Thursday, April 4, 2019
Tuesday, April 2, 2019
चार पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल
उदगीर - येथील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून, निवडणूक आचारसंहितेचा धाक दाखवून दीड लाख रुपये लुटणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांवर अखेर सोमवारी (ता. एक) दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत चारही पोलिसांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
फोटो- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,उदगीर,महाराष्ट्र
या संदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिलेली माहिती अशी - हनुमान कट्टा रोड परिसरातील बालाजी ज्वेलर्सचे मालक सचिन चन्नावार यांनी शुकवारी रात्री साडेआठच्या सुमारास पेढी बंद केली. बॅगेत सहा लाख रुपये ठेवून ते घरी निघाले. या वेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या शहर पोलिस ठाण्याचे हरी डावरगावे, महेश खेळगे, श्याम बडे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे रमेश बिरले यांनी त्यांना पकडले. ‘बॅगमध्ये काय आहे, किती पैसे आहेत, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, आम्ही निवडणूक आचारसंहितेच्या पथकामध्ये आहोत, एवढी रक्कम घेऊन फिरता येत नाही, पैसे जप्त केले जातात,’ आदी प्रश्नांचा भडिमार या चौघांनी चन्नावार यांच्यावर केला. त्यानंतर पन्नास टक्के देण्याची मागणी केली. चौकशी करा; पण पेसे देणार नाही, असा पवित्रा चन्नावार यांनी घेताच चौघा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगमधील दीड लाख रुपये बळजबरीने काढून घेतले.
या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा, रक्कम परत मिळावी, अशा आशयाचे निवेदन सचिन चन्नावार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि त्याच्या प्रती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. निवडणूक विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी उदगीर शहर पोलिस ठाणे गाठून चन्नावार यांचा जबाब नोंदवून घेतला व चौघा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.
उदगीर - येथील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून, निवडणूक आचारसंहितेचा धाक दाखवून दीड लाख रुपये लुटणाऱ्या चार पोलिस कर्मचाऱ्यांवर अखेर सोमवारी (ता. एक) दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईत चारही पोलिसांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
फोटो- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,उदगीर,महाराष्ट्र
या संदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिलेली माहिती अशी - हनुमान कट्टा रोड परिसरातील बालाजी ज्वेलर्सचे मालक सचिन चन्नावार यांनी शुकवारी रात्री साडेआठच्या सुमारास पेढी बंद केली. बॅगेत सहा लाख रुपये ठेवून ते घरी निघाले. या वेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या शहर पोलिस ठाण्याचे हरी डावरगावे, महेश खेळगे, श्याम बडे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे रमेश बिरले यांनी त्यांना पकडले. ‘बॅगमध्ये काय आहे, किती पैसे आहेत, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, आम्ही निवडणूक आचारसंहितेच्या पथकामध्ये आहोत, एवढी रक्कम घेऊन फिरता येत नाही, पैसे जप्त केले जातात,’ आदी प्रश्नांचा भडिमार या चौघांनी चन्नावार यांच्यावर केला. त्यानंतर पन्नास टक्के देण्याची मागणी केली. चौकशी करा; पण पेसे देणार नाही, असा पवित्रा चन्नावार यांनी घेताच चौघा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगमधील दीड लाख रुपये बळजबरीने काढून घेतले.
या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करावा, रक्कम परत मिळावी, अशा आशयाचे निवेदन सचिन चन्नावार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि त्याच्या प्रती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. निवडणूक विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी उदगीर शहर पोलिस ठाणे गाठून चन्नावार यांचा जबाब नोंदवून घेतला व चौघा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.
‘न झेपणारी आश्वासने देऊ नका’; अच्छे दिन, १५ लाखांच्या ‘जुमलेबाजी’वरून उद्धव यांनी सुनावले
फोटो- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क, मुंबई
उद्धव यांनी भाजपाबरोबरच काँग्रेसलाही टोला लगावला
देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपा युती, राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी अच्छे दिन, १५ लाखांचे आश्वासन, जुमलेबाजी या प्रश्नांनाही उत्तरे दिली आहेत. न झेपणारी आश्वासने कोणीही देऊ नयेत असं मत व्यक्त करताना त्यांनी भाजपाबरोबरच काँग्रेसलाही टोला लगावला आहे.
