Friday, March 22, 2019

तर मी मंत्रिपद सोडायला तयार : रामदास आठवले

रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार असतील, तर त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष व्हावे,  असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केले. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे ऐतिहासिक क्रांतिस्तंभ येथे आयोजित जाहीर अभिवादन सभेत आठवले बोलत होते.
यावेळी  विचारमंचावर आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, सुमीत मोरे,  काकासाहेब खंबाळकर, आमदार भरत गोगावले,  सिद्धार्थ कासारे, सूर्यकांत वाघमारे, महेंद्र शिर्के, सुमीत वजाळे,  चंद्रशेखर कांबळे, प्रावीन मोरे, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
"मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? माझ्या हाती आहे झेंडा निळा म्हणून त्यांचा आहे माझ्या मंत्रिपदावर डोळा ! माझे मंत्रिपद घालविण्याचा विचार करण्यापेक्षा रिपब्लिकन ऐक्य करून समाजात मंत्रीपद वाढविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे असे सांगत मला मंत्रीपदाची फिकीर नाही'' असे वक्तव्य रामदास आठवले यांनी करून रिपब्लिकन ऐक्याची साद आंबेडकरी जनतेला घातली.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ९२ वर्षांपूर्वी महाडमध्ये पाण्याला स्पर्श करून मानवी मूलभूत हक्कांचा समतेचा लढा उभारून क्रांती केली. एका बाजूला आहे शिवरायांच्या रायगडाचा पहाड  तर एका बाजूला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिभूमीचा महाड.  असे महाड चवदार तळे सत्याग्रहावेळी सनातनी विरोधकांनी सत्याग्रहिंवर दगडफेक,  हल्ले केले. रक्तबंबाळ होऊन सत्याग्रही भीमसैनिक डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे येऊन आम्हाला प्रतिहल्ला करण्याची परवानगी मागू लागले तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना हिंसेचे उत्तर हिंसेने देऊ नका असे बजावले. त्यांच्या डोक्यातील वाईट द्वेष विचार आज न उद्या दूर होईल  असे सांगितले.
अज्ञान दूर झाल्याने आज चवदार तळ्याच्या  पाण्याला आपण स्पर्श करताना  कोणी विरोध करीत नाही. मानवी मूलभूत अधिकार कोट्यवधी शोषितांना मिळवून देण्याचा मानवमुक्तीचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंकले आहेत. त्या दिग्विजयी नेत्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी; महाड क्रांतिदिनी अभिवादन करण्यासाठी आपण आलो आहोत असे रामदास आठवले म्हणाले.
समाजात विनाकारण तेढ निर्माण करणे योग्य नाही. मागसावर्गीयांसह सवर्ण  सर्व समाज एकत्र आला पाहिजे. भारतीय दलित पँथर च्या शाखा स्थापन करताना मी सांगत होतो की सवर्ण समाजाविरुद्ध दलित पँथर नाही. समाजात समता निर्माण झाली पाहिजे यासाठी मी काम करीत असून समाजिक ऐक्यासाठी आपण शिवशक्ती भीमशक्ती एकत्र केली. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मी पहिली मागणी केली होती असे  रामदास आठवले  म्हणाले. 
Congress declared-news from Delhi
1)subhash zambad from Aurangabad as candidate.

2)Loksabha and vilas avtade from jalna.








लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी
1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
4) ठाणे- राजन विचारे
5) कल्याण- श्रीकांत शिंदे
6) कोल्हापूर- संजय मंडलिक
7) हातकणंगले- धैर्यशील माने
8) नाशिक- हेमंत गोडसे
9) शिर्डी- सदाशिव लोखंडे
10) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
11)संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
12)बुलढाणा- प्रतापराव जाधव
13)रामटेक- कृपाल तुमाणे
14)अमरावती- आनंदराव अडसूळ
15)परभणी- संजय जाधव
16)मावळ- श्रीरंग बारणे
17)धाराशिव  – ओमराजे निंबाळकर
18)हिंगोली - हेमंत पाटील
19)यवतमाळ - भावना गवळी
20) रायगढ़ - अनंत गीते
21) सिंधुदुर्ग रत्नागिरी - विनायक राऊत
For more updates plz Subscribe to our you tube channel YUVA SAMNA MEDIA.

