपंच पद लिलावात घेतलेल्या सरपंच सौ. जयश्री सुरेश मोरे व ग्रामसेवक सुर्यकांत बोंडले यांनी संगणमताने निधीची विल्हेवाट लावली आहे. प्राप्त निधीतून सौरदिवे, रेती, गिट्टी, ढबर, बारकी गिट्टी, सिमेंट, मजूरी यावरच मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आला मात्र प्रत्यक्षात कुठलेच काम करण्यात आले नाही. गरोदर माता पोषण आहार, पाणी पुरवठा साहित्य खरेदी,संगणक खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी अदिंच्या बनावट पावत्या जोडण्यात आल्या. अपंगासाठी १३४००० एवढा निधी खर्च केल्याचे दाखवण्यात आले पण अपंगाच्या पदरात काहीच पडले नाही. मागासवर्गीय वस्तीतील स्मशानभूमीत बांधकाम, डब्ल्यू बी एम करणे, सीसी रोड, दगड, सोलींग, शाळेला वाल कंपाऊड बांधल्याच्या कामाच्या बोगस मोजमाप पुस्तीका बनवण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अंगणवाडीत दिड लाखाचे साहित्य खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे पण प्रत्यक्षात तिथे काहीच नाही.
      देगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दि. ३ सप्टेंबर २०१८ रोजी २ लाख २४ हजार ५४० रुपये खर्चून आर ओ बसवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे पण तिथे सध्या परिस्थिती साधे पाणी सुध्दा उपलब्ध नाही. त्याचबरोबर २९ मार्च २०१९ रोजी ३ लक्ष ८३ हजार ६०० रुपये खर्चून गावात विद्युतीकरण करण्यात आले आहे. मात्र संध्याकाळी गावात रस्ता शोधाव लागतो. याती अनेक कामे बोगस तर करण्यात आलीच आहेत पण काही कामे फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली. अशाप्रकारे सरपंच व ग्रामसेवकांच्या संगणमताने शासनाचा निधी हडप केल्याने गावची अवस्था भकास झालेली आहे.
     त्याचबरोबर गावातील बोगस लाभार्थ्यांच्या नावावर संगणमताने शौचालय अनुदानाचे लाखो रुपये हडपण्यात आले आहेत. १४ व्या वित्त आयोगासह शौचालय अनुदानाची रक्कम हडप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करुन तक्रारदारा़च्या उपस्थितीत सर्व प्रकरणाची चौकशी करुन दोषी सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख आरिफ व माधव बैलकवाड यांनी २१ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी नायगाव यांचेकडे केली होती. पण देगावचा ग्रामसेवक हा गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या गुडबूक यादीतील असल्याने चौकशीच्या मागणीला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
दीड वर्ष लोटले तरी कचरा प्रकल्पाचे काम उरकेना ; पडेगाव प्रकल्पात जानेवारीत प्रक्रिया

