Tuesday, February 12, 2019

*आजकाल दर रविवारी विविध गावातुन नव- पुढारी स्वतःला मिरविण्यासाठी क्रिकेट स्पर्धा आजोजीत करून तरुण पिढी बरबाद करण्यासाठी ची वाटचाल सुरु आहे असा माझा आरोप आहे.*

मध्यंतरी MPSC स्पर्धा साठी मोफत आयोजन करूनही क्रिकेट मुळे.... इच्छुक न मिळाल्याने आयोजित कार्यक्रम रहित केल्याची दुर्दैवी पोस्ट होती..

अश्या या सर्वांसाठी खालील👇पोस्ट नक्कीच वाचा.






🌷🌷 *असही आदर्श गाव* 🌷🌷
*उत्तरप्रदेशातल्या जौनपूर जिल्हातलं माधौपूर नावाच गाव.* UPSC चा निकाल लागला कि कोणत्या घरातून कोणाचा नंबर लागला इतकीच चर्चा या गावात होतं असते. बरं या गावात किती घरं आहेत तर 75. होय फक्त 75. *आणि या गावातून IPS असणारे अधिकारी किती आहेत तर 45.* आत्ता हिशोब लावून विचाराल की बाकीच्या 30 घऱातल्याचं काय? तर ऊत्तर आहे बाकीच्या घरात पण IAS, IRS, IFS आहेत.

*सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे गावकऱ्यांना UPSC चा नाद लागण्यासाठी कोणताहा फाऊंडेशन कोर्स, क्रॅश कोर्स, अनअॅकडमी व्हिडीओ किंवा मी स्टेशनवर राहिलो, वडापाव खाल्ले टाईप भाषण कारणीभूत नाहीत.* पण हा गावकऱ्यांना हा नाद लागण्यापाठीमागे एक माणूस मात्र नक्कीच आहे.

*तसा या गावातून पहिला प्रशासकिय सेवेत जाणारा युवक म्हणून मुस्तफा हुसैन यांच नाव घेतलं जातं.* ते 1914 साली प्रशासकिय सेवेत दाखल झाले होते. पण गावकऱ्यांना अशी प्रथा अंमलात आणायला 1952 साल उजडावं लागलं. *1952 साली इंन्दूप्रकाश नावाच्या युवकाने UPSC च्या परिक्षेत 13 वी रॅन्क घेतली.* तिथून पुढे मात्र प्रत्येकाला UPSC चा नाद लागला.  *इंदूप्रकाश यांच्यानंतर गावातले चार सख्खे भाऊ, होय होय सख्खे म्हणजे एकदम सख्खे चुलत वगैरे अस नाही. तर या चार सख्या भावांनी एकाच वर्षी पोस्ट काढली. एकाच वर्षी चारही जणं IAS झाले.* या घटनेनंतर जोर वाढू लागला. त्यानंतर दोन सख्ये भाऊ IAS झाले. पुढे प्रत्येक घरात कोण ना कोण पास होत गेला. आणि UPSC तून पोस्ट काढणं हि गावची परंपरा झाली. पण इतक्यातवरच हे थांबत नाही. *गावातली मुलं UPSC पास झाली पण गावाला विसरली नाहीत.* आजही प्रत्येकजण गावात येतो. येतो म्हणजे पाहूण्यासारखं एक दोन दिवस नाही तर सर्वांची घर आजही याच गावात आहेत.

