Saturday, January 12, 2019

रेल्वे बोर्ड नवी दिल्लीच्या आदेशानुसार रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

नियम मोडणाऱ्यां 157  जणांकडून 83 हजार तिनशे रुपये दंड वसूल

औरंगाबाद ।प्रतिनिधी

रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उचलत रेल्वे सुरक्षा बलाने दि. 5 ते 11 जानेवारी  या कालावधीत  एकूण 157 जणांवर रेल्वे कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.या कालावधी दरम्यान अश्या  नियम मोडणाऱ्यांकडून  रेल्वेच्या विविध कलमातंर्गत तब्बल 83 हजार तिनशे रुपयाचा एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. ही, कारवाई  (रे.सु. ब. )पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

   रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या  आदेशांचे पालन करत  रेल्वे पोलिसांनी दि. 5जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान अश्या नियम नपाळणाऱ्यांवर मोठी कारवाई  करण्यात आली आहे.रेल्वे स्थानक परिसरातील बेशिस्त वाहन चालक तसेच इतर विनापरवाना फिरणाऱ्या फेरीवाल्यांना विरुद्ध रेल्वे कायद्या अंतर्गत दंड वसूल करण्यात आला आहे.त्याचं प्रमाणे रेल्वे स्थानक आवारात उपद्रव घालणारे तृतीयपंथी यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बेकायदेशीर पणे रेल्वे पटरी ओलांडून प्रवास करणे, नो - पार्कींग जागेवर सर्रासपणे रिक्षा उभ्या करणे,  रेल्वे बोगीत पायरीवर बसून प्रवास करणारे, विनातिकीत प्रवासी करणे, रेल्वे स्थानकात लघवी व  कचरा टाकणारे,  विनापरवाना गाडीमध्ये  खाद्यपदार्थ विकणारे   इतर फेरीवाले आदींवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कारवाई केली. ह्या कारवाईत      नियम मोडणाऱ्या अश्या एकूण 157 जणांविरुद्ध कारवाई करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता मा.न्यायाधीशांनी नियमांचे उल्लंघन मोडणाऱ्यांवर दंड लावण्यात आला आहे.

    रेल्वे बोर्ड नवी दिल्ली यांच्या आलेल्या आदेशानुसार  रेल्वे पोलिसांनी  रेल्वे कायद्याच्या वेगवेगळ्या कलमातर्गत रेल्वे पोलिसांनी सहा दिवसांमध्ये 157 नियमांचे उल्लंघन मोडणाऱ्यांवर एकुन  जवळपास 83 हजार तिनशे रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला . ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शर्मा, सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप कांबळे,  (पो.हे.कॉ.)एन. आर. खान, (पो. हे.कॉ.) व्ही. जी.लोने, बि. रविकांत ,सुनील नलावडे ,ए. एच. शेळखे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केली.

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...