Thursday, March 21, 2019

धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरुवारी रात्री पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून आता सोनाली विजय पवार यांची  प्रकृती आता स्थिर आहे.
विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून मंगळवेढा तालुक्यातील ते पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. त्यांची नुकतीच मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून बदली झाली होती. सध्या ते मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते. होळीची सुट्टी असल्याने ते मुंबईहून घरी आले होते. घरी असताना मध्यरात्री उशिरा यांचा पत्नी सोनाली पवार यांच्याबरोबर घरगुती कारणावरुन वाद झाला. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉव्हरमधून पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पत्नीला तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सोलापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस कर्मचारी हरिदास सलगर आणि इतर पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
तुम्हाला गुलाम व्हायचंय की ताठ मानेनं जगायचंय?
-प्रतीक पुरी

मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजप शासनाला विरोध असण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे मोदी सत्तेत आल्यापासून भाजपनं गुलामीची एक नवी मूल्यव्यवस्था जाणीवपूर्वक रुजवायला सुरूवात केली आहे. ही गुलामी वरकरणी श्रमप्रतिष्ठेच्या आवरणात गुंडाळलेली आहे पण आंतून तिचं हीडीस स्वरूप स्पष्टपणे दिसून येतं. संघाची वर्णवर्चस्ववादी वृत्ती व जातीयतेचं अस्तर त्याला लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं या गुलामीचं प्रसरण होत आहे ती पाहता यापुढील काळात कोणीही तोंड वर करून काही विचारू नये, जिथे आहात तिथेच समाधान मानून घ्यावं आणि भाजपला त्यांची सत्ता निर्विवाद उपभोगू द्यावी हा यामागचा विचार आहे. याला जे विरोध करतील त्यांना सरसकट देशविरोधी, देशद्रोही घोषित करून त्याच्यावर हल्ले चढवायचे ही यांतली रणनिति आहे. गेल्या पांच वर्षांतील मोदींचा कारभार बघितला तर ते स्पष्ट होतं.
- काँग्रेसच्या सत्ताकाळात राजीव सरकार असतांना त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी संगणक आणला, अन्य आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड दिली. याच तंत्रज्ञानाचा वापर करून मोदींनी नंतर सत्ता काबीज केली. राजीव गांधींनी देशाला मोठी स्वप्नं बघायला शिकवलं. संगणकाच्या लाटेवर स्वार होऊन भारतात अर्थव्यवस्थेत क्रांति झाली. देशाबाहेर जाऊन नोकऱ्या मिळवण्याची संधी अनेकांना भेटली. ज्यांत पुन्हा उच्च वर्णियच मोठ्या संख्येत होते. पण ज्या काँग्रेसनं यासाठी त्यांना मदत केली त्यांचा मात्र या सर्वांनाच विसर पडलाय आणि आज ते विचारत आहेत की काँग्रेसनं देशासाठी काय केलं? आम्हाला काय दिलं? १९९१ साली नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे देशात उदारीकरण आलं आणि भारत आर्थिक महासत्ता बनू लागला. आज तो जगातील प्रमुख सत्ता होण्याच्या मार्गावर आहे पण त्याचं श्रेय मात्र काँग्रेसला दिलं जातं नाही. त्यांनी सत्तर वर्षांत काहीच केलं नाही असले बिनबूडाचे धादांत खोटे आरोप केले जातात.
- या विरोधात मोदींनी काय केलं? मोदी म्हणतात की मी चहावाला आहे. श्रम प्रतिष्ठा पाळायलाच हवी. पण कोणालाही विचारा की त्याला खरंच चहावाला व्हायला आवडतं? चहावाला होणं ही एखाद्याची महत्त्वाकांक्षा असू शकते? आज चहाचे जे चकचकीत व्यवसाय केले जातात ती चांगली गोष्ट आहे पण त्यांतही पुन्हा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच ते शक्य आहे. त्यामुळे इतर चहावाल्यांचा धंदा मारला जातोय हे विसरून चालणार नाही. ज्यांना इतर काही संधी नसतात अशी माणसं चहाच्या टपऱ्या टाकतात. शिकल्या सवरल्या माणसांचं हे स्वप्नं असतं का? परदेशांत जाऊन जगावर राज्य करण्याची स्वप्नं राजीव गांधींनी देशाला दाखवली व प्रत्यक्षात उतरवलीही. मोदी म्हणताहेत की तुम्ही चहा विका, चहाची टपरी टाका, वडापाव विका, भजी तळा, आता आता चौकीदार बना. या लोकांना जाऊन विचारा की हे काही त्यांचं जगण्याचं ध्येय होतं का म्हणून. त्यांनी शाळेत शिकतांना याची स्वप्नं पाहिली होती का म्हणून. आणि आज जे लाखो तरूण शिकत आहेत त्यांनाही हेच प्रश्न विचारा की त्यांना काय व्हायचं आहे? ते कशासाठी शिकत आहेत? चहावाला होण्यासाठी की चौकीदार होण्यासाठी?
