Thursday, November 14, 2019

महिलेला चाकूने मारहाण; तीघांवर गुन्हा

औरंंगाबाद :  बचत गटाचे हप्ते भर सांगितल्याच्या कारणारुन दोन महिलांसह एका पुरुषाने ३५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करुन चाकुने मारहाण केली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जिन्सी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला व आरोपी महिला या एकाच बचत गटात आहेत. तक्रारदार महिलेने आरोपी महिलेला बचत गटातुन घेतलेल्या कर्जाचे थकलेले हप्ते भरण्यास सांगितले. त्यारुन महिला आरोपीने बचत गटातील फिर्यादीसह इतर महिलांना शिवीगाळ केली. तसेच दोन आरोपी महिलांसह आरोपी शेख मेहराज याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करित तीच्या तोंडावर भाजी कापण्याच्या चाकुने वार करुन जखमी केले. तसेच यापूढे पैसे मागण्यासाठी आमच्या घरी कोणी आले तर त्यांना जीवे मारु अशी धमकी देखील दिली. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार नजन करित आहेत.
----------------------------------------
रस्त्यात अडथळा निर्माण करणार्‍या वाहन धारकांवर कारवाई
विविध पोलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल

औरंंगाबाद : रस्यात वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनधारक व हाथगाडी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध पोलिस ठाण्यात २५ जणांवर वाहतूकीस अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलीक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक अमोल विष्णु आहेरकर, सुनिल प्रेमसिंग राठोड, सोनु मोहण भगुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक दिलीप लक्ष्मण पवार (२७, रा. मयुरपार्क), रोहन दिलीप नवगीरे (१९, रा. न्यायनगर, पुंडलीक नगर), अहेमद खान अब्दुल्ला खान (३६, रा. बारी कॉलनी), सय्यद खलील सय्यद हबीब (२१, रा. शरिफ कॉलनी, कटकटगेट), शेख साजीद शेख आमीर (३०, रा. नारेगाव) यांच्यावर, सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळाची गाडा चालविणारे मझर खान समशेद खान (२८, रा. बेरीबाग, हर्सुल), जाव्ोद बनेमिया बागवान (२४), शेख नय्यर शेख इलियास (२२, दोघे रा. चिश्तीया कॉलनी, एन-६, सिडको), एजाज खान सुभान खान (३८, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्यावर तर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक प्रविण परमेश्वर शेडगे (रा. शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर नगर), किशोर साहेबराव राठोड (२२, रा. संयजनगर, मुकुंदवाडी) या दोघांवर तसेच उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत फळगाड्या लावणार्‍या अब्दुल अन्वर अब्दुल हमीद (५०), अक्तर अब्दुल करीम बागवान (५२, रा. दोघे रा. सब्जीमंडी, पैठणगेट), सर्जेराव किसन त्रिभुवन (६०, रा. मिलींदनगर) व रिक्षा चालक विजय देविदास दाभाडे (२७, रा. कोकणवाडी) यांच्यावर तर सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक विठ्ठल उत्तमराव हिरे (३८, रा. नारळीबाग), मुक्तार मलिक जाफर मलिक (४५, रा. गणेश कॉलनी), जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालक भरत रेतीलाल पाटील (२४, रा. नळठाणा ता. सिंद्दखेड जि. धुळे), सलीम खान अब्दुल रहेमान (२५, रा. रहीमनगर, आझाद चौक), लोडींग वाहन चालक शेख अब्दुल समद शेख अब्दुल गफुर (२४, रा. नाहीद नगर, हत्तेसिंगपुरा, कटकटगेट) तसेच जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चालक योगेश बबनराव रत्नपारखी (३५, रा. कैलास नगर) व अकबर खान वजीर खान पठाण (४०, रा. सादतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------------
विवाहितेचा विनयभंग
औरंगाबाद : बसैय्ये नगर येथील मैदानाजवळील रस्त्याने पायी जाणार्‍या ३८ वर्षीय तक्रारदार विवाहीतेची छेड काढुन शेख फारख शेख हबीब (वय ४०, रा.बायजीपुरा) याने विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शेख फारुख याच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करित आहेत.
----------------------------------------
विभक्त राहणार्‍या महिलेवर लैंगिक अत्याचार

