Thursday, November 14, 2019

तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली.  संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.
लेखापरिक्षण अहवालातील आक्षेपांवर वर्षभरानंतरही अधिकारी खुलासे देईनात

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत प्रकार उघडकीस

औरंगाबाद /प्रतिनिधी

महापालिकेच्या वर्षभरातील जमा-खर्च याचे लेखा परीक्षण करण्यात येते. यात आर्थिक नुकसान आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे अहवालात उघड होतात. मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी वर्षभरापूर्वी अहवाल प्रशासनाकडे सादर केलेला आहे. त्यात अनेक गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही यासंबंधी कुठलीच कारवाई झाली नसल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१४) पार पडलेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. यासंबंधी कारवाई का झाली नाही ? असा सवाल सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी लेखापरीक्षण संबंधी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी उपलब्ध संचिकापैकी बहुतांश संचिकांचे परीक्षण करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यानंतर वाडकर यांनी महत्त्वाचा संचिका लेखापरीक्षणला उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचे सांगत, महापालिकेचे झालेले नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? मनपाचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना माफ कसे करायचे ? असा सवाल उपस्थित केला. यावर देवतराज यांनी अहवाल सादर करून एक वर्ष झाले. त्यावर आयुक्त निर्णय घेतील असा खुलासा केला. त्यानंतर आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी सध्या खुलासे घेण्याचे काम सुरू असल्याचा खुलासा बैठकीत केला. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी दिले.
उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायमास लाईट बंद असून मनपा चे दुर्लक्ष.

हेच ते उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायलाईट बंद आहे व मनपा चे ह्याकडे दुर्लक्ष.

नुकताचगुजयंती साजरी झाली,आम दिवसात तर सोडाच गुरुनानक जयंतीत सुद्धा नगरसेवकाने काम केले नाही व महानगरपालिकेचे अधिकार्‍यांना जाग आली नाही.




Sunday, November 10, 2019

*राशेन व दुकान चालकावर होणार गुन्हा दाखल*
बर्‍याच ठिकाणी आसे होत आहे की राशन दुकान चालक कानाला कान लावून शासनाची दिशाभूल करून गोर गरीब जनतेला गहू,तांदुळ,दाळ,साखर,ईत्यादी वस्तु शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त दराने विक्री करत आहे.प्रत्येक गावातील राजकारण,दबाव,टाकून हमी भावाविरूध्द आवाज करणाऱ्या माणसाला डवचण्याचा प्रयत्न काही दुकानदार करीत आहेत,त्यामुळे प्रहार जन शक्ती संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला ञास झाला नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत,यानंतर गोपनीय माहिती नुसार अधिकारी गावात येऊन प्रत्येक जनमानसाला हमी भावाविषयी माहीती विचारून पावती पेक्षा जास्त पैसे जर दुकान चालक घेत आसेल तर त्या दुकान चालकाविरुद्ध व शासनाने नेमलेल्या सचिवाविरूध्द गुन्हा दाखल होईल.तसेच दुकान चालक किती पैसे मागतात याची रेकॉर्ड करा तुमची माहीत खोपीनीय ठेवण्यात येईल. विनंती आहे प्रत्येक राशेन दुकान चालकाने दक्षता घ्यावी.

Saturday, November 9, 2019

११ वा  वृक्षारोपण कार्यक्रम वाळूज पोलीस स्टेशन समोर संपन्न झाला
Photos:-Baig Mushtak Mirza,Waluj, Aurangabad.


दि. ०६/११/२०१९ रोजी मेटॅलमन ऑटो प्रा.ली  कंपनीने १०१ झाडे वाळूज एम आय डी सी  पोलीस स्टेशन दुभाजकावर लावण्याचा कार्यक्रम श्री  बिक्रमजीत बेंबी (चेअरमन ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.




या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.  श्रीकांतजी मुंदडा (सी ओ ओ ), श्री प्रभाकर मते पाटील ( भारतीय कामगार सेना -चिटणीस ), श्री विजय साळवे (एच आर मॅनेजर ), श्री वाघ साहेब ( पोलीस निरीक्षक -वाळूज पोलीस स्टेशन ), श्री  अनिलकुमार डहाळे ( जी एम ) व श्री. कल्याण पिंप्रतीवर ( युनिट अध्यक्ष -भारतीय कामगार सेना) हे होते.


 मेटॅलमन ऑटो कंपनीने आतापर्यन्त वाळूज परिसरात ३५०० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत
या कार्यक्रमात  कंपनीतील  अधिकारी श्री. प्रकाश येखांडे ,सूर्यकांत शानबाग ,आनंद गलगली ,प्रवीण जोशी ,विक्रम पटवर्धन ,गजेंद्र  दकते ,अथिया युसूफ यांनी विविध प्रकारची झाडे लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुमित पाटील व आभार प्रदर्शन श्री. सचिन घोडके यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीतील श्री. अवधूत शिंदे, सुशील देवळे, विनोद वानखेडे ,रविकांत चिखले ,नारायण निकम ,गुरुदास पराते व बाळासाहेब नाटकर यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमात कंपनीतील कामगार व कर्मचारी उपस्थित होते.