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात अभूतपूर्व कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर शासनाने मनपा प्रशासनाला भरघोस निधी दिला. पालिकेने शहराच्या चार कोपऱ्यात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित केले. यातील आजघडीला केवळ चिकलठाणा प्रकल्प सुरू करण्यात पालिकेला यश आले. तर अन्य प्रकल्पपैकी प्रगतिपथावर असलेल्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राला जानेवारी उजाडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नारेगाव येथील नागरिकांनी दीड वर्षपूर्वी कचरा डेपोत कचरा टाकण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडी निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्याकरिता शासनाने मनपाला प्रारंभी 90 कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर केला होता. नंतर या डीपीआरची रक्कम वाढतच गेली. पहिल्या टप्प्यात मनपाला यातील 26 कोटी रुपये मिळाले होते. यातून चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यातील चिकलठाणा येथील दीडशे टन क्षमता असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला. तर कांचनवाडी व पडेगाव या केंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे. हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची निविदा स्थायी समितीने फेटाळल्याने. फेर निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे काम वेगाने होत आहे. डिसेंबर मध्येच हा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याच्या उद्घाटनाचे मुहूर्त देखील पदाधिकाऱ्यांकडून शोधले जात आहेत. दुसरीकडे डिसेंबर अखेर येथे यंत्रणा उभी राहील. परंतु प्रत्यक्षात प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया सुरु होण्याकरिता जानेवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या चौघाविरूध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद/प्रतिनिधी
बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची फसवणूक करणार्‍या टोळीचा मुसक्या गेल्या आठवड्यात गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या. या टोळीला अटक केल्यानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली असून या टोळीने केलेले गुन्हे आता एका मागून एक उघडकीस येत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेलया टोळीने आतापर्यंत किती गुन्हे राज्यात केले याची माहिती पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद उर्फ सोनु लक्ष्मण कांबळे, प्रियंका राजू कांबळे (दोघे रा. इंदिरानगर) कचरु जयराम खिल्लारे व जयकर गडवे (दोघे रा. गल्ली नं. २, रमानगर) यांनी न्यायालयात बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, एैपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी) आदी कागदपत्रे  न्यायालयात ७ एप्रिल २०१७ ते २६ ऑक्टोबर २०१८ या काळात सादर केली होती. तसेच सादर केलेली सर्व कागदपत्रे खरी असल्याचे न्यायालयास भासवून न्यायालयाची दिशाभुल केली होती. दरम्यान, विनोद उर्फ सोनू कांबळे, प्रियंका कांबळे, कचरू खिल्लारे, जयकर गढवे यांनी न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी शिवकुमार हिरालाल कावळे (वय ४१, रा.गवळीपुरा, छावणी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायालयाची फसवणूक करणार्‍या चौघाविरूध्द वेदांतननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भदरगे करीत आहेत.
गंगापूर तहसिल आढावा बैठकीत उपस्थित मुद्दे*

दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ दौरा केल्यानंतर गंगापूर तहसिल कार्यालयात संबंधित सर्व वैजापूर, गंगापूर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये खालील मुद्यांवर संबंधीत सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आणि अधिकांऱ्यांना शेतकऱ्यांच्या आणि गावांतील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले.

१) गावातील शेतकऱ्यांच्या पीकांचे लवकरात लवकर पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकीट नुकसान भरपाई देण्यात यावी असे मा.खासदारांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
२) नविन बनविण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व देखभालीची सर्व जिम्मेदारी ही रस्ता पुर्ण झालेल्या दिनांकापासून पूढे दोन वर्षासाठी संबंधित ठेकेदाराची असते. गावातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यां संबंधित ठेकेदारावर व त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. तसेच गावातील सरपंचांनी सर्वाच्या समंतीने नविन रस्त्यांचे ठराव घेवून संबंधित अधिकाऱ्यांना लिखित द्यावे जेणे करुन अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन द्यावा. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन रस्त्यांचे काम लवकर शुरु करण्यासाठी शासनाकडे निधीसाठी त्वरीत पाठपुरावा करण्यात येईल.
३) गावात पोलीस भरतीसाठी हेल्थक्लब व स्टडीरुम, अंगणवाडी, शाळेच्या नविन खोल्या किंवा दुरुस्ती, स्मशानभुमी, कब्रस्थान, सामाजिक सभागृह, मंगल कार्यालय, शादीखाने बनविण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा खासदार निधीतुन आणि शासनाच्या विविध योजनेतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
४) गंगापूर तालुक्यातील सर्व गावपातळीवर नशामुक्ती करण्यात यावी आणि लोकवस्तीत असलेल्या देशी दारुंच्या दुकानावर कार्यवाही करण्यात यावी. जेणे करुन तेथे असलेल्या मुलांना व महिलांना होणारा त्रास टाळता येवु शकतो.
५) दलित समाजाच्या स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्यावी आणि जेथे स्माशान भुमी आहे त्याकडे जाण्यासाठी नविन रस्ता बांधण्यात यावा. दलित वस्ती सुधारणा निधी आणि खासदार निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
६) आजपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयात गावांच्या विकासासाठी जे जे प्रस्ताव आलेले आहे त्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी व संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. 
७) गावात असलेल्या प्रत्येक शाळेची पाहणी करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा तसेच नविन अंगणवाडी, शाळा दुरुस्ती व नविन शाळा इमारती उभारणीसाठी खासदार निधीतुन आणि कंपनीच्या सीएसआर निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच खासदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना स्पष्ट निर्देश दिले कि माझ्या कार्यकाळात कोणताही विद्यार्थी हा बाहेर बसुन शिकतांना किंवा कोणतीही शाळा व अंगणवाडीत टिनशेड मध्ये दिसता कामा नये. 
८) वाळुज, एमआयडीसी, चिकलठाणा मधील कंपन्यांनी सुध्दा त्यांचा सीएसआर निधी गावात विकासकामासाठी, शिक्षणासाठी वापरावा कारण कंपनी जागा, पाणी, लाईट, कर्मचारी  येथून घेते तर त्यांचा सीएसआर निधी सुध्दा स्थानिक गावातील विकासासाठीच वापरावे.
९) औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावांच्या विकासा संबंधीची शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांसोबत त्वरीत बैठक घेण्यात येईल जेणेकरुन गावांचा लवकरात लवकर सर्वांगिण विकास करणे शक्य होईल.
आयुक्त डॉ. विनायकांच्या सुट्यांमुळे आजची सर्वसाधारण सभा रद्द ; महापालिका आकृतिबंधाचा तिढा कायम

