Saturday, March 23, 2019

काँग्रेसमध्ये कुणी ऐकत नाही; अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत
                         फोटो-बेग मुश्ताक मिर्झा
विशेष बातमी- युवा सामना मिडीया न्युज नेटवर्क, दिल्ली
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षातील इतर नाराजही पक्ष सोडत आहेत. आता खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणच नाराज असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पक्षात कुणी आपले ऐकत नसल्याने राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, अशी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात काँग्रेस अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि एक कार्यकर्ता बोलत असल्याचा दावा करत एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. यात चंद्रपूरच्या उमेदवारीवर बोलताना चव्हाण यांनी पक्षात आपले कुणीही ऐकत नाही. त्यामुळे आपणच राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्षच नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी या संदर्भात बोलताना स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले की, ते खासगी संभाषण असून पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. यातील सगळे अंतर्गत विषय आहेत. चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मी क्लिप ऐकलेली नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्याचे माझे काम आहे. चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय असल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चंद्रपूरचा वाद काय?
चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत मोठ्या घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला विशाल मुत्तेमवार यांचे नाव घोषित झाले. परंतु, पुन्हा त्यांचे नाव मागे पडले आणि हंसराज अहिर यांच्या विरोधात विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चंद्रपुरातील काँग्रेस मंडळी नाराज झाली. खुद्द चव्हाण हे शिवसेनेचे आमदार बाळू धानोकर यांच्यासाठी आग्रही होते. परंतु, उमेदवारी बांगडेंना जाहीर झाल्याने चव्हाणांकडे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

No comments:

Post a Comment

Best of luck Thanks visit again and follow our YuvaSamnaMediaGroup.

भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली संचालित जन शिक्षण संस्थान खडकेश्वर आणि आय. सी. ई. ई. एम. कॉलेज वाळूज यां...