Thursday, November 14, 2019

दीड वर्ष लोटले तरी कचरा प्रकल्पाचे काम उरकेना ; पडेगाव प्रकल्पात जानेवारीत प्रक्रिया

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरात अभूतपूर्व कचरा कोंडी निर्माण झाल्यानंतर शासनाने मनपा प्रशासनाला भरघोस निधी दिला. पालिकेने शहराच्या चार कोपऱ्यात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित केले. यातील आजघडीला केवळ चिकलठाणा प्रकल्प सुरू करण्यात पालिकेला यश आले. तर अन्य प्रकल्पपैकी प्रगतिपथावर असलेल्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राला जानेवारी उजाडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नारेगाव येथील नागरिकांनी दीड वर्षपूर्वी कचरा डेपोत कचरा टाकण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडी निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्याकरिता शासनाने मनपाला प्रारंभी 90 कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर केला होता. नंतर या डीपीआरची रक्कम वाढतच गेली. पहिल्या टप्प्यात मनपाला यातील 26 कोटी रुपये मिळाले होते. यातून चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यातील चिकलठाणा येथील दीडशे टन क्षमता असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला. तर कांचनवाडी व पडेगाव या केंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे. हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची निविदा स्थायी समितीने फेटाळल्याने. फेर निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे काम वेगाने होत आहे. डिसेंबर मध्येच हा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याच्या उद्घाटनाचे मुहूर्त देखील पदाधिकाऱ्यांकडून शोधले जात आहेत. दुसरीकडे डिसेंबर अखेर येथे यंत्रणा उभी राहील. परंतु प्रत्यक्षात प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया सुरु होण्याकरिता जानेवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...