Monday, August 19, 2019

कैलासनगर भागात ठेकेदाराचा भरदिवसा भोसकून खून

दोघे जण पोलिसांच्या ताब्यात

औरंंगाबाद/प्रतिनिधी 
व्यावसायीक आर्थिक देवाण-घेवणीच्या वादातून ३२ वर्षीय ठेकेदार युवकाचा तीन जणांनी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे खून केला. ही घटना सोमवारी (दि.१९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कैलासनगर भागातील गल्ली नंबर १ येथे घडली. फेरोज खान अनिस खान (वय ३२, रा.दादा कॉलनी, कैलासनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत हुसेन खान इब्राहीम खान उर्फ बाली (वय ३८, रा.दादा कॉलनी) आणि उस्मान खान या दोघांना ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरोज खान अनिस खान हा युवक ठेकेदारीचा आणि वाळुचा व्यवसाय करीत होता. गेल्या काही दिवसापासून दादा कॉलनीत राहणाऱ्या हुसेन खान उर्फ बाली याच्यासोबत फेरोज खान याचा आर्थिक देवाण-घेवणीच्या कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री फेरोज खान व हुसेन बाली यांच्यात देवाण-घेवाणीच्या कारणावरून पुन्हा एकदा जोरदार वाद झाला होता. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फेरोज खान हा आपल्या घरी असतांना हुसेन बाली याने त्याला बोलावून घेत गल्ली नंबर १ येथील सामाजिक सभागृहाजवळ नेले. त्या ठिकाणी हुसेन खान उर्फ बाली याने आपला पुतण्या उस्मान खान, मुलगा इम्रान खान हुसेन खान यांनी फेरोज खान याच्यासोबत वाद घातला. आम्हाला वाळुचा हप्ता का देत नाही असे म्हणत हुसेन खान उर्फ बाली याने धारदार शस्त्राने फेरोज खान याच्यावर हल्ला केला. त्यानंतर उस्मान खान, इम्रान खान यांनी देखील फेरोज खान याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे फेरोज खान हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, हुसेन बाली याने फेरोज खान याला बोलावून त्याचा घात केला असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर फेरोज खान याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फेरोज खान यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचार सुरू असतांना दुपारी दिड वाजेच्या सुमारास फेरोज खान यांचा मृत्यू झाला. फेरोज खान यांचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नातेवाईकांनी घाटी रूग्णालयात धाव घेतली. त्यामुळे अपघात विभागासह शवविच्छेदनगृहा समोर मोठा जमाव जमला होता. घाटीत जमाव जमला असल्याची माहिती मिळाल्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक्की आदींच्या पथकाने घाटी रूग्णालयात धाव घेवून संतप्त नातेवाईकांची समजूत काढली.


नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर गोंधळ

फेरोज खान याच्या मारेकऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करीत फेरोज खान याच्या संतप्त नातेवाईकांनी जिन्सी पोलिस ठाण्यासमोर गोंधळ घातला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संतप्त जमावाची समजूत काढुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला.

फेरोज खान याच्यावर १४ वार

हुसेन खान उर्फ बाली, उस्मान खान, इम्रान खान यांनी फेरोज खान यांच्यावर धारदार शस्त्राने १४ वार केले होते. त्यातील काही वार शरीराच्या अंतरभागात खोलपर्यंत लागल्याने फेरोज खान हे गंभीर जखमी झाले होते.

फेरोज खान यांची हत्या, वय 35, राहणार दादा कॉलनी, कैलास नगर याच्या वर हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली, आर्थिक देवाणघेवाण मधून खून झाला ची माहिती पोलिसांकडून कळाली आहे.
हत्या करणारा हाच तो आरोपी नाव हुसेन बाली



 सदरील घटनेची चौकशी करताना पोलीस विभाग औरंगाबाद दिसत आहे ही घटना कशी घडली व का घडली या मागचे कारण म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण आर्थिक.
देवाण-घेवाण करताना शहरात प्रत्येकाने सजग राहणे फार गरजेचे आहे कारण कोण तुम्हाला कधी धोका देणार यासंदर्भात सांगणे कठीण आहे त्याकरिता आपण कोणाशी व्यवहार करताना जाणीवपूर्वक विचार करूनच व्यवहार करावा.


मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा - अन्वर खान
*औरंगाबाद शहरात कार्यरत ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार*
Photo- Baig Mushtak mirza

औरंगाबाद: दिनांक १९ ऑगस्ट २०१९. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी च्या वतीने औरंगाबाद शहरात समाजकार्य करणाऱ्या ५० स्वयंसेवी संस्थांचे सत्कार करण्यात आले. सत्कार समारंभ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर मजनू हिल औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात औरंगाबाद शहरातील सु-प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता व एल्लोरा ग्रुप ऑफ कंपनीस चे संचालक अन्वर खान यांची मुख्य उपस्थिती होती. जी. एस. टी. आयकर विभाग चे सहायक आयुक्त चंद्रशेखर बोर्डे, माविन चे संचालक सय्यद अब्दुल रेहमान, कावीश फॉउंडेशन चे संचालक शोएब सिद्दीकी व डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वूमन चे प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष सोहेल झकीऊद्दीन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. चंद्रशेखर बोर्डे यांनी स्वयंसेवी संस्थेसाठी शासनाच्या विविध योजनेचे उल्लेख करून सदर योजनेपासून जनसामान्यांसाठी कार्य करण्यासाठी स्वयंसेवीसंथांना आव्हान केले. सय्यद अब्दुल रेहमान यांनी स्वयंसेवी संस्था चालवणारे वक्ती हेच खरे नायक असल्याचे सांगितले. शोएब सिद्दीकी यांनी सांगितले कि स्वयंसेवी संस्था चालकांनी नवीन पिढीतील मुलांना स्पर्धा परीक्षे साठी प्रोत्साहित केले पाहिजे. औरंगाबाद ने खूप डॉक्टर्स आणि इंजिनिर्स दिले आहेत, आता तेहसीलदार, कलेक्टर, कमिशनर ची गरज आहे. डॉ. मकदूम फारुकी यांनी संस्थाचालकांना आपले रेकॉर्डस्, ऑडिट तसेच सर्व कागदपत्रे अपडेट ठेवण्याचे आव्हान केले. अन्वर खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 'मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असल्याचे सांगितले. या प्रसंगी श्रीमती फर्रुक जमाल (फैझ ए आम ट्रस्ट), डॉ. अर्चना सारडा (उडाण), मसिउद्दिन सिद्दीकी (सिद्दीकी वेलफेयर सोसायटी), रझी अहमद खान (अल-फरहान मेडिकल फॉउंडेशन), मोहम्मद झियाउद्दीन, मोहिद हशर (मजलिस तामीर ए मिल्लत),  अड. फैझ सय्यद (इस्लामिक रिसर्च सेंटर), प्रभुराम जाधव (हिमोफेलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र), फय्याज शेख (हैप्पी क्लब ग्रुप), सलीम सिद्दीकी (शोबा ए किदमत ए कल्क), तौसिफउल्लाह खान (जमात ए इस्लाम ए हिंद), डॉ. दिलशाद झैदी (अल हसन चेरिटेबलें ट्रस्ट), दीपक दौड (श्री. कृष्णा मेडिकल), जुनेद फारुकी (ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत), अनिस पटेल (पटेल फॉउंडेशन), दीपक आर्या (ओरफन फ्री इंडिया), नासेर शेख (एस. आई. ओ.), हाफिज अकील (के. के. ग्रुप), जफर पटेल (ग्लोबल मेडिकल फॉउंडेशन), शोएब सिद्दीकी (कावीश फॉउंडेशन), फारूक पटेल (जीवन जागृती सोसायटी), जावेद शेख (फेथ एजुकेशन अँड वेलफेयर सोसायटी), नाझीश सिद्दीकी (अजल फॉउंडेशन), देविदास उंचे (शिवम मेडिकल सोसायटी), वासिम खान (अल अजीज फॉउंडेशन), मुझफ्फर सिद्दीकी (अल्तमश वेलफेयर सोसायटी), मोहसीन मोहिउद्दीन (ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टीस), इफ्तेकार शेक (रिअल ड्रॉप), मोहम्मद रिझवान (अल-खैर फॉउंडेशन), माधव दराडे (माधव सोशल ग्रुप), अनिल लुमिया, काझी मो. शारिकउद्दीन (हेल्प टू ह्युमॅनिटी), शफिक भाई, रफिक भाई (तदफीन कमिटी), बिस्मिल्ला खान (अल-हक मेडिकल फॉउंडेशन), साजिद शेख (अल-अमान कमिटी), इम्रान शेक (तेहरीक-ए-सदा-ए-हक), मो. जफर (फ्रेंड्स ग्रुप), फिरदोस फातेमा (काफील एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), नईम खान (कॅन्डीड एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), मनोज गायके, मुबीन टोपीवाला, रफीउद्दीन रफिक (शैक्षणिक सल्लागार), शेक झिया (प्राईम वेलफेयर सोसायटी), डॉ. अबूबकर बावझीर (मायनॉरिटी ऍडवाईझरी फोरम), खान मुझम्मिल (शासकीय वैधकीय रुग्णालय), फारूक पटेल (हर्सूल), हशम हैदर (हैदर फाऊंडेशन), इम्रान खान (बेइंग अँजेल) या स्वयंसेवी संस्थेचा या प्रसंगी पुष्पगुछ, शाल, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्राचे सूत्रसंचालन मिर्झा दाऊद आझाद व मासिउद्दिन सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुस्लिम युथ फोरम व ग्लोबल मेडिकल फाऊंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, August 14, 2019