महाराष्ट्रामध्ये युती झाल्याने राज्याचे प्रश्न सुटतील का? या प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेना जेवढं जमू शकते तितकीच आश्वासने देते असं उद्धव यांनी सांगितलं. उद्धव म्हणतात, ‘लोकांशी खोटं बोलून मला एकही मत नकोय हा शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आम्ही आजही पाळतो. त्यामुळेच आम्ही करु शकतो तेवढचं आम्ही बोलतो. आम्ही आवाजवी बोलत नाही. मतं मिळवण्यासाठी खोटं बोलणं आम्हाला जमत नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी असंच करावं अशी माझी अपेक्षा आहे. आवाजवी बोलणे टाळायला हवे. जमणार नाहीत अशी आश्वासने देऊ नयेत. आश्वासनांमुळे लोकांच्या स्वप्नांना धुमारे फुटून नंतर ती पूर्ण करता आली नाही तर?,’
जुमलेबाजीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणतात, ‘निवडणूक असल्याने कोणी मी तुम्हाला काहीच देणार नाही असं म्हटलं तर लोक आम्ही तुम्हाला मतंही देणार नाही असं म्हणतील. त्यामुळेच लोकांच्या आयुष्यात आतापेक्षा अधिक समाधानाच्या गोष्टी देण्याची आश्वासने दिली जातात.’ म्हणजे तुम्हाला अच्छे दिन म्हणायचं आहे का असा सवाल राऊत यांनी केला असता उद्धव यांनी अच्छे दिन म्हणजे काय याबद्दल आपले मत मांडले. ‘अच्छे दिन म्हणा किंवा सुखासमाधानाचे दिवस म्हणा. पण आश्वासन देणाऱ्यांनी जनतेला स्पष्टपणे सांगावं लागतं. पण हे सुखासमाधानाचे दिवस आणताना अवाजवी घोषणा करणे टाळावं असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण शेवटी लोकांच्या अपेक्षा खूप मोठय़ा असू शकतात. त्यांच्या अपेक्षांना आपण किती सत्य स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात आणू शकतो हे कळतं. जे आपण करू शकतो तेवढ्यापुरतंच बोलावं,’ असं उद्धव यांनी सांगितले.
‘तुम्ही जनतेला पहिलं आश्वासन किंवा वचन कोणतं दिलं असतं?’ या प्रश्नालाही उद्धव यांनी उत्तर दिले. ‘आता असं कोणतंही वचन किंवा आश्वासन शिल्लक राहिलेलं नाही, की जे कुणी दिलेलं नाही. म्हणून मी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा या तर मूलभूत गरजा पुरवण्याचं आश्वासन मी दिलं असतं,’ असं उद्धव म्हणाले. अन्न, वस्र, निवारा ही जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात कायमच अपूर्ण राहिलेली संकल्पना आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनाही या गोष्टींची आश्वासने द्यावी लागत, असल्याचे मत उद्धव यांनी मांडले.
आश्वासनांच्या विषयावरुनच राऊत यांनी १५ लाख रुपयांच्या घोषणेबद्दल विचारले असता, ‘मी ती घोषणा केली नाही’ असं उत्तर उद्धव यांनी दिले. ‘आता राहुल गांधींनीही जनतेच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये टाकण्याची घोषणा केली आहे. पण देशाच्या तिजोरीचा कुणी विचार केलाय का?’ असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. ‘१५ लाख’ हा आजही वादाचा विषय असल्याबद्दल सहमती दर्शवत उद्धव यांनी पूर्ण करु शकता येणारी नाही अशी आश्वासने देऊ नये असं मत नोंदवलं. ‘कोणीही अवाजवी घोषणा करू नयेत. लोकांना नेहमी खरं बोललेलं आवडतं. ते फार मोठी अपेक्षा आपल्याकडून करीत नाहीत. त्यांचं रोजचं जे आयुष्य आहे तेवढय़ापुरतं खरोखर दिलंत तर जेवढं जमतं तेवढं हा करतोय असं ते म्हणतील. पण एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करू शकलो नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो,’ असं उद्धव यांनी सांगितले.