आत्ता मुलं पोस्ट काढत होते म्हणून मुली मागे राहिल्या वगैरे टाईप गोष्टी देखील इथे नव्हता. या गावातल्या मुली देखील मुलांच्या वरती होत्या. *आशा सिंह, उषा सिंह या बहिणी, चंद्रमौली सिंग या आयपीएस अशा कित्येक मुलींनी देखील UPSC तून पास होत या गावची परंपरा पुढे घेवून जाण्यास हातभार लावला आहे.*

*या गावातील विशेष व्यक्ती अन्जमेय सिंह आज मनिला येथील जागतिक बॅंकेत आहेत. डॉ. नीरू सिंह आणि लालेंद्र प्रताप भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे उच्चाधिकारी आहेत, ज्ञानू मिश्रा इस्त्रो मध्ये आहेत याशिवाय वेगवेगळ्या राज्यात सचिव, पोलिस महासंचालक यांसारख्या पोस्टवर देखील गावातील व्यक्ती पोहचल्या आहेत.*

असो हे झालं त्यांच्या गावाच आपल्या गावाचा आत्ता मुळशी पॅटर्न करायचा हि अस काही करायचं ते तुमच्या हातात आहे. *बघा वेळ झाला असला तरी, गावचा पहिला म्हणून परंपरा सुरू करायला हरकत नाही.*
*Deccan Placement Services*

*Urgent Required Maharashtra Registered Pharmacist at*

1) Santa cruz
2) Near JJ hospitals
3) Sandhurst road.  *(2)*
4) Bandra
5) Parel
6) Malad *(fresher)*
7) Kurla
8) Goregaon
9) Andheri
10) Dockyard Road
11) Byculla *( fresher)*
12) Virar *( male and female)*
13) Kalyan *( male & female)*

*Salesman Required at*

1) Andheri East *( experience and fresher )*
2) Byculla
3) dockyard road

*Delivery Boy*

1) Kurla
2) Byculla

*Medical Representative*

1) Borivali
2) Andheri
3) Malad

Intrested candidate may contact

*7020276611*
All UPSC👆 Aspirants please fill this form. Zakat foundation of India's sponsorship exam. Aurangabad Maharashtra center hai. Please do positively and contact us if needed.
Ex-RTO Saleem Sk. Sir
Mobile 8329765456
9881195533

Prof. Mushtak Baig sir
8668620106



http://www.zakatindia.org/images4/ZFI-Civil-Services-Notification-January-2019.pdf
भाजपाच्या मोदी भक्तांनो,भाईयो और बहनो......मेरे देश वासियो.........
*आता आमची ‘मन की बात’.*

सासू-सासरे पाहून कोणी आयुष्याचा जोडीदार निवडत नसतं पण तरीही मी मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून कोणालाही मतदान करण्यास तयार आहे; फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत.

*माझे असे मत आहे की, जुनी आश्वासने पूर्ण केल्याशिवाय नवीन आश्वासने दिली तर त्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. तेव्हा मा. पंतप्रधानांनी २०१९ साठी नवीन स्वप्ने दाखवण्यापेक्षा जुन्याच आश्वासनांच्या व स्वप्नांच्या पूर्ततेबाबत बोलावं.*

1] २०१४ च्या निवडणुकीपूर्वी देशाच्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलेले होते का ?
*जर आठवत असेल तर तशी रक्कम प्रत्येक नागरिकाच्या खात्यात जमा झाली का ?*
जर उत्तर ‘नाही’ असेल तर मग मी तुमच्या नावावर मतदान का करू ?

काही दिवसांपूर्वी एका भक्ताने कविता पाठवली होती, ‘पंधरा लाख कसले मागता ? मोदींचा प्रत्येक शब्द लाखमोलाचा’. मान्य. पण साहेब, तुमची भाषणे ऐकवून लाख सोडा एका रुपयाच साहित्यसुद्धा भारतीय दुकानदार देत नाहीत हो. त्यामुळे ज्यांना या लाखमोलाच्या शब्दांचा संग्रह करायचा आहे त्यांनी खुशाल करोडोंची तिजोरी भरून ठेवावी. मला फक्त एवढेच सांगा, देशाच्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केले नसताना त्यांना मतदान का करावं ?