जंभाळा गावानजीक ट्र - कारचा भीषण अपघात दोन जन जागिच ठार तर एक गंभीर जखमी .
 Photos-Baig Mushtak Mirza

प्रतिनिधी।औरंगाबाद
जंभाळा  गावानजीक आज दूपारी ३ः४५ वाजे दरम्यान औरंगाबादकडून - नाशिककडे जात असतांना स्विप्ट कार क्र.एम एच २० सी एस ४९२३ व ट्रक जी.जे.१० एक्स ७१५७  यांच्यात  औरंगाबादहून नाशिककडे जांतांना स्विप्ट डिझायर  कार चालत्या ट्रकवर मागच्या बाजूने जोरात आदळून अपघात झाला.अपघाताचा आवाज खूप मोठा झाला यामूळे शेतात काम करणारे शेतकरी  व गावकरी धावत आले परंतु तो पर्यंत कारमधील दोघेजण जागीच गतप्राण झाले होते तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यांचे मृतदेह कारच्या पत्र्यात अडकले होते त्यामूळे कारला ट्रक खालून काढतांना मोठी कसरत करावी लागली. सदर धूळे - सोलापूर महामार्गाचे चौपदरी करणाचे काम येथे चालू आहे त्यामूळे काही ठिकाणी दूपदरी तर काही ठिकाणी एकपदरी रस्ता आहे त्यामूळे चालू ट्रकचा एकपदरी रस्त्ता आल्यामूळे वेगकमी झाला व मागून जोरात येणारी स्विप्ट ट्रकखाली घूसली यामूळे हा अपघात झाला.  या कारला व ट्रकला जेसीबीद्वारे वेगळे करण्यात  आले.


घटणास्थळी बघ्यांची गर्दि जमली होती. घटणेची माहिती कळताच दौलताबाद पोलिस स्टेशनचे कर्मचारी टु मोबाईल व्हँन घेवून पोहचले होते. दोन वेगवेगळ्या  १०८ अँबुलन्सद्वारे सदर मृतदेह व एका जखमीना घाटी दवाखान्यात हलवण्यात आले.अशी घटणा झाल्याची माहीती येथिल सरपंचानी दिली. सदर स्विप्ट कार मधील व्यक्ती औरंगाबाद चे असल्याचे बोलले जात होते. या घटनेची माहिती दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे,कर्मचारी पगारे,घुसळे,वाणी व छावणी वाहतूक पोलीस निरीक्षक शरद इंगळे,उपनिरीक्षक बनसोडे,गणेश गायकवाड,मारुती गुंजाळ,संदीप पवार,एच यू पठाडे,पी एस वाघ, के एस जाधव,एस एम पवार,महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगीर ,प्रकाश जाधव एस टी भांगडे घटना स्थळी पोहचले एका जे सि बी च्या मदतीने कार ट्रॅक मधून बाहेर काढले यात स्थानिक ग्रामस्थ विकास गेहलोत,गणेश शेलार ,संतोष आम्ले,सुधाकर दाणे,गणेश बारगळ आदिंनी मोठी मदत केली.
*ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) एस. एम. मुश्रीफ यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय *ब्राम्हण महासंघाने* विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला होता.