फोटो- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क, मुंबई
उद्धव यांनी भाजपाबरोबरच काँग्रेसलाही टोला लगावला
देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपा युती, राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी अच्छे दिन, १५ लाखांचे आश्वासन, जुमलेबाजी या प्रश्नांनाही उत्तरे दिली आहेत. न झेपणारी आश्वासने कोणीही देऊ नयेत असं मत व्यक्त करताना त्यांनी भाजपाबरोबरच काँग्रेसलाही टोला लगावला आहे.
महाराष्ट्रामध्ये युती झाल्याने राज्याचे प्रश्न सुटतील का? या प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेना जेवढं जमू शकते तितकीच आश्वासने देते असं उद्धव यांनी सांगितलं. उद्धव म्हणतात, ‘लोकांशी खोटं बोलून मला एकही मत नकोय हा शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आम्ही आजही पाळतो. त्यामुळेच आम्ही करु शकतो तेवढचं आम्ही बोलतो. आम्ही आवाजवी बोलत नाही. मतं मिळवण्यासाठी खोटं बोलणं आम्हाला जमत नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी असंच करावं अशी माझी अपेक्षा आहे. आवाजवी बोलणे टाळायला हवे. जमणार नाहीत अशी आश्वासने देऊ नयेत. आश्वासनांमुळे लोकांच्या स्वप्नांना धुमारे फुटून नंतर ती पूर्ण करता आली नाही तर?,’
जुमलेबाजीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणतात, ‘निवडणूक असल्याने कोणी मी तुम्हाला काहीच देणार नाही असं म्हटलं तर लोक आम्ही तुम्हाला मतंही देणार नाही असं म्हणतील. त्यामुळेच लोकांच्या आयुष्यात आतापेक्षा अधिक समाधानाच्या गोष्टी देण्याची आश्वासने दिली जातात.’ म्हणजे तुम्हाला अच्छे दिन म्हणायचं आहे का असा सवाल राऊत यांनी केला असता उद्धव यांनी अच्छे दिन म्हणजे काय याबद्दल आपले मत मांडले. ‘अच्छे दिन म्हणा किंवा सुखासमाधानाचे दिवस म्हणा. पण आश्वासन देणाऱ्यांनी जनतेला स्पष्टपणे सांगावं लागतं. पण हे सुखासमाधानाचे दिवस आणताना अवाजवी घोषणा करणे टाळावं असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण शेवटी लोकांच्या अपेक्षा खूप मोठय़ा असू शकतात. त्यांच्या अपेक्षांना आपण किती सत्य स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात आणू शकतो हे कळतं. जे आपण करू शकतो तेवढ्यापुरतंच बोलावं,’ असं उद्धव यांनी सांगितले.
‘तुम्ही जनतेला पहिलं आश्वासन किंवा वचन कोणतं दिलं असतं?’ या प्रश्नालाही उद्धव यांनी उत्तर दिले. ‘आता असं कोणतंही वचन किंवा आश्वासन शिल्लक राहिलेलं नाही, की जे कुणी दिलेलं नाही. म्हणून मी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा या तर मूलभूत गरजा पुरवण्याचं आश्वासन मी दिलं असतं,’ असं उद्धव म्हणाले. अन्न, वस्र, निवारा ही जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात कायमच अपूर्ण राहिलेली संकल्पना आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनाही या गोष्टींची आश्वासने द्यावी लागत, असल्याचे मत उद्धव यांनी मांडले.
आश्वासनांच्या विषयावरुनच राऊत यांनी १५ लाख रुपयांच्या घोषणेबद्दल विचारले असता, ‘मी ती घोषणा केली नाही’ असं उत्तर उद्धव यांनी दिले. ‘आता राहुल गांधींनीही जनतेच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये टाकण्याची घोषणा केली आहे. पण देशाच्या तिजोरीचा कुणी विचार केलाय का?’ असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. ‘१५ लाख’ हा आजही वादाचा विषय असल्याबद्दल सहमती दर्शवत उद्धव यांनी पूर्ण करु शकता येणारी नाही अशी आश्वासने देऊ नये असं मत नोंदवलं. ‘कोणीही अवाजवी घोषणा करू नयेत. लोकांना नेहमी खरं बोललेलं आवडतं. ते फार मोठी अपेक्षा आपल्याकडून करीत नाहीत. त्यांचं रोजचं जे आयुष्य आहे तेवढय़ापुरतं खरोखर दिलंत तर जेवढं जमतं तेवढं हा करतोय असं ते म्हणतील. पण एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करू शकलो नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो,’ असं उद्धव यांनी सांगितले.