2] १०० दिवसांत स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते का ?
जर आठवत असेल तर दिवस मोजायला चुकलात का ?
जर आता तुम्ही आंतरराष्ट्रीय कारणे देत असाल तर स्विस बँक २०१४ च्या निवडणुकीनंतर स्विस बँक तुमच्या अखत्यारीत येणार होती का ?
*जर तुमच्याच नियोजनानुसार सव्वा तीन महिन्याचं काम सव्वा चार वर्षे पूर्ण होत नसेल तर तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा ?*

3) मोदीजी तुम्ही दर वर्षी 2 करोड तरूनांना रोजगार देण्याचे आस्वासन दिले होते हे तुम्हाला आठवते का ?
*आठवत नसेल तर तुमची 2014 च्या निवडणुकीतील भाषणे ऐका* दर वर्षी 2 करोड तरूनांना रोजगार देने तर सोडाच पण ते करीत असलेला छोटामोठा रोजगारही तुम्ही देशातील 24 लाख लघु उद्योग नोटबंदी करून हिरावले.

4] पेट्रोलची किंमत पस्तीस ते चाळीस रुपये होईल असे आश्वासन दिले होते का ?
*जर आठवत असेल तर आश्वासनपुर्तीसाठी २०१९ ची निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहत आहात का ?*

5] सिलेंडर ४०० रुपयांचे झाले म्हणून तुम्ही आंदोलने केली होतीत. आज आम्ही ८०० रुपये मोजत आहोत.
*सिलेडरच्या किमतीविषयी तुम्ही काही आश्वासने दिली होतीत का ? बघा आठवली तर ...*

6] मोदीजी तुम्ही ‘एक रुपया म्हणजे सत्तर डॉलर होणार’ असे काही बोलले होतात का ?
आजची किंमत नेमकी उलट असल्याचे ऐकत आहे.

7] मोदीजी तुम्ही शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते ?
*मग शेतकर्यांना खर्च वजा जाता दिडपट भाव दिला का ?जर आठवत असेल तर उत्तर द्या, शेतकऱ्यांना आंदोलने का करावी लागली ?*

8] नोटाबंदीच्या काळात तुम्ही  ‘फक्त ५० दिवस त्रास सहन करा’ असे भारतीयांना आवाहन केले होते का ?
*मग 50 दिवस सोडा तीन वर्षांनी ‘नोटाबंदी फसली’ असे रिजर्व बँकेने का जाहीर केले ?*

9] मोदीजी तुमची मूळ विचारसरणी  ‘हिंदूराष्ट्र’ असताना कमीत कमी जातीय ऐक्य तरी तुम्हाला साधता आले का ? *हिंदु म्हणून तुम्ही ब्राम्हणेतर जातीसाठी काय केले ? त्यांच्या ऊन्नतीसाठी काय केले ?*
वेगवेगळ्या जाती रस्त्यावर का उतरत आहेत ?

10] विदेशी कंपन्या भारतात येण्यासाठी मोदी अर्धे जग फिरून आले आणि स्वामी रामदेव बाबा म्हणतात, ‘स्वदेशी वापरा, विदेशी हटवा’. *एकदा एकमेकांची भेट घेऊन नक्की काय करायचं ते ठरवाल का ?*

11] कॉंग्रेसच्या काळात कर्ज घेणारे *विजय माल्या, ललित मोदी, निरव मोदी वगैरे लोक भाजपच्या काळात देशाबाहेर गेले कसे ?* भारतीय सामान्य जनतेला माहित नाही असा कोणता मार्ग त्यांना सापडला ?

12] मा. नरेंद्र मोदीजी ‘एक सर के बदले दस सर लायेंगे’ असे काही म्हणाले होते का ?
*मग जवानांच्या हौतात्म्यानंतर दहापट सर मागवण्याऐवजी साखर कशी मागवली ?*
ज्या मात्या-पित्यांनी पुत्र गमावला, ज्या पत्नीने पती गमावला, ज्या मुलांनी पिता गमावला त्यांना त्या साखरेची चव गोड  असेल का ? *अशा वेळी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम सांगताना ५६ इंचांची छाती तेवढीच राहते का ?*

13] तुम्ही सांगता, सत्तर वर्षांत अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या. बरोबरच आहे. *कालपर्यंत जनता न्यायाधीशांकडे न्याय मागायला जात होती. पहिल्यांदाच न्यायाधीश जनतेकडे न्याय मागायला रस्त्यावर आले.* न्यायाधीशांनाच न्यायप्रणालीवर विश्वास राहिला नाही का ?