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका आकृतिबंध व सेवा भरतीच्या नियमांबाबत 2017 चा प्रस्ताव विखंडीत झालेला नसताना प्रशासनाने नवीन प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. त्यामुळे निर्माण झालेला पेच चर्चा करुन सोडविण्यासाठी बुधवारी (दि.13) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मनपा आयुक्तच दिवाळीपासून सुट्टीवर असल्याने ऐनवेळी ही सभा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे आकृतिबंधाचा प्रस्ताव पुन्हा लटकला आहे.

राज्य शासनाने पालिकेला वारंवार निर्देश देऊन आकृतिंबंध अंतिम करण्यास सांगितले आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आकृतिबंधाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे कामकाज चालवण्यासाठी मनुष्यबळ नसल्याची कायम ओरड करणारे पदाधिकारी, प्रशासनाकडूनच आकृतिबंधासंदर्भात चालढकल सुरु आहे. तत्कालीन महापौर भगवान घडामोडे यांनी 18 जुलै 2017 च्या सर्वसाधारण सभेत पालिकेतील कर्मचारी भरतीच्या आकृतिबंधाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यावेळी 36 दुरुस्त्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, पालिकेच्या आस्थापना विभागाने दोन वर्षात या प्रस्तावावर कुठलाही निर्णय न घेता नवीनच प्रस्ताव तयार करून तो 18 जुलै 2019 च्या सभेत आणला. त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर आणि पालिका अधिकारी संघटनेने आक्षेप घेत जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तेव्हापासून आकृतीबंध वादग्रस्त ठरला.  त्यामुळे चर्चा करुन हा तिढा सोडविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.13)  विशेष सभा बोलावली होती. मात्र, दिवाळीपासून सुट्टीवर गेलेल्या मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांनी अचानक दहा दिवसांची सुट्टी वाढून घेतली. त्यामुळे महापौरांना आकृतीबंधासाठी बोलावलेली विशेष सभा रद्द करावी लागली आहे.


आयुक्त डॉ. निपुण यांच्या सुट्यांमुळे कारभार ठप्प

महापालिका आयुक्त डॉ. विनायक यांच्या वारंवार सुट्टीवर जाण्याने प्रशासनाची शिस्त बिघडली आहे. दिवाळीपासून रजेवर असलेल्या आयुक्तांनी आणखी आठ दिवसांची रजा वाढवून घेतल्याने विकास कामे आणि प्रशासनाचे कामकाज ठप्प पडले आहे. दुसरीकडे निवडणुकीला अवघे चार-पाच महिने उरले असल्याने पदाधिकारी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यात प्रभारी आयुक्त पालिकेत फिरकत नसल्याने अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. विशेष म्हणजे बुधवारी (दि.१३) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे.
*औरंगाबाद रेल्वे स्टेशनची खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबांनी पाहणी केली*