बनवाबनवी! उपग्रहाच्या मदतीनं पकडली टॅक्स चोरी
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क टिम,गाजियाबाद,उत्तर प्रदेश-
गाजियाबादमध्ये उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी पकडण्यात आली. देशातील हे पहिलंच प्रकरण आहे.
खबरदार! तुम्ही जर टॅक्स वाचवण्यासाठी चुकीचं पाऊल उचलत असाल तर तुमच्यावर उप्रगहाची नजर आहे. विश्वास नाही ना बसत? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी कशी पकडणार? ते कसं शक्य आहे? तर, थोडं थांबा. तर्क लढवण्यात तुम्ही घाई करताय. तुमच्या विश्वास बसत नाही? तर, उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये 15 कोटींची टॅक्स चोरी उपग्रहाच्या मदतीनं पकडण्यात आली. उपग्रहाच्या मदतीनं केलेली देशातील ही पहिलीच कारवाई आहे.गाजियाबादमधील हायवेजवळ असलेला व्यावसायिक कॉम्प्लेक्स शेत जमीन असल्याचं दाखवत त्याची विक्री करण्यात आली. पण, इनकम टॅक्स विभागाला संशय आला. त्यानंतर हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून फोटो मागिवण्यात आले. तेव्हा सारा प्रकार समोर आला. त्यानंतर टॅक्स वसुल करण्यात आला.उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी पकडण्याचं हे देशातील पहिलंच प्रकरण आहे. गाजियाबदमधील मोदीनगर येथील एका व्यक्तीनं टॅक्स वाचवण्यासाठी फेब्रुवारी 2016मध्ये व्यावसायिक कॉम्पलेक्सची जमीन शेत जमिन असल्याचं दाखवत त्याची खरेदी केली होती. शिवाय, आयकर विभागाच्या नोटीसीला देखील तसंच उत्तर देण्यात आलं.
अखेर, जमिनीची नेमकी स्थिती समजून घेण्याकरता हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून उपग्रहाच्या मदतीनं फोटो मागिवण्यात आले. त्यानंतर सारा प्रकार समोर आला. कारण, जेव्हा जमिन रजिस्टर करण्यात आली होती तेव्हा त्याठिकाणी कमर्शिअल कॉम्पलेक्स उभारण्यात आलं होतं. या फोटोंच्या आधारे आयकर विभागानं संबंधित व्यक्तिला नोटीस पाठवत 15 कोटींचा टॅक्स वसूल केला. कारण, अशा प्रकरणांमध्ये 100 टक्के टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे टॅक्स वाचवणाऱ्यांवर आता उपग्रहाची देखील नजर असणार हे नक्की!
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क टिम,गाजियाबाद,उत्तर प्रदेश-
गाजियाबादमध्ये उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी पकडण्यात आली. देशातील हे पहिलंच प्रकरण आहे.
खबरदार! तुम्ही जर टॅक्स वाचवण्यासाठी चुकीचं पाऊल उचलत असाल तर तुमच्यावर उप्रगहाची नजर आहे. विश्वास नाही ना बसत? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी कशी पकडणार? ते कसं शक्य आहे? तर, थोडं थांबा. तर्क लढवण्यात तुम्ही घाई करताय. तुमच्या विश्वास बसत नाही? तर, उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये 15 कोटींची टॅक्स चोरी उपग्रहाच्या मदतीनं पकडण्यात आली. उपग्रहाच्या मदतीनं केलेली देशातील ही पहिलीच कारवाई आहे.गाजियाबादमधील हायवेजवळ असलेला व्यावसायिक कॉम्प्लेक्स शेत जमीन असल्याचं दाखवत त्याची विक्री करण्यात आली. पण, इनकम टॅक्स विभागाला संशय आला. त्यानंतर हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून फोटो मागिवण्यात आले. तेव्हा सारा प्रकार समोर आला. त्यानंतर टॅक्स वसुल करण्यात आला.उपग्रहाच्या मदतीनं टॅक्स चोरी पकडण्याचं हे देशातील पहिलंच प्रकरण आहे. गाजियाबदमधील मोदीनगर येथील एका व्यक्तीनं टॅक्स वाचवण्यासाठी फेब्रुवारी 2016मध्ये व्यावसायिक कॉम्पलेक्सची जमीन शेत जमिन असल्याचं दाखवत त्याची खरेदी केली होती. शिवाय, आयकर विभागाच्या नोटीसीला देखील तसंच उत्तर देण्यात आलं.