14] बुलेट ट्रेन मुंबई- अहमदाबाद असावी की  काश्मीर- कन्याकुमारी ? की मुंबई/अहमदाबाद- कोलकाता ? ‘संपत सरल’ या हास्यकवीने सुंदर रचना केली,
*बुलेट ट्रेन करार होणे के बाद दुसरे दिन मोदीजी जपानी पंतप्रधान को बनारस ले गये और तीन घंटोतक गंगा आरती दिखाई| तो उन्होने पुछा, जब आपके पास इतनी फुरसत है तो बुलेट ट्रेन क्या करनी है ?*

15] २०१२ च्या निर्भया प्रकरणानंतर रस्त्यावर उतरणारे तुम्ही *आसिफा प्रकरणानंतर का शांत बसले होते ?*

16] उत्तर प्रदेशमध्ये ६० लहान मुले ऑक्सिजनशिवाय मरण पावली असताना *आम्ही दहा लाखांचे कोट का घालून फिरत आहोत ?*

17] ‘आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो आहोत’ *असे विधान करणारे अनंतकुमार हेगडे अजूनही, असे विधान केल्यानंतरही संसदेत मंत्री बणून कसे येतात ?*

18] हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विघातक शस्त्रांसह पकडल्यानंतर  *A.T.S. च्या प्रमुखांची बदली का होते ?*

19] ज्या संविधानातील कलमांचा आधार घेत मोदीजी पंतप्रधान झाले *त्याच संविधानाच्या प्रती जाळून टाकणाऱ्या संघटनांवर अजून कारवाई का होत नाही ?*

20] इराक-सिरीया येथे मुस्लीम धर्मरक्षणासाठी (?) निरपराध मुस्लीम लोकांची कत्तल करणाऱ्या मुस्लीम संघटनांना आपण ‘आतंकवादी’ म्हणतो *मग हिंदुस्थानातील हिंदू धर्मरक्षणासाठी (?) निरपराध हिंदू लोकांना गोळ्या घालणाऱ्या व बॉंब तयार करणाऱ्या हिंदू संघटनांना आपण  ‘आतंकवादी’ म्हणणार का ?*

21] *उमेदवारांना शून्य मते मिळत असताना निवडणुकीसाठी मशीनच वापरण्याचा अट्टाहास का ?* उमेदवारांनी स्वत:लाही मतदान केले नाही असे आपण म्हणू शकतो का ?

*मोदीजी, मी तुमचा फक्त टीकाकार नाही बरं का, तुमच्या भाषण शैलीचा मी जबरदस्त चाहता आहे पण भाषणांमुळेच सत्ता मिळत असती तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांचे पक्ष कधीच हरले नसते.*

मोदीजी तुमच्या सर्जिकल स्ट्राईकचा मी जबरदस्त पुरस्कर्ता आहे *पण जेव्हा एक जवान ‘आम्हाला खायला अन्न मिळत नाही’ अशी जाहीर माहिती देतो तेव्हा मन खट्टू होतं.*

मोदीजी तुमच्या मार्केटिंग स्टाईलचा मी जबरदस्त चाहता आहे पण *वीतभर नफ्याची जाहिरात हातभर खर्च करून लोकांपर्यंत पोहचवली जाते असे ऐकतो, वाचतो तेव्हा नफ्याविषयीच शंका येते.*

*मोदीजी*, तुमची कथा सांगण्याची पद्धत अफलातून आहे. तुम्ही जर शिक्षक झाला असता तर नक्कीच विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते विद्यार्थी झाला असतात पण *गटारीच्या ग्यासवर चहा तयार करण्याची तुमची कथा ऐकली. साहेब, इतके जबरदस्त अविष्कार आपल्याला सिध्द करावे लागतील* नाहीतर लोक विश्वास ठेवत नाहीत. लहान मुलेसुद्धा विनोद म्हणून हसतील हो.