औरंंगाबाद : पतीपासून विभक्त राहणार्‍या ४२ वर्षीय महिलेवर देविदास रामचंद्र चव्हाण (वय ६०, रा.सुरेगाव, ता.येवला, जि.नाशिक) याने लैंगिक अत्याचार केला. पीडित महिला एमआयडीसी वाळुज परिसरातील रहिवासी असून तिची ओळख देविदास चव्हाण याच्यासोबत २०१२ साली औरंगाबाद ते नाशिक प्रवासादरम्यान झाली होती. त्यानंतर देविदास चव्हाण याने पीडितेस लग्न करण्याचे तसेच तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून २०१२ ते ऑगस्ट २०१९ या काळात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून देविदास चव्हाण याच्याविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.
----------------------------------------
भाडेकरूची माहिती न देणार्‍या घरमालकावर गुन्हा
औरंगाबाद : भाडेकरुची माहिती न देणार्‍या घर मालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई बुधवारी (दि. १३) करण्यात आली. शहरात काही अनुचित घटना घडु नये या करीता सर्व घर मालकांना किरायाने राहणार्‍या व्यक्तीची माहिती पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक केले असतांना देखील किरायदारांची माहिती न देणार्‍या घर मालका विरुध्द कारवाई करणे सुरु आहे. त्यानुसार मुकुंदवाडी गावातील सदाशिव भिका फरकाडे (६०) यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार मनगटे करित आहेत.
----------------------------------------
अल्पवयीन मुलाचे अपहरण
औरंगाबाद : हर्सुल येथील छत्रपती नगरात एका १७ वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्यची घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली. प्रकरणात अपह्त मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन हुर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भागिले करित आहेत.
----------------------------------------
विविध भागातून दुचाकी चोरीला
औरंगाबद : घरा समोर हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीजे-०२८२) चोरट्याने लंपास केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी बीड बायपास येथील सहारा कॉलनीत घडली. प्रकरणात साहेब खान नसिर खान (३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राठोड करित आहेत. तर
दुसऱ्या घटनेत टिव्ही सेंटर येथील जिजाऊ चौकात उभी केलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएफ-२८४३) चोरट्याने चोरुन नेल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणात विश्वभंर दिंगबर काथार (वय ४८, रा. सुरेवाडी, जाधववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार जाधव करित आहेत.
----------------------------------------
चोराने रिक्षा लांबविली
औरंगाबाद : घरा समोरुन हॅन्डल लॉक करुन ठेवलेली रिक्षा क्रमांक (एमएच-२०-एए-५७७९) चोरट्याने चोरुन नेली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. प्रकरणात आनंदराव वामनराव देशमुख (वय ५२, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख शकील करित आहेत.
----------------------------------------
हॉटेल मध्ये वीज चोरी
औरंगाबाद : महावितरण कंपनीची तब्बल २ लख ४७ हजार ८५३ रुपयांची वीज चोरी करुन तडजोडीची रक्क न भरल्याने रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल ग्रेट न्यु पंजाबच्या अनुपम रॉय याच्यासह तीन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पप्पू नवनाथ गोरे (२६, रा. गणेश नगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजेची चोरी करणार्‍या अनुपम रॉय यांच्यासह तीन महिलांवर विजचोरी केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वारे करित आहेत.
----------------------------------------
संशयीत फिरणारा गजाआड
औरंगाबाद : चोरी करण्याच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेत लपुन बसलेल्या अरबाज खान करीम खान (वय २२, रा. गरम पाणी, भोईवाडा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १३ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बसस्थानकावजळ करण्यात आली. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नसीम खान करित आहेत.
तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला ; तरीही शहरात समान पाणीवाटप होईना

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील काही भागात चार तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असताना पालिकेने समान पाणी वाटपाच्या नावाखाली अनेक भागातील तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा चार दिवसांवर नेला. यामुळे हा प्रयोग फसला असल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. आमच्या भागात पाणीकपात करूनही समान पाणीपुरवठा होत नसेल तर प्रशासनाने काय मिळविले असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी केली.

