Thursday, September 26, 2019

चिकलठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुणपणे हत्या
परिसरात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल


औरंंगाबाद/प्रतिनिधी : चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सिडको एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविले. दिनकर भिकाजी बोर्डे (वय ५०), कमलबाई दिनकर बोर्डे (वय ५०), भगवान दिनकर बोर्डे (वय २६) सर्व राहणार दत्त नगर, चौधरी कॉलनी अशी मयतांची नावे आहेत. मारेकरी अमोल भगीरथ बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.

चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या बोर्डे कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेद्र माळाळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घर उघडून बघीतले असता, घरात सर्वत्र रक्त पसरले होते. तर तीन जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत तीन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविले. हे हत्याकांड कोणत्या कारणाने घडले याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. तरी मारकरी अमोल बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Saturday, September 21, 2019



महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू ; 
दिवाळी अगोदर फटाके फोडण्याची तयारी.
२१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल लागनार

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा आज मुख्य निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली असून महाराष्ट आणि हरियाणात आज दुपारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला एकाच टप्यात मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदारांची नोदणी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा ९ नोव्हेंबरपर्यंत असून २८८ जागेसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत घोडेबाजार करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार असून यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारीची सर्व माहिती देणं गरजेचं असल्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा प्लास्टिक वापरावर बंदी असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर विधानसभा उमेदवारांना २८ लाखापेक्षा अधिक खर्च करता येणार नाही. याबाबत उमेदवारांनी दक्षता घ्यावी असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले.

Thursday, September 19, 2019

औरंगाबाद म.न.पा. आयुक्त निपुण विनायक यांचा रोशन गेट ते सेंट्रल नाका दु चाकीवर तर सईदा कॉलनी येथे पायी दौरा
मा. खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांच्या मार्गदर्शनाखाली एम. आई. एम. चे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंदविला सहभाग
दि. १९ सप्टेंबर २०१९. औरंगाबाद जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत म.न.पा. प्रशासनाला ठणकावून सांगितले कि १० दिवसात औरंगाबाद शहरात असलेला कचरा डेपु स्थलांतर ना केल्यास एम.आई.एम. आक्रमक भूमिका घेणार. औरंगाबाद महानगरपालिका चे आयुक्त श्री. निपुण विनायक यांनी आज औरंगाबाद शहराच्या जुन्या भागामध्ये पायी व दु चाकी वर बसून दौरा केला. रोशन गेट, मदनी चौक, टाकलकर सोसायटी ते सेंट्रल नाका या भागामध्ये पालिका आयुक्तांनी दौरा केला. आयुक्तांनी तेथिल सडकांची दुर्दशा पहिली, रस्त्यातील खड्यांची पाहणी केली व तिथला कचरा डेपो त्वरित स्थलांतर होणार असे आश्वसन दिले. खराब रस्ते, कचरा तसेच मोकाट कुत्र्यांमुळे होणारी गैर सोय नगरसेवकांनी मा. आयुक्तांसमोर मांडली. मा. आयुक्तांनी यांना समस्या हल करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यातील खड्डे अनुभवण्या साठी आयुक्त साहेब स्वतः दु चाकी वर स्वार होऊन त्यांनी सर्व खड्यांचे झटके अनुभवले. सामान्य माणसांना होणारा त्रास त्यांनी अनुभवला. एम.आई.एम. चे नगरसेवक रफिक चिता यांच्या गाडीवर बसून आयुक्त साहेबांनी सादर दौरा केला. रस्त्यांचे खराब हाल बघून आयुक्तांनी लवकरात लौकर रस्ते दुरुस्त व्हावे असे आदेश दिले. रोशन गेट परिसरातील रस्त्यावर असलेले मेन होल बंद करण्याचे देखील त्यांनी आदेश दिले. सईदा कालोनी मधील सर्व अंतर्गत रस्त्यांची त्यांनी पाहणी केली. तुंबलेले पाणी व खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारी गैरसोय हे आयुक्तांनी बघितली. कचरा, खड्डे, दूषित पाणी, खराब रस्ते, ड्रेनेज इ विषयांवर अन्वर खान यांनी मा. आयुक्ता सोबत सविस्तर चर्चा केली व मा. आयुक्तांनी मनपूर्वक विचार करून अधिकाऱ्यांना सर्व कामाचे इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले तसेच रस्ते बनविण्यासाठी म.न.पा. अधिकाऱ्यांना त्वरित एस्टीमेट बनविण्यास आयुक्तांनी सांगितले. या प्रसंगी एम. आई. एम. चे खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांच्या मार्दर्शखाली एम. आई. एम. चे विरोधी पक्ष नेता, गट नेता व नगरसेवकांची उपस्थिती होती. जुन्या शहरामध्ये लवकरच विकास कार्य सुरु होतील असे आश्वासन आयुक्तांनी दिले. सर्व नगरसेवक श्री. नासेर सिद्दीकी, श्री. जमीर अहमद कादरी, श्री. रफिक चिता, डॉ. अफजाल खान, श्री. अरुण बोर्डे, श्री. गंगाधर ढगे, श्री. अरिफ हुसैनी, श्री. अझीम खान, श्री. अबुल हसन हाश्मी, श्री. सईद फारुकी,  श्री. अज्जू नाईकवाडे, श्री. सलीम सहारा तसेच एम. आई. एम. चे मोठे कार्यकर्ता श्री. हाशम चाऊस व श्री. अमर बिन हैदरा हि या प्रसंगी विशेष उपस्थित होती. सादर दौऱ्या मध्ये मा. आयुक्त निपुण विनायक यांच्या सोबत शहर अभियंता श्री पानझडे, पाणी पुरवठा चे कार्यकारी अभियंता श्री. कोल्हे, एक्झिकटीव्ह इंजिनियर श्री. काझी, विद्युत विभागाचे चे श्री. देशमुख, श्री. देशपांडे व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांची नुकतीच भारत सरकार च्या अर्बन डेव्हलोपमेंट कमेटी वर नियुक्ती झाली असून आता ह्या सर्व नागरी प्रश्न लवकरच सुटतील तसेच आता शहराच्या विकास करिता जास्तीत जास्त बजेट मिळेल असे विश्वास हि अन्वर खान यांनी व्यक्त केले.
*बीड येथे भरदिवसा सैनिकी विद्यालयातील शिक्षकाचा खुन*


