गंगापूर तहसिल आढावा बैठकीत उपस्थित मुद्दे*
दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ दौरा केल्यानंतर गंगापूर तहसिल कार्यालयात संबंधित सर्व वैजापूर, गंगापूर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये खालील मुद्यांवर संबंधीत सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आणि अधिकांऱ्यांना शेतकऱ्यांच्या आणि गावांतील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले.
१) गावातील शेतकऱ्यांच्या पीकांचे लवकरात लवकर पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकीट नुकसान भरपाई देण्यात यावी असे मा.खासदारांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
२) नविन बनविण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व देखभालीची सर्व जिम्मेदारी ही रस्ता पुर्ण झालेल्या दिनांकापासून पूढे दोन वर्षासाठी संबंधित ठेकेदाराची असते. गावातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यां संबंधित ठेकेदारावर व त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. तसेच गावातील सरपंचांनी सर्वाच्या समंतीने नविन रस्त्यांचे ठराव घेवून संबंधित अधिकाऱ्यांना लिखित द्यावे जेणे करुन अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन द्यावा. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन रस्त्यांचे काम लवकर शुरु करण्यासाठी शासनाकडे निधीसाठी त्वरीत पाठपुरावा करण्यात येईल.
३) गावात पोलीस भरतीसाठी हेल्थक्लब व स्टडीरुम, अंगणवाडी, शाळेच्या नविन खोल्या किंवा दुरुस्ती, स्मशानभुमी, कब्रस्थान, सामाजिक सभागृह, मंगल कार्यालय, शादीखाने बनविण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा खासदार निधीतुन आणि शासनाच्या विविध योजनेतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
४) गंगापूर तालुक्यातील सर्व गावपातळीवर नशामुक्ती करण्यात यावी आणि लोकवस्तीत असलेल्या देशी दारुंच्या दुकानावर कार्यवाही करण्यात यावी. जेणे करुन तेथे असलेल्या मुलांना व महिलांना होणारा त्रास टाळता येवु शकतो.
५) दलित समाजाच्या स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्यावी आणि जेथे स्माशान भुमी आहे त्याकडे जाण्यासाठी नविन रस्ता बांधण्यात यावा. दलित वस्ती सुधारणा निधी आणि खासदार निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
६) आजपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयात गावांच्या विकासासाठी जे जे प्रस्ताव आलेले आहे त्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी व संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
७) गावात असलेल्या प्रत्येक शाळेची पाहणी करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा तसेच नविन अंगणवाडी, शाळा दुरुस्ती व नविन शाळा इमारती उभारणीसाठी खासदार निधीतुन आणि कंपनीच्या सीएसआर निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच खासदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना स्पष्ट निर्देश दिले कि माझ्या कार्यकाळात कोणताही विद्यार्थी हा बाहेर बसुन शिकतांना किंवा कोणतीही शाळा व अंगणवाडीत टिनशेड मध्ये दिसता कामा नये.
८) वाळुज, एमआयडीसी, चिकलठाणा मधील कंपन्यांनी सुध्दा त्यांचा सीएसआर निधी गावात विकासकामासाठी, शिक्षणासाठी वापरावा कारण कंपनी जागा, पाणी, लाईट, कर्मचारी येथून घेते तर त्यांचा सीएसआर निधी सुध्दा स्थानिक गावातील विकासासाठीच वापरावे.
९) औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावांच्या विकासा संबंधीची शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांसोबत त्वरीत बैठक घेण्यात येईल जेणेकरुन गावांचा लवकरात लवकर सर्वांगिण विकास करणे शक्य होईल.
दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ दौरा केल्यानंतर गंगापूर तहसिल कार्यालयात संबंधित सर्व वैजापूर, गंगापूर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये खालील मुद्यांवर संबंधीत सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आणि अधिकांऱ्यांना शेतकऱ्यांच्या आणि गावांतील समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले.
१) गावातील शेतकऱ्यांच्या पीकांचे लवकरात लवकर पंचनामे करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकीट नुकसान भरपाई देण्यात यावी असे मा.खासदारांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
२) नविन बनविण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व देखभालीची सर्व जिम्मेदारी ही रस्ता पुर्ण झालेल्या दिनांकापासून पूढे दोन वर्षासाठी संबंधित ठेकेदाराची असते. गावातील रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्यां संबंधित ठेकेदारावर व त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. तसेच गावातील सरपंचांनी सर्वाच्या समंतीने नविन रस्त्यांचे ठराव घेवून संबंधित अधिकाऱ्यांना लिखित द्यावे जेणे करुन अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करुन द्यावा. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन रस्त्यांचे काम लवकर शुरु करण्यासाठी शासनाकडे निधीसाठी त्वरीत पाठपुरावा करण्यात येईल.
३) गावात पोलीस भरतीसाठी हेल्थक्लब व स्टडीरुम, अंगणवाडी, शाळेच्या नविन खोल्या किंवा दुरुस्ती, स्मशानभुमी, कब्रस्थान, सामाजिक सभागृह, मंगल कार्यालय, शादीखाने बनविण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा खासदार निधीतुन आणि शासनाच्या विविध योजनेतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
४) गंगापूर तालुक्यातील सर्व गावपातळीवर नशामुक्ती करण्यात यावी आणि लोकवस्तीत असलेल्या देशी दारुंच्या दुकानावर कार्यवाही करण्यात यावी. जेणे करुन तेथे असलेल्या मुलांना व महिलांना होणारा त्रास टाळता येवु शकतो.
५) दलित समाजाच्या स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्यावी आणि जेथे स्माशान भुमी आहे त्याकडे जाण्यासाठी नविन रस्ता बांधण्यात यावा. दलित वस्ती सुधारणा निधी आणि खासदार निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
६) आजपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयात गावांच्या विकासासाठी जे जे प्रस्ताव आलेले आहे त्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी व संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा घेण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
७) गावात असलेल्या प्रत्येक शाळेची पाहणी करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा तसेच नविन अंगणवाडी, शाळा दुरुस्ती व नविन शाळा इमारती उभारणीसाठी खासदार निधीतुन आणि कंपनीच्या सीएसआर निधीतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच खासदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना स्पष्ट निर्देश दिले कि माझ्या कार्यकाळात कोणताही विद्यार्थी हा बाहेर बसुन शिकतांना किंवा कोणतीही शाळा व अंगणवाडीत टिनशेड मध्ये दिसता कामा नये.
८) वाळुज, एमआयडीसी, चिकलठाणा मधील कंपन्यांनी सुध्दा त्यांचा सीएसआर निधी गावात विकासकामासाठी, शिक्षणासाठी वापरावा कारण कंपनी जागा, पाणी, लाईट, कर्मचारी येथून घेते तर त्यांचा सीएसआर निधी सुध्दा स्थानिक गावातील विकासासाठीच वापरावे.
९) औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावांच्या विकासा संबंधीची शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांसोबत त्वरीत बैठक घेण्यात येईल जेणेकरुन गावांचा लवकरात लवकर सर्वांगिण विकास करणे शक्य होईल.