एक ते पंतप्रधान होते जे बोलतच नव्हते पण जनहित व देशहिताचे कामे करून ज्यांनी देशाचा मान जगात उंचावला आणि एक हे आहेत जे बोलतच राहतात पण करत काहीच नाही, *तसंही काही करण्यासाठी काही समजलंही पाहीजे ना ?* म्हणून आज ‘आमची मन की बात’ मांडली.

*मोदीसमर्थक समर्पक उत्तरे द्या,१००% मोदींना मत देईल. नाहीतर माझे मत...*

*तसंही माझ्या एका मताने असा काय फरक पडणार आहे ? पण मी माणूस म्हणून माझ्या मनातील रास्त प्रश्न माझ्या 10 मित्रांना पाठविणार, आपणही तसेच करा व जनतेच्या, भारताच्या व भारतीय संविधानाच्या जिवावर उठलेल्या भाजपाच्या मोदी सरकारला 2019 च्या निवडणूकीत सत्तेतून हाकलत या.*

*जय हिंद, जय भारत, जय संविधान*
13,000 pharmacists having qualification outside Maharashtra under scrutiny

Laxmi Yadav, Mumbai
Thursday, January 31, 2019, 08:00 Hrs  [IST]
Pharmabiz
Close on the heels of the arrest of four pharmacists and the chairman of a pharmacy college in connection with a fake certificate scam, around 13,000 candidates who have registered with the Maharashtra State Pharmacy Council (MSPC) over last eight years after obtaining pharmacy qualification from other states as well as transferred their registration from other states to Maharashtra are under scrutiny.

Thane crime branch which has recently arrested four pharmacists-- Raju Yadav, Arvindkumar Bhat, Budharam Ajneya and Balwant Singh Chauhan-- running drug stores in and around Thane with the help of the fake D.Pharm certificate provided by a pharmacy college, Deep Paramedical Organisation, has sought details of pharmacists who got registered with the MSPC from 2011 to December 18, 2018 on completion of diploma and degree in pharmacy out of Maharashtra or the pharmacists who transferred their registration from other states to Maharashtra. The crime branch has written to the MSPC in this regard.

It is learnt that around 1.25 lakh pharmacists have registered with the MSPC from 2011 to 2018. Of them, around 13,000 pharmacists are those who either pursued pharmacy courses from other states or transferred their registration from other states to Maharashtra. Of 13,000 pharmacists, most of the candidates are diploma holders.
As a precautionary step to prevent registration of candidates with fake pharmacy qualification, the Council has stopped registration of pharmacy students belonging to SunRise University and OPJS University in Rajasthan from January 21, 2019 after the arrest of four pharmacists with bogus qualification bearing the name of these Universities.

Confirming this, Vijay Patil, president of MSPC told Pharmabiz that during police investigation, it was found that the four pharmacists who were recently arrested had bogus D.Pharm certificates bearing the name of SunRise University and OPJS University in Rajasthan. Hence we have decided to stop registration of candidates from these universities till the probe is going on, he added.

He said as per Section 32(2) of Pharmacy Act, the MSPC conducts document verification of pharmacists before their registration. Once a pharmacy college confirms that the students aged 18 years or above have passed out from their institutes and they reside or do business in Maharashtra, we have no option but to allow their registration.

It is learnt that there are several pharmacy colleges in Karnataka and Rajasthan offering working candidates opportunity to study from home in violation of attendance norms of Pharmacy Council of India. They help candidates clear the examinations and get the pharmacy qualifications—D.Pharm, B.Pharm. Such candidates often lack requisite professional skills thus posing risk to public health.