- मोदी किंवा शहा असं म्हणत नाहीत की तुम्ही प्रधानमंत्री व्हा. मोठे उद्योगपती व्हा. संशोधक व्हा. शास्त्रज्ञ व्हा. ते कधीच तसं म्हणणार नाहीत. संघाला तसं वाटत नाही. श्रमप्रतिष्ठेच्या नावाखाली समाजाचा एक मोठा स्तर कायमच गुलामीत राहावा, उच्चवर्णीयांच्या किंवा उच्चवर्गीयांच्या ताब्यात राहावा ही यांची मानसिकता आहे. हे कायम सत्ताधारी राहणार आणि इतरांनी केवळ चहा विकावा, चौकीदारी करावी हेच त्यांना वाटतं. जो उच्च वर्णीय मध्यमवर्ग आज मोदींचा उदो उदो करतोय तो हे सारं करणार आहे का? नाही. कारण तो पैशाच्या बळावर सर्व मोठ्या संधी हिसकावून घेईल आणि इतरांसाठी चहाच्या टपऱ्याच ठेवणार आहे. त्यासाठी त्यांनाही मोदीच हवे आहेत.
- मोदी श्रमप्रतिष्ठा वाढवत आहेत असं काही म्हणतील. पण त्यांची ही श्रमप्रतिष्ठा राजकीय हेतूंनी प्रेरीत आहे हे अगदी उघड आहे. एरव्ही त्यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याकडे जास्त लक्ष दिलं असतं पण काळ्या पैशाच्या नावाखाली त्यांनी नोटाबंदीसारखा तद्दन लहरी निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलं. त्यांत नुकसान कोणाचं झालं? गरीब व्यावसायिकांचच झालं. जे काहीतरी व्यवसाय करत होते त्यांच्यावर खरोखरच चहाच्या टपऱ्या उघडण्याची वेळ आली. सारेच चहावाले झाले. आता मोदींची इच्छा आहे की सर्वांनी चौकीदार व्हावं आणि देश त्यांच्या हातात राहिलाच तर ते हेही करतीलच.
- मोदींच्या विरोधात बोललेलं त्यांना आवडत नाही की भाजपला आवडत नाही हे समजण्यासारखं आहे. पण टीका करणारा देशाच्या विरोधात बोलतोय, असं म्हणून आपल्यावरील टीकेचा रोख दरवेळी देशाविरोधात वळवण्याचा हा त्यांचा निर्लज्ज धूर्तपणा आता ओळखायला पाहिजे. मोदी किंवा भाजप म्हणजे देश नाही. लोक मोदी आणि भाजपला प्रश्न विचारत आहेत आणि त्यांनीच त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहेत. पण त्यांच्याकडे ती नाहीत म्हणून मग हा धूर्तपणा केला जातोय. प्रश्न विचारले जातात म्हणून लोकशाही टिकून असते. प्रश्न विचारले जाणं जेव्हा बंद होईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल. मोदी आणि भाजपला हेच हवं आहे. प्रश्न विचारायचे नाहीत. आम्ही काय वाट्टेल ते बरळू आमच्यावर शंका उपस्थित करायची नाही. तसं केलं तर तुम्ही देशाच्या विरोधात. तुम्ही देशद्रोही. ही लोकशाही संपवण्याची भाषा आहे. आणि त्यांना हेच हवं आहे. ते जे म्हणतील ते मुकाटपणे ऐकणारे निर्बुद्ध लोक त्यांना हवे आहेत. संघात नेमकं हेच चालतं. तेच त्यांना आता देशात चालवायचं आहे. आम्ही बोलणार तुम्ही फक्त ऐकायचं. आम्ही सांगणार तेच तुम्ही करायचं. तुमची अक्कल वापरायची नाही. तो तुम्हाला अधिकार नाही. हे सारं गुलामीकडे नेणारं राजकारण आहे. समाजाचा मोठा स्तर हा कायम निम्नस्थितीतच राहावा आणि त्यामुळे पुन्हा तो सत्ताधाऱ्यांवर अवलंबून राहावा हीच यांची इच्छा आहे. हे एक नवं राजकारण आहे. मोठ्या हुशारीनं विणलेलं. धर्माच्या नावावर आता राजकारण करता येत नाही, वर्णाच्या नावाखाली उघडपणे वागता येत नाही म्हणून गरीबांचा आधार घेऊन, श्रमप्रतिष्ठेची घोंगडी पांघरून, त्यांच्या आधारानं आता ही नवी वर्गव्यवस्था मजबूत करण्याचं हे तंत्र आहे. जिथे भावनेला आवाहन केलं जातं. मुख्य प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी क्षुल्लक गोष्टींना मोठं केलं जातं आणि आपणच जगाचे तारणहार आहोत याचा देखावा निर्माण केला जातोय.
- चहावाला, भजीवाला, आता चौकीदार आणि पुढच्या काळात कदाचित झाडुवाला व्हा अशा घोषणा दिल्या गेल्या तर नवल वाटण्याचं काहीच कारण नाही. निवडणूका भाजप जिंकेल पण तेव्हाही चहावाले चहाच विकतील, चौकीदार चौकीदारीच करतील आणि भजीवाले भजीच तळतील, ते किंवा त्यांची मुलं कधीच मोठी स्वप्नं बघू शकणार नाहीत. कारण आता त्या स्वप्नांवरचाही अधिकार भाजपनं काढून घेतला आहे. तुम्हाला मोठं व्हायचं आहे की इतरांचे शिव्याशाप खात लाचारीचं जगणं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला स्वतःच्या बळावर स्वप्नं बघायची आहेत की इतरांनी सांगितलेल्या गोष्टीच करायच्या आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला गुलाम व्हायचंय की ताठ मानेनं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १०० कोटींचा दंड