औरंगाबाद (13 नोव्हेंबर) : आज सकाळी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद रेल्वे स्टेशनची पाहणी केली. रेल्वेने दररोज हजारो नागरिक प्रवास करतात यात्रेकरुणा प्रवासा दरम्यान कोण कोणत्या अडी-अडचणीना सामोरे जावे लागते त्या संबंधी प्रवास करणाऱ्या यात्रेकरू सोबत खासदार साहेबांनी चर्चा केली व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कि त्यांनी सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे जेणे करून यात्रेकरूनचा प्रवास सुखकर होईल.
          तसेच औरंगाबाद रेल्वेस्टेशनला अधिक अद्यावत करण्यासाठी अजून कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या या विषयी अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली.
रेल्वे स्टेशनच्या नवीन प्रवेश द्वाराची उभारणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी खासदार साहेबांनी दिली. तात्काळ टिकिटसाठी जास्तीचे बुकिंग काउंटर, ट्रेकची व्यवस्था, प्रवाशांना थांबण्यासाठी नवीन जनरल आणि एसी हॉल, शुद्ध पाण्याची नवीन व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना व आजारी यात्रे करूसाठी व्हील चेरअर ची आणि लिफ्ट ची व्यवस्था तसेच यात्रेकरू साठी सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधांची व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली,  तसेच नवीन बांधकामाचे काही प्रस्ताव असल्यास त्या बनवून द्यावा त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांना चर्च दरम्यान खासदार साहेबांनी सूचना दिल्या. रेल्वेने प्रवासासाठी  येणाऱ्या यात्रेकरूंना पार्किंगची सुविधा,  बस आणि ऑटो रिक्षाची व्यवस्था विषयी लवकरच वाहतूक पोलीस, एस.टी. महामंडळ,  महानगर पालिका अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येईल असे खासदार साहेबांनी प्रतिपादन केले.
        औरंगाबाद रेल्वेस्टेशन पाहणी दरम्यान खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबा सोबत रेल्वेचे सेशन सुप्रिटेन्डेन जाखडे साहेब, असिस्टंट इंजिनीर  विजय कुमार खोबरे, सलीम अहेमद खान, नगरसेवक अबुल हसन हाश्मी आणि रेल्वे विभागाचे इतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्तीथी होती.
जागतिक  मधुमेह दिनानिमित्त उद्या
'उडान' तर्फे मधुमेही बालकांची पदयात्रा

औरंगाबाद दि. १२ - बाल मधुमेहींसाठी कार्यरत 'उडान' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी बाल मधुमेही आणि त्यांच्या पालकांचा सहभाग असलेल्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये बाल मधुमेहींसह संपूर्ण उडान परिवार सहभागी होणार आहे.
इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशन या संयुक्त राष्ट्राच्या मधुमेहाशी संबंधित संघटनेच्या वतीने जगभरातील १७६ देशांमध्ये जगतिक मधुमेह दिनानिमित्त या आजारासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम होत आहे. त्याअंतर्गत औरंगाबादमध्ये या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक संघटनेच्या वतीने दरवर्षी या संदर्भात एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि यंदाचे घोषवाक्य हे 'मधुमेह आणि परिवार' असे आहे.
या पदयात्रेत लहान मुले, त्यांचे पालक सहभागी होतील. यात ढोल-ताशा यांच्या बरोबरच बाल मधुमेही मुले-मुली लेझीम खेळणार आहेत. बाल मधुमेहींसाठी, त्यांच्या उपचारासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन करणारे 'मला वाचवा' असे फलक मुलांच्या हातात असतील.
जालना रोडवरील आकाशवाणी चौक येथून सकाळी सव्वासात वाजता या पदयात्रेला प्रारंभ होईल. ही पदयात्रा मोंढा नाका मार्गे क्रांती चौक आणि परत आकाशवाणी अशी असेल. आकाशवाणी चौकात पदयात्रेचा समारोप होईल.
डॉ. अर्चना आणि डॉ. संपत सारडा यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांपूर्वी साकारलेल्या ;उडान'च्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या माध्यमातून सातशेवर  टाईप वन मधुमेही मुलांवर मोफत उपचार केले जातात, त्यांना स्वावलंबी जीवन जगायला शिकविले जाते, त्यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समाजानेही त्यांना मधुमेहासह स्वीकारावे, ते सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आहेत हे दर्शविण्याकरिता  'उडान' सातत्याने विविध उपक्रमआयोजित करत असते. मधुमेही बालकांच्या पालकांनाही त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. अनेक समाजोपयोगी उपक्रम या मुलांच्या माध्यमातून राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहजपणे सामावून घेतले जावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात तसेच यामुळे या मुलांचा आत्मविश्वास यामुळे वाढतो आणि ते यशस्वी जीवन जगण्यासाठी सज्ज होतात. अशी अनेक मुले आज समाजामध्ये कार्यरत आहेत.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...