*हु किल्ड करकरे* हे पुस्तक लिहिणाऱ्या माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचे नवीन पुस्तक  *ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे.  पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला विरोध करण्यास आलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. नागरिकांना कार्यक्रमाला पाण्याची बाटली घेऊन जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड , माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते.

मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन सचिन गोडांबे यांनी केले.
संघ की शाखाओं का Placement देखकर
Cambridge, Harvard, Oxford, IIM, IIT, BIT, NIT और पूरी दुनिया हैरान.........

राष्ट्रपति,,,,
प्रधानमंत्री,,,,
गृहमंत्री,,,
उपराष्ट्रपति,,,
लोकसभा सभापती

और

18 मुख्यमंत्री,,,,
29 राज्यपाल,,,,
1 लाख शाखाएं,,,,
15 करोड़ स्वयंसेवक,,,,
2 लाख सरस्वती विद्यामंदिर,,,,
5 लाख आचार्य,,,,
एक करोड़ विद्यार्थी,,,,
2 करोड़ भारतीय मजदूर संघ के सदस्य,,,,
1 करोड़ ABVP के कार्यकर्ता,,,,
15 करोड़ बीजेपी सदस्य,,,,
1200 प्रकाशन समूह,,,,
9 हजार पूर्णकालिक एवं,,,,
7 लाख पूर्व सैनिक परिषद,,,,
1 करोड़ विश्व हिन्दू परिषद् सदस्य (पूरे विश्व में),,,,
30 लाख बजरंग दल के हिन्दुत्व सेवक,,,,
1.5 लाख सेवाकार्य,,,,,
18 राज्यों में सरकारें,,,,
283 लोकसभा सांसद,,,,
58 राज्यसभा सांसद,,,,
1460 विधायक,,,,         

वनवासी कल्याण आश्रम,
वनबंधु परिषद,
संस्कार भारती,
विज्ञान भारती,
लघु उद्योग भारती,
सेवा सहयोग,
सेवा इंटरनॅशनल,
राष्ट्रीय सेविका समिती,
आरोग्य भारती,
दुर्गा वाहिनी,
सामाजिक समरसता मंच,
ऑर्गनाजर,
पांच्यजन्य,
श्रीरामजन्म भूमी मंदिर निर्माण न्यास,
दीनदयाळ शोध संस्थान,
भारतीय विचार साधना,
संस्कृत भारती,
भारत विकास परिषद,
जम्मूकाश्मीर स्टडी सर्कल,
दृष्टी संस्थान,
हिंदू हेल्पलाईन,
हिंदू स्वयंवसेवक संघ,
हिंदू मुन्नानी,
अखिल भारतीय साहित्य परिषद,
भारतीय किसान संघ,
विवेकानंद केंद्र,
तरुण भारत,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
हिंदुस्थान समाचार,
विश्व संवाद केंद्र,
जनकल्याण रक्तपेढी,
इतिहास संकलन समिती,
स्त्री शक्ती जागरण,
एकल विद्यालय,
धर्म जागरण,
भारत भारती,
सावरकर अध्यासन,
शिवाजी अध्यासन,
पतित पावन संघटना,
हिंदू एकता
और ऐसी कई अनेक

बस इतना सा है RSS बाबू जी...!!!

ये कांग्रेस या कम्युनिस्ट पार्टी नहीं है जो इतनी जल्दी इसकी जड़े हिल जाएँगी,,,, बड़े बड़े सूरमा RSS मुक्त भारत के सपने देखते देखते दुनिया से ही चले गए...। 92 साल का आरएसएस आने वाले हजारो साल तक भारतवर्ष की सेवा करेगा।

परम: वैभवम ने तुम्हे तत्व राष्ट्रम:।

It's only for our information.
Info collect By-Yuva Samna media group,India.