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

लता मंगेशकर मेडीकल फाउंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कमीत कमी दरात वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या जमीन कराराचे उल्लंघन करत रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धर्मादाय रुग्णालय आहे. तरीही रुग्णालय रुग्णांकडून बेकायदा मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे एड. रमेश धर्मावत यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी नवलकिशोऱ राम यांनी नोटीस काढली आहे.
लता मंगेशकर फाऊंडेशनला केवळ १ रुपये किंमतीने शासनाने एरंडवणा येथे ९९ एकर जमीन लीजवर दिली होती. यावेळी काही अटी शर्ती होत्या. या जमीनीवर उभ्या राहणाऱ्या रुग्णालयात वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकिय फी व भाडे निश्चित केले होते. त्यानुसार कमीत कमी दरात वैद्यकिय सुविधा दिल्या जातील असा करार करण्यात आला होता. या करारानुसार २० रुपयात वैद्यकिय तपासणी करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु वास्तवात तपासणीसाठी ६०० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे ही सरकारची फसवणूक आहे. अशी तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर या सह काही अटींचा भंग रुग्णालय आणि फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे. अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फाऊंडेशनच्या नावे नोटीस काढली आहे. त्यात रुग्णांकडून बेकायदेशीरपणे वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

2019:?........... कौन जीतेगा 2019 लोकसभा औरंगाबाद?
*AURANGABAD LOKSABHA*

1951: Suresh Chandra, Indian National Congress

1957: Swami Ramanand Tirtha, Indian National Congress

1962: Bhaurao Dagadurao Deshmukh, Indian National Congress

1967: B.D. Deshmukh, Indian National Congress

1971: Manikrao Palodakar, Indian National Congress

1977: Bapu Kaldate, Janata Party

1980: Qazi Saleem, Indian National Congress

1984: Sahebrao Dongaonkar, Indian National Congress (S)

1989: Moreshwar Save, Shiv Sena

1991: Moreshwar Save, Shiv Sena

1996: Pradeep Jaiswal, Shiv Sena

1998: Ramkrishna Patil, Indian National Congress

1999: Chandrakant Khaire, Shiv Sena

2004: Chandrakant Khaire, Shiv Sena

2009: Chandrakant Khaire, Shiv Sena

2014: Chandrakant Khaire, Shiv Sena

2019:?..............
Comment कौन जीतेगा 2019 लोकसभा  औरंगाबाद?

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...