उन्हाळ्यात जायकवाडीने तळ गाठल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. अनेक भागात आठ-दहा दिवसाला तर काही भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. परिणामी संपूर्ण शहराला एक समान पाणीवाटप करण्याची मागणी करत अनेक आंदोलने झाली.  संपूर्ण उन्हाळाभर पाण्यावरून वादंग सुरू होते. विशेषतः सत्ताधारी पक्षच यात आघाडीवर होते. शहराला समान पाणी वाटप करण्याचे नियोजन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे दिले. त्यानुसार ज्या भागात तीन दिवसाआड पाणी दिले जात होते तेथील पाणी पुरवठा चार दिवसाआड करण्यात आला तर जिथे आठ-दहा दिवसाआड पाणी दिले जात होते तिथे देखील चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, सध्या पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी बैठकीत केला. आमच्या भागातील पाणी तीन दिवसावरून चार दिवसाआड करून प्रशासनाने काय मिळविले, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल आणि शिल्पाराणी वाडकर यांनी केला. अजूनही अनेक भागात पाच-सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आमच्या भागात पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. संधा यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या उशिराने पाणी मिळत आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल. अन्यथा चार दिवसाआडच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती जयश्री कुलकर्णी यांनी जायकवाडी जलाशय भरलेला असताना शहरात वेळेवर पाणी का मिळत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारतात. त्यांना काय उत्तर देयचे त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले.
लेखापरिक्षण अहवालातील आक्षेपांवर वर्षभरानंतरही अधिकारी खुलासे देईनात

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत प्रकार उघडकीस

औरंगाबाद /प्रतिनिधी

महापालिकेच्या वर्षभरातील जमा-खर्च याचे लेखा परीक्षण करण्यात येते. यात आर्थिक नुकसान आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे अहवालात उघड होतात. मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी वर्षभरापूर्वी अहवाल प्रशासनाकडे सादर केलेला आहे. त्यात अनेक गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही यासंबंधी कुठलीच कारवाई झाली नसल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१४) पार पडलेल्या मनपा स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. यासंबंधी कारवाई का झाली नाही ? असा सवाल सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी लेखापरीक्षण संबंधी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी उपलब्ध संचिकापैकी बहुतांश संचिकांचे परीक्षण करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यानंतर वाडकर यांनी महत्त्वाचा संचिका लेखापरीक्षणला उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचे सांगत, महापालिकेचे झालेले नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? मनपाचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना माफ कसे करायचे ? असा सवाल उपस्थित केला. यावर देवतराज यांनी अहवाल सादर करून एक वर्ष झाले. त्यावर आयुक्त निर्णय घेतील असा खुलासा केला. त्यानंतर आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी सध्या खुलासे घेण्याचे काम सुरू असल्याचा खुलासा बैठकीत केला. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी दिले.
उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायमास लाईट बंद असून मनपा चे दुर्लक्ष.

हेच ते उस्मानपुरा गुरुद्वारा समोरील हायलाईट बंद आहे व मनपा चे ह्याकडे दुर्लक्ष.

नुकताचगुजयंती साजरी झाली,आम दिवसात तर सोडाच गुरुनानक जयंतीत सुद्धा नगरसेवकाने काम केले नाही व महानगरपालिकेचे अधिकार्‍यांना जाग आली नाही.




Sunday, November 10, 2019

*राशेन व दुकान चालकावर होणार गुन्हा दाखल*
बर्‍याच ठिकाणी आसे होत आहे की राशन दुकान चालक कानाला कान लावून शासनाची दिशाभूल करून गोर गरीब जनतेला गहू,तांदुळ,दाळ,साखर,ईत्यादी वस्तु शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त दराने विक्री करत आहे.प्रत्येक गावातील राजकारण,दबाव,टाकून हमी भावाविरूध्द आवाज करणाऱ्या माणसाला डवचण्याचा प्रयत्न काही दुकानदार करीत आहेत,त्यामुळे प्रहार जन शक्ती संघटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला ञास झाला नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत,यानंतर गोपनीय माहिती नुसार अधिकारी गावात येऊन प्रत्येक जनमानसाला हमी भावाविषयी माहीती विचारून पावती पेक्षा जास्त पैसे जर दुकान चालक घेत आसेल तर त्या दुकान चालकाविरुद्ध व शासनाने नेमलेल्या सचिवाविरूध्द गुन्हा दाखल होईल.तसेच दुकान चालक किती पैसे मागतात याची रेकॉर्ड करा तुमची माहीत खोपीनीय ठेवण्यात येईल. विनंती आहे प्रत्येक राशेन दुकान चालकाने दक्षता घ्यावी.

