Friday, October 4, 2019

इम्तियाज जलील, जावेद कुरेशी यांच्यात वादावादी. औरंगाबादचे राजकारण तापले.
Photos:-Baig Mushtak Mirza, Aurangabad

औरंगाबाद: ऐसें छप्पन आये और गये, मजलिस किसी मौताज नही, याहा सिर्फ ओवेसी साहेब की बात को किमत है, वो किसी राह चलते को, रिक्षावाले को भी तिकीट देगे तो उसको चुन के लायगे, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी जावेद कुरेशी यांना नाव न घेता भाषणात टोला लगावला. त्याचा जाब विचारण्यासाठी कुरेशी आपल्या जागेवरून उठत इम्तियाज यांच्याकडे गेले. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ओवैसी यांच्या समोरच हा प्रकार घडल्यामुळे सभेत काही काळ घोषणाबाजी आणि गोंधळ उडाला. व्यासपीठावरील नेत्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवारी वरून धुसफूस सुरू आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आपले विश्वासू नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने कुरेशी नाराज होते. त्यातच इम्तियाज जलील यांनी आज ओवेसी यांच्या समोरच जावेद कुरेशी यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे कुरेशी यांचा पारा चढला.
भाषण संपवून इम्तियाज जागेवर येऊन बसत नाहीत, तोच कुरेशी त्यांच्याकडे गेले आणि तावातावाने बोलू लागले. ओवेसी भाषण सुरू करत असतानाच त्यांच्या पाठीमागे कुरेशी- इम्तियाज यांच्यात खडाजंगी सुरू होती. ही बाब समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजीला सुरवात केली. तोपर्यंत व्यासपीठावरील नेत्यांनी धाव घेत कुरेशी आणि इम्तियाज यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तीन चार मिनिटे सुरू होता. समोर गोंधळ आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओवेसी यांनी दम भरत शांत केले आणि भाषणाला सुरवात केली
कुरेशी बंडाच्या तयारीत?
दरम्यान, सभेनंतर कुरेशी यांनी आपल्या कार्यालयात समर्थकांची बैठक घेत इम्तियाज यांच्या विधानावर आक्षेप घेत, एमआयएमचा शहरात पाया आपण रचल्याचा दावा केला. ओवेसी यांनी भेटण्यासाठी वेळ दिली आहे, त्यांच्याशी भेटून पुढील निर्णय घेऊ असे जाहीर करतांनाच इम्तियाज जलील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे सांगितले.

Tuesday, October 1, 2019

रेल्वेस्टेशन येथुन रिक्षात बसवुन प्रवाश्यांना लुटणाऱ्या टोळीच्या उस्मानपुरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

आरोपीकडून २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद/ प्रतिनिधी
जनशताब्दीने रेल्वे स्टेशनवर उतरून तेथून २८ सप्टेंबर रोजी गादिया विहार कडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला लुटणाऱ्या टोळीला मुद्देमालासह उस्मानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.१) गजाआड केले.
मोहम्मद नमीर अन्सारी मोहम्मद मजाहिर अन्सारी (वय-२५ रा. बेहरमा गढी, ता.कसबा नेहतोर, जि.बिजनौर उत्तरप्रदेश ह.मु. आझाद चौक, औरंगाबाद), खर्शीद अंसारी वल्द युसुफ अंसारी (वय ३५ रा. गल्ली न. 11 आझाद चौक रहीम नगर औरंगाबाद), गुलफाम अंसारी वल्द जुल्फीकार अंसारी (वय २६ रा. बेहरमा गढी, ता.कसबा नेहतोर, जि.बिजनौर उत्तरप्रदेश ह.मु. आझाद चौक, औरंगाबाद अशी आरोपींची नावे असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजता सेवानिवृत्त शिक्षिका व त्यांचे पती हे
जनशताब्दी रेल्वेने औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे उतरुन राहत्या घरी गादिया विहार येथे जाण्याकरिता रिक्षात बसले होते. रिक्षा चालकाने अगोदर दोन व्यक्ती बसवुन ठेवले होते. बसण्यास अडचण होत असल्याने या दाम्पत्याने त्यांच्याकडील बॅग सहप्रवशी आरोपींकडे दिल्या. आरोपीनी बॅगमधुन एकुण 207.19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत एकुण 02,74,833/-रु, व 25000/- रु. रोख रक्कम असे एकुण 02,99,833/- रु.कि.चा मुद्देमाल रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी लुटला होता. याबाबत उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रेल्वेस्टेशन सीसीटीव्ही कंट्रोल रुम त्यांचेकडुन आरोपीबाबत माहिती घेवुन आरोपीची सीसीटीव्ही फुटेजमध्ये पडताळणी केली असता आरोपी हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळुन आला नाही. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेस्टेशनला रेल्वे आल्यानंतर गर्दी करणा-या रिक्षाचालकापैकी संशयित रिक्षाचालक मोहम्मद नमीर याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवितात त्याने गुन्हा कबुल करीत साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक ऑटो रिक्षा क्र.MH 20 EF 3505, दोन मोबाईल, 05.5 तोळे सोन्याचे दागिने किंमत 02,09,000/-रु. व 10,000/-रु. रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सपोआ साखोळे, पोनि दिलीप तारे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सर्जेराव सानप, पोकॉ अश्ररफ सय्यद, राहुल काळे, मनोज बनसोडे यांनी केली.


अनिस रामपुरे यांना "युवा गौरव" पुरस्काराने सम्मानित . 
औरंगाबाद येथील  दैनिक शम-ऐ-रहबर चे फोटोग्राफर अनिस याकुब रामपुरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाच वर्षा पासुन उत्कृष्ट फोटोग्राफ़ि चे काम केल्या मुळे सा. औरंगाबाद युवा व युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे "युवा गौरव" पुरस्काराने सम्मानित करणयात आला. 
सदर पुरस्कार वितरण सोहळा २९ सप्टेंबर २०१९ रविवारी रोजी रात्री ७ वाजता मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे पार पड़ला प्रमुख पाहुने अनवर खान, ईब्राहिम पठाण, नायाब अन्सारी, शारेख नक्शबंदी, संपादक अब्दुल कय्यूम, उपसरपंच सय्यद शेरू, नगरसेवक शेख हनिफ बब्बू, शेख खालेद, मोहसिन अहेमद, आदींच्या  हस्ते सन्मान पत्र व ट्रफि देऊन सम्मानित केले. 
 अनिस याकुब रामपुरे यांना "युवा गौरव"  पुरस्कार  मिळालयाने मित्र मंडल  व रामपुरे परीवाराच्या वतीने  शूभेच्छा देण्यात आले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...