बीड : – शहरातील जयदत्‍त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भोसकून खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बालेपीर भागात घडली. भरदुपारी खूनाची घटना घडल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली असून शिक्षकाचा खून झाल्याचे समजताच संबंधितांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी करण्यास सुरवात केली.
सय्यद साजिद अली असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते सैनिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सय्यद यांचा कुकरीने भोसकून खून केल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांचा खून कोणत्या कारणामुळे केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सय्यद यांचा खून झाल्याचे समजताच सय्यद यांच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने जिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली.
भरदुपारी खून झाल्याचे समजताच बीड पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी आणि जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. सय्यद यांच्या छातीवर व पोटावर वार करण्यात आले आहेत. रक्‍ताच्या थारोळयात पडलेल्या सयय्द यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलिस करीत आहेत.

Wednesday, September 18, 2019

पिता के इलाज की सहायता के लिये वो सीधे जा चढा टीव्ही टॉवर पर

इम्तियाज़ जलील के आश्वासन के बाद युवक निचे उतरा।
औरंगाबाद.
सरकारी दफ्तर से लेकर मुख्यमंत्री कार्यालय तक बार बार चक्कर लगाने के बावजूद पिता के इलाज के लिए सरकारी मदद न मिलने से परेशान एक युवक ने टीवी टावर पर चढ़कर आत्महत्या की कोशिश की . मामला महाराष्ट्र के औरंगाबाद का है जहां मंगेश साबले नामक युवक अपने पिता के लीवर की बीमारी को लेकर आर्थिक रूप से परेशान है. प्राथमिक उपचार और टेस्ट के लिए उसने अपनी खेती बेच डाली जिसमे से ज्यादातर पैसा इलाज मे खर्च हो गया. डॉक्टर ने उसे पिता को बचाना है तो ऑपरेशन करना जरूरी बताया जिसके लिए पचीस से तीस लाख का खर्च अनुमानित है. पैसो की कमी के चलते उसने मुख्यमंत्री निधि से मदद की गुहार लगाई. लेकिन चार माह बीत जाने पर भी उसे मदद नहीं मिली . पिछले सप्ताह मंगेश ने जिला कलेक्टर दफ्तर के सामने आंदोलन भी किया बावजूद सरकारी अफसरों के कान पर जूं तक नहीं रेंगी. आखिर उसने अपनी पिता को बचाने के सभी रास्ते बन्द होता देख अपनी ही जान को खत्म करने का फैसला लिया . मंगेश आज टावर पर चढ़ा और पिता के इलाज के लिए दर दर की ठोकरें खाने के बावजूद सरकारी मदद न मिलने के चलते वो जान दे रहा है ऐसी धमकी दी. लगातर दो घंटो तक लोग और पुलिस प्रशासन उसे समझाता रहा लेकिन उसने नीचे न उतरने की बात दोहराई. इस बीच औरंगाबाद के सांसद इम्तियाज जलील को जैसे ही इस मामले की खबर मिली वो मौके पर पहुंचे और काफी देर तक मंगेश को समझाया. उसे भरोसा दिलाया की वो उसे न सिर्फ मदद दिलाएंगे बल्कि उसके साथ खड़े रहेंगे. आखिर दो घंटो बाद वो नीचे उतर आया.
मंगेश ने कहा मै पिछले चार माह से सरकारी दफ्तरों से लेकर मुख्यमंत्री निवास, राज्य के अनेक मंत्रियो से मिला की मुझे मेरे पिता की जान बचाने मेरी मदद करो, हर किसीने सिर्फ आश्वस्त किया लेकिन प्रत्यक्ष मदद नहीं की यही वजह है की मैने तंग आकर ये रास्ता चुना।