और खौम अब भी  सो ही रही है.........बाबु

Tuesday, August 13, 2019

आज समाजसेवक अनवर खान बिस्मिल्लाह खान यांचा युवाशक्ती पत्रकार संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.
   फोटो-बेग मुस्ताक मिर्झा, युवा सामना मिडिया, औरंगाबाद

विशेष प्रतिनिधी-दिनांक 14 ऑगस्ट 2019
कोल्हापूर, सातारा, सांगली च्या पुरग्रस्थ भागाला वैधकीय सुविधा रवाना करण्यात आले.इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रीसर्च चे संचालक अन्वर खान यांनी घेतले पुढाकार. चांगले काम केल्याबद्दल आज अनवर खान यांचे सत्कार केले आहे.जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी तशी औरंगाबाद शहरामध्ये मध्य येथे निवडणुकीची सुरस वाढत आहे.शहरात प्रत्येक वर्गातून अन्वर खान यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे एमआयएम लवकरच अन्वर खान यांना निवडणुकीचा तिकीट देऊ शकते असा दाट शक्यता यांचे असंख्य समर्थकांकडून व्यक्त होत आहे. औरंगाबाद शहरात विकासाच्या वाट्यात अन्वर खान यांचे मोलाचे योगदान शहराला लाभले आहे त्याचे जिवंत उदाहरण मौलाना आझाद रिसर्च सेंटर सेशन कोर्ट ची बिल्डिंग महानगरपालिका ची बिल्डिंग, शासकीय रुग्णालय औरंगाबाद (घाटी)व चिकलठाणा येथे एअरपोर्ट समोर भव्य नवीन घाटी रुग्णालय ,शिवाजी वस्तुसंग्रहालय असे असंख्य शासकीय इमारती अन्वर खान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात उभे आहे त्यांच्या ह्याच मोलाचे काम व प्रत्येक क्षेत्राचा दाट अनुभव आणि परिश्रम यामुळे सर्व वर्गांचा अन्वर खान यांना समर्थन मिळत आहे.
सत्कार समारंभात अब्दुल कय्यूम,अलीम बेग, सय्यद साबेर, मुसा खान, हफीज अली,शफीक शेख,शेख अमजद, शेख ऐजाज,ऐजाज बेग, साजीद पटेल, ईलियास सिद्दीकी,
फोटोग्राफर अनिस रामपुरे, आरेफ देशमुख, आदींची उपस्थिती होती.

Monday, August 12, 2019

*Medical Aid provided to flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara.*
_*Anwar Khan Director of Indian Institute of Science and Research initiated the Drive.*_
  PHOTOS-BAIG MUSHTAK MIRZA


Aurangabad; 12th August 2019. Anwar Khan Bismilla Khan, a philanthropist and Director of Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, took the initiative to provide Medical Aid to the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara today. Anwar Khan stated that today on occasion of Eid, in our happiness, we can’t forget our brothers and sisters affected by this natural calamity, in their time of grief. 16 people have lost their lives in Maharashtra as heavy rains and overflowing rivers swamped five districts which includes the flood affected areas of Kolhapur, Sangli and Satara, displacing more than 1,40,000 people in last few days. Fully equipped Ambulance with medicines and team of expert doctors from Indian Institute of Medical Science and Research, Badnapur, Aurangabad, has left for Kolhapur today. Member of Parliament Imtiaz Jaleel flagged off the ambulance today at 5:30 pm. Prominent personalities of the city, Dr. Maqdoom Farooqui, Dr. Zahed Zaheer, Abdul Rehman, Maulana Abdul Rasheed Madni, Mufti Shoeb Al Qasmi, Sameer Abdul Sajid, Mohd. Ziyauddin, Asif Khan, Fayyaz Khan, Wasim Raja, Rehan Khan, Riyaz Khan, Zubair Nadwi, Wiqar Ahmed, Sohail Zakiuddin and others displayed their support to this cause by being present for this occasion. Anwar Khan also assured that as per the requirement they will be sending more relief aids to the flood affected areas soon.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...