डेंग्यूचा धोका कायम ; पुन्हा 46 रुग्णांची भर पडल्याने महापालिकेची चिंता वाढली
औरंगाबाद / प्रतिनिधी
शहरात डेंग्यूने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे 85 रूग्ण आढळले होते. महिन्याच्या शेवटी पाच दिवस डेंग्यूच्या पॉझीटिव्ह रूग्णांचा आकडा स्थिर होता. त्यामुळे पालिकेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, या महिन्यात 11 दिवसात डेंग्यूचे 46 रुग्ण आढल्याचे सोमवारी (दि.11) समोर आले. यावरून शहरात अजूनही डेंग्यूचा धोका कायम असून परिणामी महापालिकेच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात जुलै महिन्यापासून डेंग्यूच्या साथीने चांगलाच जोर पकडला आहे. तरीही ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे केवळ 8 रूग्ण आढळले होते. संशयितांचा आकडा हा 99 इतका होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात एकदमच 22 रूग्णांचे रिपोर्ट डेंग्यू पाझीटिव्ह आले. तर सुमारे 200 रूग्ण संशयित आढळले. मात्र, मनपा आरोग्य विभागाने डेंग्यूची साथ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतलेल्या नव्हत्या. दरम्यान डेंग्यूचा पहिला बळी गेल्यानंतर पालिकेला जाग आली आणि आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास आरोग्य विभागाने सुरू केल्या. ऑक्टोंबर महिन्यात पंधरा दिवसांतच सात जणांचा डेंग्यूने बळी घेतला. तेव्हा पालिका आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणात शहरातील बहुतांश भागात डेंग्यू डासांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने ही साथ रोखण्यासाठी जलदतेने प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या. अॅबेटींग विशेष मोहीम सुरू केली. याअंतर्गत ऑक्टोंबर महिन्यात जोखमीच्या भागात जाऊन डोअर टू डोअर सर्वेक्षण, डास उत्पत्तीच्या स्थानांची तपासणी, पाण्याचे कंटेनर्स तपासण्यात आले. अॅबेट वाटप, कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन, औषध व धूरफ वारणी अशा विविध उपाययोजना पालिकेच्या आरोग्य विभागाने राबविल्या. मात्र यानंतरही आक्टोबर महिन्यात तब्बल 85 जणांना डेंग्यूची लागण झाली, तर 382 संशयित आढळले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून सोमवार (दि.11) पर्यत अकरा दिवसांतच डेंग्यूचे तब्बल 46 रूग्ण आढळले आहेत. संयशित रूग्णांचा आकडा मात्र या तुलनेत कमी 99 एवढा आहे. यामुळे अद्यापही डेंग्यूची साथ अटोक्यात आलेली नाही. परिणामी, महापालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
दहा वर्षांचे रेकॉर्ड मोडले
डेंग्यूच्या साथीची मागील दहा वर्षांतील आकडेवारीनुसार यावर्षी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्यासाथीने कहर केला आहे. 2016 मध्ये डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यावर्षी डेंग्यूच्या रूग्णांची वर्षभरातील संख्या 100 होती, तर संशयित 277 रुग्ण आढळले होते. मात्र, वर्ष संपायला अजून एक महिना बाकी असताना डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण 174 तर संशयित तब्बल 791 आढळले आहे. मागील दहा वर्षांतील हा उच्चांक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
औरंगाबाद / प्रतिनिधी
शहरात डेंग्यूने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या महिन्यात डेंग्यूचे 85 रूग्ण आढळले होते. महिन्याच्या शेवटी पाच दिवस डेंग्यूच्या पॉझीटिव्ह रूग्णांचा आकडा स्थिर होता. त्यामुळे पालिकेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, या महिन्यात 11 दिवसात डेंग्यूचे 46 रुग्ण आढल्याचे सोमवारी (दि.11) समोर आले. यावरून शहरात अजूनही डेंग्यूचा धोका कायम असून परिणामी महापालिकेच्या उपाययोजना कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात जुलै महिन्यापासून डेंग्यूच्या साथीने चांगलाच जोर पकडला आहे. तरीही ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे केवळ 8 रूग्ण आढळले होते. संशयितांचा आकडा हा 99 इतका होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात एकदमच 22 रूग्णांचे रिपोर्ट डेंग्यू पाझीटिव्ह आले. तर सुमारे 200 रूग्ण संशयित आढळले. मात्र, मनपा आरोग्य विभागाने डेंग्यूची साथ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतलेल्या नव्हत्या. दरम्यान डेंग्यूचा पहिला बळी गेल्यानंतर पालिकेला जाग आली आणि आवश्यक उपाययोजना हाती घेण्यास आरोग्य विभागाने सुरू केल्या. ऑक्टोंबर महिन्यात पंधरा दिवसांतच सात जणांचा डेंग्यूने बळी घेतला. तेव्हा पालिका आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणात शहरातील बहुतांश भागात डेंग्यू डासांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेने ही साथ रोखण्यासाठी जलदतेने प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या. अॅबेटींग विशेष मोहीम सुरू केली. याअंतर्गत ऑक्टोंबर महिन्यात जोखमीच्या भागात जाऊन डोअर टू डोअर सर्वेक्षण, डास उत्पत्तीच्या स्थानांची तपासणी, पाण्याचे कंटेनर्स तपासण्यात आले. अॅबेट वाटप, कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन, औषध व धूरफ वारणी अशा विविध उपाययोजना पालिकेच्या आरोग्य विभागाने राबविल्या. मात्र यानंतरही आक्टोबर महिन्यात तब्बल 85 जणांना डेंग्यूची लागण झाली, तर 382 संशयित आढळले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून सोमवार (दि.11) पर्यत अकरा दिवसांतच डेंग्यूचे तब्बल 46 रूग्ण आढळले आहेत. संयशित रूग्णांचा आकडा मात्र या तुलनेत कमी 99 एवढा आहे. यामुळे अद्यापही डेंग्यूची साथ अटोक्यात आलेली नाही. परिणामी, महापालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
दहा वर्षांचे रेकॉर्ड मोडले
डेंग्यूच्या साथीची मागील दहा वर्षांतील आकडेवारीनुसार यावर्षी मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्यासाथीने कहर केला आहे. 2016 मध्ये डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, यावर्षी डेंग्यूच्या रूग्णांची वर्षभरातील संख्या 100 होती, तर संशयित 277 रुग्ण आढळले होते. मात्र, वर्ष संपायला अजून एक महिना बाकी असताना डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण 174 तर संशयित तब्बल 791 आढळले आहे. मागील दहा वर्षांतील हा उच्चांक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment
Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.