अखेर, जमिनीची नेमकी स्थिती समजून घेण्याकरता हैद्राबादमधील नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सीकडून उपग्रहाच्या मदतीनं फोटो मागिवण्यात आले. त्यानंतर सारा प्रकार समोर आला. कारण, जेव्हा जमिन रजिस्टर करण्यात आली होती तेव्हा त्याठिकाणी कमर्शिअल कॉम्पलेक्स उभारण्यात आलं होतं. या फोटोंच्या आधारे आयकर विभागानं संबंधित व्यक्तिला नोटीस पाठवत 15 कोटींचा टॅक्स वसूल केला. कारण, अशा प्रकरणांमध्ये 100 टक्के टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे टॅक्स वाचवणाऱ्यांवर आता उपग्रहाची देखील नजर असणार हे नक्की!
Sunday, March 31, 2019
१६ वर्षाच्या अनोलखी इसमाचा दगडाने ठेचून खून
---------------------युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,नागपूर.
नागपूर:- लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सुध्दा खूनाचे सत्र हे सुरूच आहे. हे कुठही थांबण्याचे नावच घेत नाही आहे. दिनांक २४.०३.१९ पो.स्टे.कुही येथे ही घटना झाली. अपहृत मुलगा नामे रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष रा. चिपडी, ता.कुही यास कुणीतरी अज्ञात इसमांनी घेवून गेले. पो.स्टे. कुही येथील दाखल असलेल्या गुन्ह्यात हरविलेला अपहृत मुलगा व पो.स्टे. नंदनवन नागपूर येथे दाखल गुन्ह्यातील अनोलखी इसम हा एकच आहे. असा संशय आल्याने अपहृत मुलांचे नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना मृतकाचे छायाचित्र दाखविले असता त्यानी ते ओलखून सदर मृतक हा माझा मुलगा रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष.रा. चिपडी, ता.कुही येथिल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मृतकाचे बहीणीसोबत आरोपी नामे शानू ईकबाल शेख यांचे प्रेमसंबंध असल्याने मृतकास पसंत नव्हते त्यामुळे मृतक हा त्यांना वेगले नजरेने पहात असल्याने आरोपीने मृतकाचा काटा नेहमीकरिता काढण्याचे ठरविले. वरून आपले साथीदार नामे विक्की उर्फ विराज मधुकर पाटील,वय १९ वर्ष. रा. मु.चिपडी. ता. कुही, जि. नागपूर व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे मदतीने मृतकास दिनांक २२/०३/१९ रोजी सायंकालचे वेलेस जेवण करण्याच्या बहाण्याने नागपूरला दुचाकी वाहनाने घेवून त्याचा मित्र नामे आशिष पाटील रा. अंतुजीनगर येथे रूममध्ये नेवून रात्रीच्या दरम्यान त्यास हातबुक्कीने मारहाण करून दुचाकी वाहनावर बसवून कचरा डंपिंग यार्ड वाठोडा मागे वाहन उभे करून तेथिल कच-याचे ढिगा-यावर पायदल नेवून आरोपी नामे शानू शेख याने मृतकाचे डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून त्यास जखमी केले. तिन्ही आरोपीतांनी मृतकाचे हातपाय पकडून जवल असलेल्या भांडेवाडी,सिवेज ट्रिटमेंट प्लांट. नागपूर येथे नेवून टाकून जिवानिशी ठार करून पुरावा नष्ट केला असे तपासात निषप्न् झाले..पोलिस उप आयुक्त राज तिलक रोशन परि.क्र.४ पो.नि.विनायक चव्हाण अरविंद भोले पो स्टे. नंदनवन,नागपूर शहर यांनी कार्यवाही केली.