In a bid to prevent such candidates from registering with the MSPC, we had started skill test of candidates having pharmacy qualification from other states or transferring their registration to Maharashtra from other states. The test was later stopped following a directive from PCI, said Patil.

Monday, February 11, 2019

महिला व बाल कल्याण समिती महानगरपालिका औरंगाबाद व एमसीइडी यांच्या संयुंक्त विद्यमाने मार्गदर्शन
       
          युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क फोटो

आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी महिला व बाल कल्याण समिती महानगरपालिका औरंगाबाद व एमसीइडी यांच्या संयुंक्त विद्यमाने  संत तुकाराम महाराज नाट्यगृह सिडको येथे महिला बचत गट व महिला उद्योजिका यांच्या साठी उद्योजकता मार्गदर्शनपर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महिला बाल कल्याण समिती सभापती श्रीमती माधुरी अदवंत ह्या होत्या. यावेळी एमसीईडी चे श्री बिंगार बीने ,श्री नलावडे ,श्री शिंदे ,मनपा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा थेटे,यशस्वी उद्योजिका श्रीमती रेखा वाहटुले तसेच 300  महिलांची यावेळी उपस्थिती होती.
   यावेळी मा महापौर यांनी या कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी  आपल्या कॉलेज जीवनात एमसीईडी तर्फे उद्योग उभारण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचा उल्लेख केला व जवळपास १००० ते १२०० विद्यार्थ्या मधून फक्त ३० जणांची निवड झालेल्या मध्ये त्यांची निवड झाली होती हे हि त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.तसेच यावेळी एमसीईडी च्या अधिकारी यांनी उद्योग कसा करावा व उद्योग उभारण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा याचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले. तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रीमती माधुरी अदवंत व महिला बाल कल्याण विकास अधिकारी श्रीमती अपर्णा थेटे यांनी महिलांना याबद्दलचे मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       तसेच आज महिला व बाल कल्याण समिती महानगरपालिका यांच्या वतीने मनपा कचरा वेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संत तुकाराम महाराज नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन मा महापौर श्री नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रीमती माधुरी अदवंत ह्या होत्या. यावेळी मनपा आरोग्य विभागाच्या डॉ परदेशी, डॉ सोनी,डॉ वृषाली ,श्री विष्णू चव्हाण , श्री अरुण चौधरी, मनपा महिला कचरा वेचक अध्यक्ष श्रीमती आशाताई ढोके,श्रीमती साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी जवळपास २००   कचरा वेचक महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यात मधुमेह ,एच आय व्ही शुगर , हिमोग्लोबिन इ.तपासण्या करण्यात आल्या.तसेच यावेळी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून उद्योजक महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे व कचरा वेचक महिलांना मोफत आरोग्य तपासणी मार्फत आरोग्याचे वाण यावेळी देण्यात आले.
जामगाव येथे 10 दिवसांत दुसरी आत्महत्या
युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क-
 गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील 23 वर्षीय युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या 10दिवसातील हि दुसरी आत्महत्या आहे गेल्या 10दिवसापूर्वी देविदास राजसाहेब माने या 19वर्षीय युवकाने आत्महत्या केली होती.
  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामगाव येथील रहिवाशी दिपक शिवाजी मगर वय 23 वर्षे याने 9 फेब्रुवारी रोजी शनिवारी पहाटे चार साडेचार वाजेदरम्यान राहत्या घराच्या बाजूला असलेल्या छपरामध्ये बल्लीला दोरी बांधून फाशी घेतली त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्याचे शव विच्छेदन करण्यात आले .तो पंचगंगा सिड कंपनी मधुन काम करुन पहाटे घरी आल्यावर त्याने फाशी घेतली दिपक मगरच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नाही याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हे. काँ संजय मानकर करत आहे. दुपारी जामगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...