आयुक्त डॉ. विनायकांच्या सुट्यांमुळे आजची सर्वसाधारण सभा रद्द ; महापालिका आकृतिबंधाचा तिढा कायम
औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका आकृतिबंध व सेवा भरतीच्या नियमांबाबत 2017 चा प्रस्ताव विखंडीत झालेला नसताना प्रशासनाने नवीन प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. त्यामुळे निर्माण झालेला पेच चर्चा करुन सोडविण्यासाठी बुधवारी (दि.13) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मनपा आयुक्तच दिवाळीपासून सुट्टीवर असल्याने ऐनवेळी ही सभा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे आकृतिबंधाचा प्रस्ताव पुन्हा लटकला आहे.
राज्य शासनाने पालिकेला वारंवार निर्देश देऊन आकृतिंबंध अंतिम करण्यास सांगितले आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आकृतिबंधाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे कामकाज चालवण्यासाठी मनुष्यबळ नसल्याची कायम ओरड करणारे पदाधिकारी, प्रशासनाकडूनच आकृतिबंधासंदर्भात चालढकल सुरु आहे. तत्कालीन महापौर भगवान घडामोडे यांनी 18 जुलै 2017 च्या सर्वसाधारण सभेत पालिकेतील कर्मचारी भरतीच्या आकृतिबंधाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यावेळी 36 दुरुस्त्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, पालिकेच्या आस्थापना विभागाने दोन वर्षात या प्रस्तावावर कुठलाही निर्णय न घेता नवीनच प्रस्ताव तयार करून तो 18 जुलै 2019 च्या सभेत आणला. त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर आणि पालिका अधिकारी संघटनेने आक्षेप घेत जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तेव्हापासून आकृतीबंध वादग्रस्त ठरला. त्यामुळे चर्चा करुन हा तिढा सोडविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.13) विशेष सभा बोलावली होती. मात्र, दिवाळीपासून सुट्टीवर गेलेल्या मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांनी अचानक दहा दिवसांची सुट्टी वाढून घेतली. त्यामुळे महापौरांना आकृतीबंधासाठी बोलावलेली विशेष सभा रद्द करावी लागली आहे.
आयुक्त डॉ. निपुण यांच्या सुट्यांमुळे कारभार ठप्प
महापालिका आयुक्त डॉ. विनायक यांच्या वारंवार सुट्टीवर जाण्याने प्रशासनाची शिस्त बिघडली आहे. दिवाळीपासून रजेवर असलेल्या आयुक्तांनी आणखी आठ दिवसांची रजा वाढवून घेतल्याने विकास कामे आणि प्रशासनाचे कामकाज ठप्प पडले आहे. दुसरीकडे निवडणुकीला अवघे चार-पाच महिने उरले असल्याने पदाधिकारी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यात प्रभारी आयुक्त पालिकेत फिरकत नसल्याने अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. विशेष म्हणजे बुधवारी (दि.१३) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे.
औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिका आकृतिबंध व सेवा भरतीच्या नियमांबाबत 2017 चा प्रस्ताव विखंडीत झालेला नसताना प्रशासनाने नवीन प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. त्यामुळे निर्माण झालेला पेच चर्चा करुन सोडविण्यासाठी बुधवारी (दि.13) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मनपा आयुक्तच दिवाळीपासून सुट्टीवर असल्याने ऐनवेळी ही सभा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे आकृतिबंधाचा प्रस्ताव पुन्हा लटकला आहे.
राज्य शासनाने पालिकेला वारंवार निर्देश देऊन आकृतिंबंध अंतिम करण्यास सांगितले आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आकृतिबंधाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे कामकाज चालवण्यासाठी मनुष्यबळ नसल्याची कायम ओरड करणारे पदाधिकारी, प्रशासनाकडूनच आकृतिबंधासंदर्भात चालढकल सुरु आहे. तत्कालीन महापौर भगवान घडामोडे यांनी 18 जुलै 2017 च्या सर्वसाधारण सभेत पालिकेतील कर्मचारी भरतीच्या आकृतिबंधाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यावेळी 36 दुरुस्त्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे गरजेचे होते. मात्र, पालिकेच्या आस्थापना विभागाने दोन वर्षात या प्रस्तावावर कुठलाही निर्णय न घेता नवीनच प्रस्ताव तयार करून तो 18 जुलै 2019 च्या सभेत आणला. त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर आणि पालिका अधिकारी संघटनेने आक्षेप घेत जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. तेव्हापासून आकृतीबंध वादग्रस्त ठरला. त्यामुळे चर्चा करुन हा तिढा सोडविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (दि.13) विशेष सभा बोलावली होती. मात्र, दिवाळीपासून सुट्टीवर गेलेल्या मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांनी अचानक दहा दिवसांची सुट्टी वाढून घेतली. त्यामुळे महापौरांना आकृतीबंधासाठी बोलावलेली विशेष सभा रद्द करावी लागली आहे.
आयुक्त डॉ. निपुण यांच्या सुट्यांमुळे कारभार ठप्प
महापालिका आयुक्त डॉ. विनायक यांच्या वारंवार सुट्टीवर जाण्याने प्रशासनाची शिस्त बिघडली आहे. दिवाळीपासून रजेवर असलेल्या आयुक्तांनी आणखी आठ दिवसांची रजा वाढवून घेतल्याने विकास कामे आणि प्रशासनाचे कामकाज ठप्प पडले आहे. दुसरीकडे निवडणुकीला अवघे चार-पाच महिने उरले असल्याने पदाधिकारी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यात प्रभारी आयुक्त पालिकेत फिरकत नसल्याने अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. विशेष म्हणजे बुधवारी (दि.१३) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.