---------------------युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क,नागपूर.
नागपूर:- लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सुध्दा खूनाचे सत्र हे सुरूच आहे. हे कुठही थांबण्याचे नावच घेत नाही आहे. दिनांक २४.०३.१९ पो.स्टे.कुही येथे ही घटना झाली. अपहृत मुलगा नामे रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष रा. चिपडी, ता.कुही यास कुणीतरी अज्ञात इसमांनी घेवून गेले. पो.स्टे. कुही येथील दाखल असलेल्या गुन्ह्यात हरविलेला अपहृत मुलगा व पो.स्टे. नंदनवन नागपूर येथे दाखल गुन्ह्यातील अनोलखी इसम हा एकच आहे. असा संशय आल्याने अपहृत मुलांचे नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना मृतकाचे छायाचित्र दाखविले असता त्यानी ते ओलखून सदर मृतक हा माझा मुलगा रोहित शांताराम रंगारी वय १६ वर्ष.रा. चिपडी, ता.कुही येथिल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मृतकाचे बहीणीसोबत आरोपी नामे शानू ईकबाल शेख यांचे प्रेमसंबंध असल्याने मृतकास पसंत नव्हते त्यामुळे मृतक हा त्यांना वेगले नजरेने पहात असल्याने आरोपीने मृतकाचा काटा नेहमीकरिता काढण्याचे ठरविले. वरून आपले साथीदार नामे विक्की उर्फ विराज मधुकर पाटील,वय १९ वर्ष. रा. मु.चिपडी. ता. कुही, जि. नागपूर व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे मदतीने मृतकास दिनांक २२/०३/१९ रोजी सायंकालचे वेलेस जेवण करण्याच्या बहाण्याने नागपूरला दुचाकी वाहनाने घेवून त्याचा मित्र नामे आशिष पाटील रा. अंतुजीनगर येथे रूममध्ये नेवून रात्रीच्या दरम्यान त्यास हातबुक्कीने मारहाण करून दुचाकी वाहनावर बसवून कचरा डंपिंग यार्ड वाठोडा मागे वाहन उभे करून तेथिल कच-याचे ढिगा-यावर पायदल नेवून आरोपी नामे शानू शेख याने मृतकाचे डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून त्यास जखमी केले. तिन्ही आरोपीतांनी मृतकाचे हातपाय पकडून जवल असलेल्या भांडेवाडी,सिवेज ट्रिटमेंट प्लांट. नागपूर येथे नेवून टाकून जिवानिशी ठार करून पुरावा नष्ट केला असे तपासात निषप्न् झाले..पोलिस उप आयुक्त राज तिलक रोशन परि.क्र.४ पो.नि.विनायक चव्हाण अरविंद भोले पो स्टे. नंदनवन,नागपूर शहर यांनी कार्यवाही केली.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती* (१४ एप्रिल २०१९ )साजरी करण्यात साठी "राष्ट्रवादी भवन" उस्मानपुरा, औरंगाबाद येथे बैठक आयोजित केली होती
विशेष प्रतिनिधी-दि.३०/०३/२०१९ रोजी सर्व पक्षीय जयंती उत्सव समिती *डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती* (१४ एप्रिल २०१९ )साजरी करण्यात साठी "राष्ट्रवादी भवन" उस्मानपुरा, औरंगाबाद येथे बैठक आयोजित केली होती.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मा.बाबुराव कदम साहेब , मा.कैलास पाटील , मा.काशिनाथ कोकाटे, मा.इब्राहिम पठान , मा.सुभाष लोमटे, मा.जी एस. अंसारी, मा.मिलींद शेळके, मा.मनोहर टाकसाळ, मा. निक्कम गुरुजी, मा.अजमल खान, मा.खाजा शीरफोदीन , प्रो.राम बाहीते, मा.उध्दव धवलकर, मा.रावसाहेब दारकोंडे, मा.