Monday, September 16, 2019

*बेगमपुरा येथे अडव्होकेट गोपाल पांडे यांच्या तर्फे श्री. अन्वर खान यांचा जंगी सत्कार*

औरंगाबाद. दिनांक १६ सप्टेंबर २०१९. येणारया विधानसभा निवडणुकीमध्ये शहराचे जेष्ठ समाजसेवक एल्लोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक श्री. सलीम अहमद खान उर्फ अन्वर खान यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (ए. आई. एम. आई. एम.) या राजनैतिक पक्षाकडून औरंगाबाद मध्य विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढविण्याची आपली इच्छा प्रकट केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे समजतील सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे. शहराचे नामवंत व जेष्ठ वकील अड. गोपाल पांडे रा. बेगमपुरा औरंगाबाद यांच्या तर्फे श्री. सलीम अहमद खान उर्फ अन्वर खान यांचा बेगमपूरा चौक औरंगाबाद येथे मकई गेट, जयसिंगपूरा, घाटी परिसर, बेगमपूरा परिसरातील रहिवासीयांतर्फे भव्य व जंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी या सर्व परिसरातील जेष्ठ नागरिकांची व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. अड. गोपाल पांडे यांनी या प्रसंगी लोकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की अन्वर खान हे सद्ग्रस्थ समाजसेवे मध्ये मागील ४० वर्षा पासून आहेत. समाजातील सर्व स्तराच्या लोकांमध्ये त्यांचे चांगले संबंध आहे. सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आज पर्यंत गरीब व गरजू लोकांची निस्वार्थ सेवा केली असून सक्रिय राजनीती मध्ये सहभागी होऊन ते एक आदर्श घडवू शकता याची मला खात्री आहे. सत्कार मूर्ती श्री. अन्वर खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ए. आई. एम. आई. एम. या पक्षाकडून मला निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास निश्चित मी निवडून येऊ शकतो. जनते मध्ये मी शहराच्या विकासाचे मुद्धे घेऊन जाणार आहे. या ऐतिहासिक शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मी, मा. ना. खासदार इम्तियाझ जलील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस काम कारेन. मकई गेट, जयसिंगपूरा, घाटी परिसर, बेगमपूरा परिसरातील रहिवासीयांना त्यांनी आश्वासन दिले की  आंतरराष्ट्रीय ख्याती चे 'बीबी का मकबरा' ला जाण्याकरिता रस्त्याचे काम ते प्राथमिकतेने करणार तसेच नहर ए अंबारी विशेषतः बेगमपुरा येथील थत्ते हौद च्या पुनर्वसनाचे काम देखील ते लौकरात लौकर करतील. निवडून आल्यावर एका वर्षाच्या आत शहरातील युवकांसाठी उद्योग धंदे निर्माण करणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरविणे, प्रत्येक वॉर्डात महिलांकरिता जिम बनविणे, वॉकिंग ट्रॅक बनविणे व शहरात दोन मोफत जलतरण तलाव (स्विमिंग पूल) बनविणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहे. उपस्थित लोकांनी विशेषतः जेष्ठ नागरीकांनी अन्वर खान त्यांनाच ए. आई. एम. आई. एम. पक्ष कडून निवडणूक लढविण्याची संधी मिळो या करिता त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्राचे सूत्रसंचालन सोहेल झकीऊद्दीन यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहम्मद झियाउद्दीन यांनी केले. जोरदार आतिशबाज़ी व जंगी सत्कार ने बेगमपुरा परिसर दुमदुमून गेले होते.

Wednesday, September 11, 2019

अनिस रामपुरे यांना "युवा गौरव" पुरस्कार घोषित

औरंगाबाद (प्रतिनिधी ) औरंगाबाद येथील  दैनिक शम-ऐ-रहबर चे फोटोग्राफर अनिस याकुब रामपुरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाच वर्षा पासुन उत्कृष्ट फोटोग्राफ़ि चे काम केल्या मुळे सा. औरंगाबाद युवा व युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे "युवा गौरव" पुरस्कार नुकतेच घोषणा अब्दुल कय्यूम व कार्यकारी मंडळाच्या वतिने जाहिर करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा २९ सप्टेंबर २०१९ रविवारी रोजी रात्री ७ वाजता मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे मान्यवराचे हस्ते देण्यात येणार आहे
 अनिस याकुब रामपुरे यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल , मकसुद अन्सारी, मुख्तार खान (बब्बू भाई), लतीफ खान, अशफाक शेख, रियाज बागवान, हसन शाह,शेख यासिन,मुसा खान, जावेद पटेल ,मोहसिन शेख, प्रविण बुरांडे, गणेश पवार, अॕड विलास खरात,अरिफ़ देशमुख ,अशरफ़ खान,आदिल खान ,काज़ि नेहाल अहेमद मित्र व रामपुरे परीवाराच्या वतीने  शूभेच्छा देण्यात आले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...