Friday, October 4, 2019

इम्तियाज जलील, जावेद कुरेशी यांच्यात वादावादी. औरंगाबादचे राजकारण तापले.
Photos:-Baig Mushtak Mirza, Aurangabad

औरंगाबाद: ऐसें छप्पन आये और गये, मजलिस किसी मौताज नही, याहा सिर्फ ओवेसी साहेब की बात को किमत है, वो किसी राह चलते को, रिक्षावाले को भी तिकीट देगे तो उसको चुन के लायगे, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी जावेद कुरेशी यांना नाव न घेता भाषणात टोला लगावला. त्याचा जाब विचारण्यासाठी कुरेशी आपल्या जागेवरून उठत इम्तियाज यांच्याकडे गेले. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ओवैसी यांच्या समोरच हा प्रकार घडल्यामुळे सभेत काही काळ घोषणाबाजी आणि गोंधळ उडाला. व्यासपीठावरील नेत्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवारी वरून धुसफूस सुरू आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आपले विश्वासू नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने कुरेशी नाराज होते. त्यातच इम्तियाज जलील यांनी आज ओवेसी यांच्या समोरच जावेद कुरेशी यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे कुरेशी यांचा पारा चढला.
भाषण संपवून इम्तियाज जागेवर येऊन बसत नाहीत, तोच कुरेशी त्यांच्याकडे गेले आणि तावातावाने बोलू लागले. ओवेसी भाषण सुरू करत असतानाच त्यांच्या पाठीमागे कुरेशी- इम्तियाज यांच्यात खडाजंगी सुरू होती. ही बाब समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजीला सुरवात केली. तोपर्यंत व्यासपीठावरील नेत्यांनी धाव घेत कुरेशी आणि इम्तियाज यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तीन चार मिनिटे सुरू होता. समोर गोंधळ आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओवेसी यांनी दम भरत शांत केले आणि भाषणाला सुरवात केली
कुरेशी बंडाच्या तयारीत?
दरम्यान, सभेनंतर कुरेशी यांनी आपल्या कार्यालयात समर्थकांची बैठक घेत इम्तियाज यांच्या विधानावर आक्षेप घेत, एमआयएमचा शहरात पाया आपण रचल्याचा दावा केला. ओवेसी यांनी भेटण्यासाठी वेळ दिली आहे, त्यांच्याशी भेटून पुढील निर्णय घेऊ असे जाहीर करतांनाच इम्तियाज जलील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे सांगितले.

Tuesday, October 1, 2019

रेल्वेस्टेशन येथुन रिक्षात बसवुन प्रवाश्यांना लुटणाऱ्या टोळीच्या उस्मानपुरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

आरोपीकडून २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद/ प्रतिनिधी
जनशताब्दीने रेल्वे स्टेशनवर उतरून तेथून २८ सप्टेंबर रोजी गादिया विहार कडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला लुटणाऱ्या टोळीला मुद्देमालासह उस्मानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.१) गजाआड केले.
मोहम्मद नमीर अन्सारी मोहम्मद मजाहिर अन्सारी (वय-२५ रा. बेहरमा गढी, ता.कसबा नेहतोर, जि.बिजनौर उत्तरप्रदेश ह.मु. आझाद चौक, औरंगाबाद), खर्शीद अंसारी वल्द युसुफ अंसारी (वय ३५ रा. गल्ली न. 11 आझाद चौक रहीम नगर औरंगाबाद), गुलफाम अंसारी वल्द जुल्फीकार अंसारी (वय २६ रा. बेहरमा गढी, ता.कसबा नेहतोर, जि.बिजनौर उत्तरप्रदेश ह.मु. आझाद चौक, औरंगाबाद अशी आरोपींची नावे असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजता सेवानिवृत्त शिक्षिका व त्यांचे पती हे
जनशताब्दी रेल्वेने औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे उतरुन राहत्या घरी गादिया विहार येथे जाण्याकरिता रिक्षात बसले होते. रिक्षा चालकाने अगोदर दोन व्यक्ती बसवुन ठेवले होते. बसण्यास अडचण होत असल्याने या दाम्पत्याने त्यांच्याकडील बॅग सहप्रवशी आरोपींकडे दिल्या. आरोपीनी बॅगमधुन एकुण 207.19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत एकुण 02,74,833/-रु, व 25000/- रु. रोख रक्कम असे एकुण 02,99,833/- रु.कि.चा मुद्देमाल रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी लुटला होता. याबाबत उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रेल्वेस्टेशन सीसीटीव्ही कंट्रोल रुम त्यांचेकडुन आरोपीबाबत माहिती घेवुन आरोपीची सीसीटीव्ही फुटेजमध्ये पडताळणी केली असता आरोपी हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळुन आला नाही. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेस्टेशनला रेल्वे आल्यानंतर गर्दी करणा-या रिक्षाचालकापैकी संशयित रिक्षाचालक मोहम्मद नमीर याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवितात त्याने गुन्हा कबुल करीत साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक ऑटो रिक्षा क्र.MH 20 EF 3505, दोन मोबाईल, 05.5 तोळे सोन्याचे दागिने किंमत 02,09,000/-रु. व 10,000/-रु. रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सपोआ साखोळे, पोनि दिलीप तारे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सर्जेराव सानप, पोकॉ अश्ररफ सय्यद, राहुल काळे, मनोज बनसोडे यांनी केली.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...