Saturday, November 9, 2019

११ वा  वृक्षारोपण कार्यक्रम वाळूज पोलीस स्टेशन समोर संपन्न झाला
Photos:-Baig Mushtak Mirza,Waluj, Aurangabad.


दि. ०६/११/२०१९ रोजी मेटॅलमन ऑटो प्रा.ली  कंपनीने १०१ झाडे वाळूज एम आय डी सी  पोलीस स्टेशन दुभाजकावर लावण्याचा कार्यक्रम श्री  बिक्रमजीत बेंबी (चेअरमन ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.




या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.  श्रीकांतजी मुंदडा (सी ओ ओ ), श्री प्रभाकर मते पाटील ( भारतीय कामगार सेना -चिटणीस ), श्री विजय साळवे (एच आर मॅनेजर ), श्री वाघ साहेब ( पोलीस निरीक्षक -वाळूज पोलीस स्टेशन ), श्री  अनिलकुमार डहाळे ( जी एम ) व श्री. कल्याण पिंप्रतीवर ( युनिट अध्यक्ष -भारतीय कामगार सेना) हे होते.


 मेटॅलमन ऑटो कंपनीने आतापर्यन्त वाळूज परिसरात ३५०० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत
या कार्यक्रमात  कंपनीतील  अधिकारी श्री. प्रकाश येखांडे ,सूर्यकांत शानबाग ,आनंद गलगली ,प्रवीण जोशी ,विक्रम पटवर्धन ,गजेंद्र  दकते ,अथिया युसूफ यांनी विविध प्रकारची झाडे लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुमित पाटील व आभार प्रदर्शन श्री. सचिन घोडके यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीतील श्री. अवधूत शिंदे, सुशील देवळे, विनोद वानखेडे ,रविकांत चिखले ,नारायण निकम ,गुरुदास पराते व बाळासाहेब नाटकर यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमात कंपनीतील कामगार व कर्मचारी उपस्थित होते.

Friday, October 4, 2019

इम्तियाज जलील, जावेद कुरेशी यांच्यात वादावादी. औरंगाबादचे राजकारण तापले.
Photos:-Baig Mushtak Mirza, Aurangabad

औरंगाबाद: ऐसें छप्पन आये और गये, मजलिस किसी मौताज नही, याहा सिर्फ ओवेसी साहेब की बात को किमत है, वो किसी राह चलते को, रिक्षावाले को भी तिकीट देगे तो उसको चुन के लायगे, अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी जावेद कुरेशी यांना नाव न घेता भाषणात टोला लगावला. त्याचा जाब विचारण्यासाठी कुरेशी आपल्या जागेवरून उठत इम्तियाज यांच्याकडे गेले. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ओवैसी यांच्या समोरच हा प्रकार घडल्यामुळे सभेत काही काळ घोषणाबाजी आणि गोंधळ उडाला. व्यासपीठावरील नेत्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवारी वरून धुसफूस सुरू आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आपले विश्वासू नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने कुरेशी नाराज होते. त्यातच इम्तियाज जलील यांनी आज ओवेसी यांच्या समोरच जावेद कुरेशी यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे कुरेशी यांचा पारा चढला.
भाषण संपवून इम्तियाज जागेवर येऊन बसत नाहीत, तोच कुरेशी त्यांच्याकडे गेले आणि तावातावाने बोलू लागले. ओवेसी भाषण सुरू करत असतानाच त्यांच्या पाठीमागे कुरेशी- इम्तियाज यांच्यात खडाजंगी सुरू होती. ही बाब समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजीला सुरवात केली. तोपर्यंत व्यासपीठावरील नेत्यांनी धाव घेत कुरेशी आणि इम्तियाज यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तीन चार मिनिटे सुरू होता. समोर गोंधळ आणि घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओवेसी यांनी दम भरत शांत केले आणि भाषणाला सुरवात केली
कुरेशी बंडाच्या तयारीत?
दरम्यान, सभेनंतर कुरेशी यांनी आपल्या कार्यालयात समर्थकांची बैठक घेत इम्तियाज यांच्या विधानावर आक्षेप घेत, एमआयएमचा शहरात पाया आपण रचल्याचा दावा केला. ओवेसी यांनी भेटण्यासाठी वेळ दिली आहे, त्यांच्याशी भेटून पुढील निर्णय घेऊ असे जाहीर करतांनाच इम्तियाज जलील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे सांगितले.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...