मनोहर रसाळ, मा.गोविंद वाघमारे, मा.प्रकाश रेडे, मा.प्रितम सिंग झाबडा, मा.कवल नयन सिंग लांबा, मा.जस्पाल सिंग ओबेरॉय, मा.कुनाल सिंग गिल, मा.कय्युम शेख, मा.जावेद खान, मा.मोसिन खान, मा.विलास ढंगारे. मा.विनाताई खरे, मा.प्रतिभाताई वैद्य, मा.सलमा बानो, अनिसा खान, मा.नाजिमा माजीद, मा. मंजुषा पवार, मा.शोभा गायकवाड, मा.यशस्वी वाघमारे, मा. मुन्नी आपा, मा. वंदना वाघमारे, मा.जेबुनिसा मुकादम , मा.सरताज सय्यद, मा.सलमा शेख
, तसेच ज्यानी ३० वर्षा पासून या जयंती उत्सव समितीची धुरा अतिशय सुंदर व उत्साहाने सांभाळली असे आमचे लाडके स्वर्गीय नेते
*मा.मनमोहन सिंग ओबेरॉय साहेब.** यांना ध्यानी ठेवुन याचा वारसा बिनविरोधी *मा.नविन मनमोहन सिंग ओबेरॉय* यांना ऐक मताने अध्यक्ष पदी नियुक्ती व *मा. प्रशांत शेगावकर* ह्याना कार्याध्यक्ष पदी
नियुक्ती झाल्यावर बद्दल सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीत उपस्थित नेते मान्यवर मनस्वी आभार.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मा.बाबुराव कदम साहेब , मा.कैलास पाटील , मा.काशिनाथ कोकाटे, मा.इब्राहिम पठान , मा.सुभाष लोमटे, मा.जी एस. अंसारी, मा.मिलींद शेळके, मा.मनोहर टाकसाळ, मा. निक्कम गुरुजी, मा.अजमल खान, मा.खाजा शीरफोदीन , प्रो.राम बाहीते, मा.उध्दव धवलकर, मा.रावसाहेब दारकोंडे, मा.मनोहर रसाळ, मा.गोविंद वाघमारे, मा.प्रकाश रेडे, मा.प्रितम सिंग झाबडा, मा.कवल नयन सिंग लांबा, मा.जस्पाल सिंग ओबेरॉय, मा.कुनाल सिंग गिल, मा.कय्युम शेख, मा.जावेद खान, मा.मोसिन खान, मा.विलास ढंगारे. मा.विनाताई खरे, मा.प्रतिभाताई वैद्य, मा.सलमा बानो, अनिसा खान, मा.नाजिमा माजीद, मा. मंजुषा पवार, मा.शोभा गायकवाड, मा.यशस्वी वाघमारे, मा. मुन्नी आपा, मा. वंदना वाघमारे, मा.जेबुनिसा मुकादम , मा.सरताज सय्यद, मा.सलमा शेख
, तसेच ज्यानी ३० वर्षा पासून या जयंती उत्सव समितीची धुरा अतिशय सुंदर व उत्साहाने सांभाळली असे आमचे लाडके स्वर्गीय नेते
*मा.मनमोहन सिंग ओबेरॉय साहेब.** यांना ध्यानी ठेवुन याचा वारसा बिनविरोधी *मा.नविन मनमोहन सिंग ओबेरॉय* यांना ऐक मताने अध्यक्ष पदी नियुक्ती व *मा. प्रशांत शेगावकर* ह्याना कार्याध्यक्ष पदी
नियुक्ती झाल्यावर बद्दल सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीत उपस्थित नेते मान्यवर मनस्वी आभार.
Subscribe to:
Posts (Atom)
भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा
भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...
-
महापालिकेची विशेष कर वसुली मोहीम : शाळा, महाविद्यालय, मंगलकार्यालयासह पाच मालमत्ता सील थकबाकीदारांच्या मालमत्ताना मनपाने ठोकले टाळे ...
-
माजी केंद्रीय अर्थ मंत्री जेष्ठ नेते श्री. अरुणजी जेटली यांचे अल्पशा आजाराने एम्स मद्धे निधन 💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐 ...
-
सलीम अली सरोवरात महिलेचा मृतदेह आढळला औरंंगाबाद/प्रतिनिधी टीव्ही सेंटर रोडवरील सलीम अली सरोवरात एका ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गु...








